शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

एका झटक्यात भारताने मालदीवला किंमत दाखवली; 'ते' विधान महागात पडले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:25 IST

गेल्या वर्षी फक्त १.३० लाख भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती, तर २०२३ मध्ये ही संख्या २.०९ लाख होती.

गेल्या वर्षी भारत आणि मालदीवमध्ये तणाव निर्माण झाला होता. मालदीवच्या एका मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती, या टीकेवरुन तणाव निर्माण झाला होता. या टीकेचा फटका मालदीवला बसला होता. या टीकेनंतर भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरवली होती. त्यावेळी मालदीवला मोठा फटका बसला होता. 

नितीश कुमारांनी भाजपा सरकारचा पाठिंबा काढला; मणिपूरच्या राज्यपालांना दिलं पत्र

त्यावेळी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांना भारताचे महत्त्व कळले होते, भारतासोबत घेतलेल्या पंगामुळे मालदीवला आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या होत्या, त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. भारतीय पर्यटक मालदीवपासून दूर राहिले होते, ज्याचा परिणाम देखील दिसून येत होता. २०२४ मध्ये मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत ३७.४७ टक्क्यांनी घट झाली.

अहवालानुसार, गेल्या वर्षी फक्त १.३० लाख भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती, तर २०२३ मध्ये ही संख्या २.०९ लाख होती. मालदीव हा एक बेट देश आहे आणि त्याची अर्थव्यवस्था येथे येणाऱ्या पर्यटकांवर चालते. भारतीय पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे मालदीवला अनेक महिने आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. गेल्या दीड दशकापासून, भारतीय पर्यटक मालदीवला भेट देणाऱ्या टॉप-१० देशांमध्ये आहेत. गेल्या दशकात भारत नेहमीच टॉप-५ देशांमध्ये राहिला आहे.

निवडणूक काळात भारताविरोधात विधान केले

२०२३ मध्ये भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले होते. भारताविरुद्ध घोषणाबाजी करून मोहम्मद मुइझ्झू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. त्यांनी बेट राष्ट्रातून भारतीय सैन्य परत पाठवण्याचा निर्णय घेतला, यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या नंतरच्या वक्तव्याने आगीत तेल ओतले. यानंतर मुइझ्झू यांनी कारवाई केली आणि मंत्र्यांवर कारवाई केली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नंतर एप्रिलमध्ये, भारतीय पर्यटकांची संख्या फक्त ७७८० वर आली, ही मागील महिन्यापेक्षा ५५% कमी होती.

टॅग्स :Maldivesमालदीव