शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

एका झटक्यात भारताने मालदीवला किंमत दाखवली; 'ते' विधान महागात पडले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:25 IST

गेल्या वर्षी फक्त १.३० लाख भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती, तर २०२३ मध्ये ही संख्या २.०९ लाख होती.

गेल्या वर्षी भारत आणि मालदीवमध्ये तणाव निर्माण झाला होता. मालदीवच्या एका मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती, या टीकेवरुन तणाव निर्माण झाला होता. या टीकेचा फटका मालदीवला बसला होता. या टीकेनंतर भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरवली होती. त्यावेळी मालदीवला मोठा फटका बसला होता. 

नितीश कुमारांनी भाजपा सरकारचा पाठिंबा काढला; मणिपूरच्या राज्यपालांना दिलं पत्र

त्यावेळी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांना भारताचे महत्त्व कळले होते, भारतासोबत घेतलेल्या पंगामुळे मालदीवला आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या होत्या, त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. भारतीय पर्यटक मालदीवपासून दूर राहिले होते, ज्याचा परिणाम देखील दिसून येत होता. २०२४ मध्ये मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत ३७.४७ टक्क्यांनी घट झाली.

अहवालानुसार, गेल्या वर्षी फक्त १.३० लाख भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती, तर २०२३ मध्ये ही संख्या २.०९ लाख होती. मालदीव हा एक बेट देश आहे आणि त्याची अर्थव्यवस्था येथे येणाऱ्या पर्यटकांवर चालते. भारतीय पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे मालदीवला अनेक महिने आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. गेल्या दीड दशकापासून, भारतीय पर्यटक मालदीवला भेट देणाऱ्या टॉप-१० देशांमध्ये आहेत. गेल्या दशकात भारत नेहमीच टॉप-५ देशांमध्ये राहिला आहे.

निवडणूक काळात भारताविरोधात विधान केले

२०२३ मध्ये भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले होते. भारताविरुद्ध घोषणाबाजी करून मोहम्मद मुइझ्झू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. त्यांनी बेट राष्ट्रातून भारतीय सैन्य परत पाठवण्याचा निर्णय घेतला, यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या नंतरच्या वक्तव्याने आगीत तेल ओतले. यानंतर मुइझ्झू यांनी कारवाई केली आणि मंत्र्यांवर कारवाई केली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नंतर एप्रिलमध्ये, भारतीय पर्यटकांची संख्या फक्त ७७८० वर आली, ही मागील महिन्यापेक्षा ५५% कमी होती.

टॅग्स :Maldivesमालदीव