शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काटावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

मंदिरे उघडायला हवीत काय ; कोणत्या पक्षाला काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST

हिंगोली जिल्ह्यात श्रावण महिन्यात विविध ठिकाणच्या महादेव मंदिराच्या पायरीचे दर्शनच घेऊन जाण्याची वेळ भाविकांवर आली होती. कोरोनाचा कहर हिंगोली ...

हिंगोली जिल्ह्यात श्रावण महिन्यात विविध ठिकाणच्या महादेव मंदिराच्या पायरीचे दर्शनच घेऊन जाण्याची वेळ भाविकांवर आली होती. कोरोनाचा कहर हिंगोली जिल्ह्यात बऱ्यापैकी कमी झाला आहे. मात्र राज्यात अनेक ठिकाणी अजूनही कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली नाही. त्यामुळे शासनाकडून काही उपाययोजना, प्रतिबंध अजूनही कायम ठेवण्यात आलेले आहेत. त्यातच श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. तर शिव भक्तांची संख्या मोठी असल्याने शिवालयांमध्येही मोठी गर्दी असते. मात्र यंदा कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यातच विविध धार्मिक स्थळांची उलाढालही ठप्प झाली आहे. याचा फटका त्या त्या ठिकाणच्या अर्थकारणाला बसला आहे. यामुळेही मंदिरे उघडण्याची मागणी होऊ लागली आहे.

आधी कोरोना संपू दे - बांगर

हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, राज्यातील कोरोना संपू दे, असे देवाला साकडे घातले आहे. लोकांचा जीवही तेवढाच महत्त्वाचा आहे. कोरोना संपला की, मंदिरे खुली होतीलच. तोपर्यंत सबुरीने घेतले पाहिजे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सांगितले.

लोकांचा जीव महत्त्वाचा- बोंढारे

आपल्याकडे धार्मिक भावना प्रखर आहे. मंदिरे उघडली की, गर्दीने कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. दुसरीकडे लोकांचा जीवही महत्त्वाचा आहे. कोरोना संपल्यावरच मंदिरे उघडावीत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी दिली.

महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्यातही मंदिरे बंद आहेत. मात्र कोणी आंदोलन केले म्हणून जनतेचा जीव धोक्यात घालता येत नाही. त्यामुळे कोरोना संपल्यावरच मंदिरे उघडावीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली.

सगळे सुरू, मंदिरेच का बंद?

सगळे सुरू केले. कोरोनाही कमी झाला. मग, मंदिरेच का बंद केली जात आहेत. सरकार जाणीवपूर्वक धार्मिक भावनांशी खेळत आहे. यात लघुउद्योग लयाला जात आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.

चार कोटींवर उलाढाल ठप्प

हिंगोली जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा येथील नागनाथ मंदिर, नर्सी येथील नामदेव मंदिर व इतर शेकडो मंदिरांजवळ किरकोळ विक्रेत्यांना बेल, फूल, हार, प्रसाद आदींची चार ते पाच कोटींची होणारी उलाढाल ठप्प झाली आहे.

अनेक मंदिरासमोरील या विक्रेत्यांना पर्यायी मार्ग स्वीकारावा लागला आहे. मंदिरे सुरू होण्यासाठी त्यांना अजूनही आस आहे.