शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

जिल्ह्यातील नर्सरी, केजीच्या २२ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST

हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर जगभर कोरोनाचा कहर वाढल्याने शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. त्यात दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर ...

हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर जगभर कोरोनाचा कहर वाढल्याने शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. त्यात दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर बारावीच्या परीक्षांचे भिजत घोंगडे कायम आहे. मागील वर्षभरात नर्सरीच्या मुलांना तर बडबडगीत अथवा पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडेही मिळाले नाही. ग्रामीण भागातील अंगणवाड्याही बंद आहेत. मोठ्या इंग्रजी शाळांत एकीकडे मोठे शुल्क भरूनही केजी १ व २ च्या विद्यार्थ्यांना वर्षभर शाळेत जाता आले नाही. या वर्गातील मुलांना ऑनलाइन शिक्षण देणेही तेवढेच अवघड होते. मात्र, त्यातही काही ठिकाणी प्रयोग झाले. ते कितपत यशस्वी ठरले हे आगामी काळातच कळणार आहे. मात्र, तूर्त तरी हे वर्ग म्हणजे सोपस्कारच होते, असे चित्र आहे. आता तिसरी लाट येण्याची भीती आहे. या लाटेत तर लहान मुलांनाच जास्त धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम म्हणून तयारी सुरू झाली आहे. प्रशासन लहान मुलांच्या आरोग्यासाठी यंत्रणा उभी करत आहे. त्यामुळे शाळा सुरू करून संक्रमणवाढीचा धोका पत्करला जाण्याची शक्यता कमीच आहे.

जिल्ह्यातील नर्सरी टू केजीच्या शाळा १०८९

२०१८-१९

विद्यार्थीसंख्या २२११२

२०१९-२०

विद्यार्थीसंख्या २३१८५

२०२०-२१

विद्यार्थीसंख्या २२८५२

मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम, ही घ्या काळजी

मुलांना शाळेची ओळखच ऑनलाइनमुळे होत नसल्याचे दिसत आहे. त्यातच सतत घरी राहूनच अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे माेबाईलचा अनावश्यक वापरही वाढू शकतो. त्यामुळे पालकांनीही स्वत:हून त्यांना अभ्यास व वेगळे राहून खेळता येणाऱ्या खेळात गुंतविले पाहिजे.

-देवीदास गुंजकर

वर्षभर कुलूप; यंदा?

मागच्या वर्षी ऑनलाईन नियोजन करून नर्सरी ते केजीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. त्यांना थेट शिक्षक शिकवितात. यात पालकांना थोडा त्रास होतो. त्यांची परीक्षाही घेतली. यंदाही परिस्थिती अवघड आहे. त्यामुळे ऑनलाइन घेण्याचे नियोजन करावे लागेल. शाळेची अनुभूती मिळावी, अशी काळजी घेतली.

-गजेंद्र बियाणी, संस्थाचालक

सरत्या वर्षातही ऑनलाइन वर्ग चालवूनच नर्सरी ते केजीच्या मुलांनाही शिक्षण दिले. त्यात अडचणी आल्या. मात्र, पालकांना सूचना देत अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑनलाइनच शिक्षण द्यावे लागेल, असे दिसते.

दिलीप चव्हाण, संस्थाचालक

गेल्या र्षी नर्सरीपासून ते सर्वच वर्गाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे लागले. यंदाही तीच परिस्थिती उद्भवू नये, यासाठी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांचे लसीकरण करून ही वेळ येणार नाही. याची काळजी घ्यावी. हा एकमेव उपायच सध्या तरी दिसत आहे.

दिलीप बांगर, संस्थाचालक

पालकही परेशान

कृतीयुक्त, मनोरंजक शिक्षणाची केवळ औपचारिकता ऑनलाइनमधून पूर्ण होते. प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष जात नाही. त्यामुळे मुलांना न्यूनगंड निर्माण होण्याची भीती आहे.

उमेश कुटे, पालक

नर्सरी ते केजीची मुले लहान असतात. त्यांना प्रत्यक्ष शिक्षणाचीच गरज आहे. मात्र, नाईलाजाने ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यावरही लक्ष ठेवावे लागते.

देवदत्त देशपांडे, पालक

शाळेत गेल्यावर शिक्षकांसमोर गांभीर्य असते. ऑनलाइनमध्ये ते गांभीर्य उरत नाही. परीक्षाही ऑनलाइनमुळे मुलांची खरी गुणवत्ता कळत नाही.

-श्रीपाद गारुडी, पालक