शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

तब्बल वर्षभरानंतर जिल्ह्यात नऊ वाळू घाटांतून होणार उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST

राज्यात सत्तांतर होऊन दीड वर्ष लोटले आहे. असे असताना पर्यावरणाचे कारण देत राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील वाळू उपसा थांबला ...

राज्यात सत्तांतर होऊन दीड वर्ष लोटले आहे. असे असताना पर्यावरणाचे कारण देत राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील वाळू उपसा थांबला होता. राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे प्रस्ताव पाठवून नंतरच या लिलावांना मान्यता मिळणार होती. या सर्व प्रक्रियेदरम्यानच कोरोना येऊन ठेपल्याने ‘आधीच उल्हास त्यात फाल्गून मास’ अशी स्थिती होती. जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण विभागाने गोदावरी, दूधना, कुंडलिका तसेच पूर्णा नदीतील जवळपास २२ वाळू घाटांतून वाळूचा उपसा करण्यास परवानगी दिली होती.

परंतु, हे प्रस्ताव राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे पाठविल्यानंतर त्याला दाेन महिन्यांपूर्वी मान्यता मिळाली. त्यानंतर जिल्हा गौणखनिज अधिकारी तसेच अपर जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू घाटांच्या लिलावासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली. २२ वाळू घाटांपैकी यावेळी केवळ ९ वाळू घाटांचा लिलाव होऊ शकला. एकूण २२ वाळू घाटांतून जिल्ह्याला २७ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता; परंतु केवळ ९ वाळू पट्टे लिलावात गेल्याने यातून केवळ १३ कोटी ७ लाख रुपयेच मिळणार आहेत.

नागरिकांना मिळणार दिलासा

जालना जिल्ह्यातील नऊ वाळू घाटांतून जवळपास ६० हजार ब्रास वाळूचा उपसा करण्यास आता मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी मिळाल्यावर आता लगेचच वाळूचा उपसा करण्यात येणार आहे. हा वाळू उपसा सुरू झाल्यानंतर ५० हजार रुपयांमध्ये सहा ब्रासवर पोहोचलेले वाळूचे दर हे सरासरी ५० टक्के खाली येतील, असे सांगण्यात येते. एकूणच वर्षभरापासून तापी नदीतील महागडी वाळू खरेदी करण्यास पायबंद लागणार आहे.