शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

प्लॉटच्या तुकडा बंदीमुळे बजेटमधील घर महागणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:04 IST

हिंगोली: अकृषिक जमिनीचे (एन.ए.) प्लाॅट) तुकडे पाडून खरेदी-विक्री करण्यासाठी आता सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार आहे. ...

हिंगोली: अकृषिक जमिनीचे (एन.ए.) प्लाॅट) तुकडे पाडून खरेदी-विक्री करण्यासाठी आता सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार आहे. शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. पण दुसरीकडे बजेटमधील घर मात्र महागणार असे दिसते.

एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे. त्याच सर्व्हे नंबरमधील कोणी एक, दोन अथवा शेती तीन गुंठे जागा विकत घेणार असेल तर त्याची दस्त नोंदणी होणार नाही. मात्र याच सर्व्हे नंबरचा ले-आऊट करून त्यामध्ये एक, दोन गुंठ्याचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशा मान्य ले-आऊटमधील एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार आहे. एकंदर घरांच्या किमती महागणार असल्या तरी गरिबांना मात्र या शासनाच्या निर्णयामुळे फायदाच होणार आहे.

कलम ८ (ब) काय सांगते

यापूर्वीच ज्या पक्षकाराने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरेदी घेतली असेल तर अशा प्लाॅट तुकड्याच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सुद्धा कलम ८ (ब) नुसार सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक आहे.

सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक

प्लाॅटचे खरेदीखत ले-आऊट नसेल तर खरेदी-विक्री व्यवहार सुरळीत होणार नाही. यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यास दस्त नोंदणी करता येऊ शकते. विशेष म्हणजे नियमांचे पालनही करावे लागणार आहे.

-आर. पी. गायकवाड, प्रभारी दुय्यम निबंधक

बांधकाम व्यावसायिकांनी केले स्वागत

अकृषिक जमिनीचे (एनए प्लॉट) संदर्भात शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्हच आहे. शासनाच्या या निर्णयामुळे गरिबांना एक प्रकारे फायदाच होणार आहे. जमीनमालक एक गुंठा तुकडा विकू शकतो. पण रेखांकन मंजूर करून.

-प्रसन्ना बडेरा, व्यावसायिक

अकृषिक जमिनीचे (एनए प्लॉट)च्या संदर्भात शासनाने अध्यादेशाद्वारे जो निर्णय घेतला आहे तो गरिबांसाठी हितावहच आहे. यामुळे खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता राहणार असून, गरिबांना लाभ होणार आहे.

विनोद मुथा, व्यावसायिक

मोठ्या जागेसाठी पैसा आणणार कोठून?

शासनाने प्लाॅट तुकडाबंदीचा जो निर्णय घेतला आहे. तो गरिबांच्या फायद्यासाठीच आहे. घरे महागणार असली तरी शासनाचा निर्णय गरिबांसाठी लाभाचा आहे. पण मोठ्या जागेसाठी पैसा आणणार कोठून असाही प्रश्न अनेकांनी केला.

महागाईने आधीच कळस गाठला आहे. रंगरंगोटी करायला पैसा जवळ नाही. बांधकामाला वाळूही मिळेना झाली आहे. तेव्हा मोठ्या जागेसाठी पैसा आणणार कोठून असा प्रश्न शहरातील काही नागरिकांनी उपस्थित केला आहे.