शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

कोरोनाने ७६ महिलांचे कुंकू पुसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST

गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून कधी लॉकडाऊन तर कधी संचारबंदी करावी लागली. ...

गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून कधी लॉकडाऊन तर कधी संचारबंदी करावी लागली. एकीकडे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले होते तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. यात कोणी भाऊ तर कोणी आई-वडील तर कोणी आपला पती गमावला आहे. ज्या महिला कोरोनामुळे विधवा झाल्या त्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य शासनाने महिला व बालकल्याण विभागाला दिले आहेत. त्यानुसार अंबड तालुक्यात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात अंबड तालुक्यात जवळपास ७६ विधवा महिला आढळून आल्या. शासनाने नुकताच एक शासन निर्णय जारी करून विधवा महिलांसाठी ‘मिशन वात्सल्य’ उपक्रमांतर्गत विविध विभागांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या २५ शासकीय योजनांचा लाभ देण्याची योजना आखली आहे. या योजनेची तालुकास्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर समिती गठित करण्यात आली आहे.

मिशन वात्सल्य उपक्रमा अंतर्गत तालुकास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करून विविध महिलांचा शोध घेण्यात आला. पंचायत समिती अंतर्गत बालविकास योजना प्रकल्प १ व २ अंतर्गत गावपातळीवर अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ७६ विधवा महिला आढळल्या आहेत.

भारती गेजगे, तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंबड.