शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

भारतीय अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा आरोप

By admin | Updated: November 4, 2016 04:26 IST

पाकिस्तानी वृत्तपत्रांनी येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या ८ अधिकाऱ्यांची नावे प्रसिद्ध करून हे अधिकारी पाकविरोधी कारवाया करीत असल्याचा आरोप केला

इस्लामाबाद : पाकिस्तानी वृत्तपत्रांनी येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या ८ अधिकाऱ्यांची नावे प्रसिद्ध करून हे अधिकारी पाकविरोधी कारवाया करीत असल्याचा आरोप केला आहे. भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले असताना पाकच्या माध्यमांनी प्रत्युत्तर म्हणून ही नावे प्रसिद्ध केली. तत्पूर्वी पाकमधील आठ भारतीय मुत्सद्यांंची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आल्याने त्यांना परत बोलविण्याच्या विचारात असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.मात्र, पाक माध्यमांनी ८ कर्मचाऱ्यांची नावे प्रसिद्ध करून ते पाकिस्तानविरोधी कारवायांत गुंतल्याचा आरोप केला. पाकने हेरगिरी कारवायांसाठी कथितरित्या ज्या ८ भारतीय अधिकाऱ्यांकडे बोट दाखविले त्यांची नावे फुटली. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, या ८ जणांत वाणिज्यिक समुपदेशक राजेश कुमार अग्निहोत्री, प्रसिद्धी आणि संस्कृति सचिव बलबिरसिंग, वाणिज्य सचिव अनुरागसिंग, अमरदीपसिंग भट्टी, धर्मेंद्र, विजयकुमार वर्मा, माधवन नंदकुमार आणि जयबालन सेंदील यांचा समावेश आहे. हे अधिकारी भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’साठी किंवा भारतीय गुप्तचर विभागासाठी काम करीत होते, असे पाकिस्तानी दैनिकांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)>उलट्या बोंबा!भारताचे आठ कर्मचारी विध्वंसक कृत्यात सहभागी असल्याचे आढळून आले. त्यांनी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरला अडथळा आणण्याचा तसेच देशात अराजक आणि दहशतीचे वातावरण पसरविण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही करण्यात आला आहे. आगामी काळात पाकिस्तान प्रशासन या आठ जणांची हकालपट्टी करू शकतो. >भारतातर्फे धिक्कार भारतीय अधिकाऱ्यांना निष्कारण अडकावण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत असून, काही कारण नसताना त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. याचा भारत धिक्कार करतो. - विकास स्वरूप, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय