शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

लांब पल्ल्याच्या बसला थांबा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST

भरधाव वाहनांवर कारवाईची गरज हिंगोली : शहरात दुचाकी वाहने चालिवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांच्या हातीही दुचाकी दिली ...

भरधाव वाहनांवर कारवाईची गरज

हिंगोली : शहरात दुचाकी वाहने चालिवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांच्या हातीही दुचाकी दिली जात आहे. अनेकवेळा लहान मुले भरधाव वाहने चालवीत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. पोलीस जिल्हाभरात कारवाईची मोहीम राबवीत आहे. मात्र तरीही अनेक जण पोलिसांना गुंगारा देत वाहने भरधाव चालवीत आहेत. याकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

रस्त्यावर वाहने उभी

हिंगोली : शहरातील काही प्रमुख मार्गावर अनेक चालक वाहने उभी करीत आहेत. अनेक तास वाहने एकाच ठिकाणी उभी राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. अनेकवेळा वादाचे प्रकार घडत आहेत. रस्त्याच्या कडेला धोकादायकरीत्या वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे.

शेळीपालन व्यवसायाला पसंती

हिंगोली: जिल्हाभरात लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे व्यवसाय कोलमडून पडले आहेत. त्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यातून सावरण्यासाठी अनेकांनी शेळीपालनाचा व्यवसाय करण्याला प्राधान्य दिले आहे. विविध कंपनीतून गावाकडे परतलेले ग्रामीण भागात युवक आता शेळीपालन करीत असल्याचे चित्र आहे. यातून चांगला नफा मिळत असल्याचे अनेक शेळीपालक सांगत आहेत.

टोमॅटो उत्पादक शेतकरी त्रस्त

हिंगोली : जिल्हाभरात अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. जमिनीत ओलावा व सिंचनासाठी पाणी असल्याने पीक चांगले आले आहे. मात्र अनेक ठिकाणी टोमॅटो पिकावर अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

विद्युत तारा लोंबकाळल्या

हिंगोली : तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. विंधन विहिरी, विहिरींना पाणी असल्याने पिकांना दिले जात आहे. मात्र ज्या विद्युत खांबावरून वीज घेतली आहे, अशा खांबांना जोडणाऱ्या विद्युत तारा अनेक ठिकाणी लोंबकळल्या आहेत. यामुळे धोका निर्माण होत आहे. शिवाय अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. याकडे लक्ष देऊन वीजतारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.

प्रवासी निवारा उभारण्याची मागणी

कळमनुरी : तालुक्यातील माळेगाव, आराटी, घोळवा फाटा येथून प्रवाशांची ये-जा असते. मात्र या ठिकाणी प्रवासी निवारे उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. जवळ पक्का निवारा नसल्याने पावसाळा व उन्हाळ्यात प्रवाशांना झाडाचा सहारा घ्यावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन या ठिकाणी प्रवासी निवारा उभारण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवा

कळमनुरी : तालुक्यात सध्या अनेक भागात रात्रीला शेतात वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीला शेतात जावे लागत आहे. यातही वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे शेतकरी वैतागले असून दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी होत आहे.