शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क व सोशल डिस्टंसिंग हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST

जालना : तब्बल वर्षभरानंतर पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाल्याने हातावर पोट असणारे कामगार आणि नोकदार वर्ग भयभीत झाला आहे. ...

जालना : तब्बल वर्षभरानंतर पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाल्याने हातावर पोट असणारे कामगार आणि नोकदार वर्ग भयभीत झाला आहे. दरम्यान, हद्दपारीच्या उंबरठ्यावर असलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चिंतेत भर पडली आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये लाॅकडाऊन जाहीर झाले होते. त्याचा मोठा परिणाम जिल्ह्यातील उद्योग, व्यापारावर झाला होता. या लाॅकडाऊनमुळे घराच्या बाहेर पडणे शक्य नसल्याने रोजगारावर पाणी फेरावे लागले. त्यामुळे अनेकांचा उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला होता. शहर सोडून हजारो कामगार आपआपल्या गावी गेले होते. त्यामुळे उद्योजकदेखील हवालदिल झाले होते. हीच परिस्थिती नव्याने निर्माण झाल्यास ती कामगार आणि उद्योजकांनाही परवडणारी नाही. त्यामुळे शक्य तेवढी काळजी घेऊन कोरोनाला दूर ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे. गेल्या २० दिवसांचा विचार केल्यास जिल्हाभरात ८०० कोरोना बाधित रूग्णांची वाढ होऊन १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक पुन्हा एकदा बेरोजगारीच्या संकटात होरपळण्याची शक्यता आहे.

धोका वाढतोय

गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. ही रूग्णसंख्या वाढीमागे वातावरणातील बदलही कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवडाभरापासून कधी कडक ऊन तर अनेक गावांमध्ये गारपीट झाल्याने वातावरणात लक्षणीयरित्या बदल झाला आहे.

जालन्यातील स्टील उद्योगांनी पुन्हा एकदा चांगली भरारी घेतली आहे. परंतु, लॉकडाऊनच्या चर्चेने चिंता वाढली आहे. असे असले तरी किमान उद्योजकांना यातून सूट मिळावी.

-घनश्याम गोयल, स्टील उद्योजक

जिल्ह्यातील लहान मोठे व्यापारी लाॅकडाऊननंतर हळूहळू व्यवसाय वृध्दी करत आहेत. परंतु, पुन्हा लाॅकडाऊन लागल्यास ग्रामीण भागातील छोटे व्यापारी अडचणीत येणार आहेत.

हस्तीमल बंब, व्यापारी महासंघ

लाॅकडाऊनमध्ये अन्य कंपन्यांप्रमाणेच बांधकाम व्यवसायाला सूट देण्यात यावी, जेणेकरून या क्षेत्रात कुशल आणि अकुशल असे कामगार आहेत. याचा विचार व्हावा.

धीरेंद्र मेहरा, बांधकाम व्यावसायिक