शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

लांब पल्ल्याच्या बसला थांबा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST

भरधाव वाहनांवर कारवाईची गरज हिंगोली : शहरात दुचाकी वाहने चालिवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांच्या हातीही दुचाकी दिली ...

भरधाव वाहनांवर कारवाईची गरज

हिंगोली : शहरात दुचाकी वाहने चालिवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांच्या हातीही दुचाकी दिली जात आहे. अनेकवेळा लहान मुले भरधाव वाहने चालवीत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. पोलीस जिल्हाभरात कारवाईची मोहीम राबवीत आहे. मात्र तरीही अनेक जण पोलिसांना गुंगारा देत वाहने भरधाव चालवीत आहेत. याकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

रस्त्यावर वाहने उभी

हिंगोली : शहरातील काही प्रमुख मार्गावर अनेक चालक वाहने उभी करीत आहेत. अनेक तास वाहने एकाच ठिकाणी उभी राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. अनेकवेळा वादाचे प्रकार घडत आहेत. रस्त्याच्या कडेला धोकादायकरीत्या वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे.

शेळीपालन व्यवसायाला पसंती

हिंगोली: जिल्हाभरात लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे व्यवसाय कोलमडून पडले आहेत. त्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यातून सावरण्यासाठी अनेकांनी शेळीपालनाचा व्यवसाय करण्याला प्राधान्य दिले आहे. विविध कंपनीतून गावाकडे परतलेले ग्रामीण भागात युवक आता शेळीपालन करीत असल्याचे चित्र आहे. यातून चांगला नफा मिळत असल्याचे अनेक शेळीपालक सांगत आहेत.

टोमॅटो उत्पादक शेतकरी त्रस्त

हिंगोली : जिल्हाभरात अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. जमिनीत ओलावा व सिंचनासाठी पाणी असल्याने पीक चांगले आले आहे. मात्र अनेक ठिकाणी टोमॅटो पिकावर अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

विद्युत तारा लोंबकाळल्या

हिंगोली : तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. विंधन विहिरी, विहिरींना पाणी असल्याने पिकांना दिले जात आहे. मात्र ज्या विद्युत खांबावरून वीज घेतली आहे, अशा खांबांना जोडणाऱ्या विद्युत तारा अनेक ठिकाणी लोंबकळल्या आहेत. यामुळे धोका निर्माण होत आहे. शिवाय अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. याकडे लक्ष देऊन वीजतारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.

प्रवासी निवारा उभारण्याची मागणी

कळमनुरी : तालुक्यातील माळेगाव, आराटी, घोळवा फाटा येथून प्रवाशांची ये-जा असते. मात्र या ठिकाणी प्रवासी निवारे उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. जवळ पक्का निवारा नसल्याने पावसाळा व उन्हाळ्यात प्रवाशांना झाडाचा सहारा घ्यावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन या ठिकाणी प्रवासी निवारा उभारण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवा

कळमनुरी : तालुक्यात सध्या अनेक भागात रात्रीला शेतात वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीला शेतात जावे लागत आहे. यातही वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे शेतकरी वैतागले असून दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी होत आहे.