शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

हिंगोलीत कर्जमाफीचे ८0 कोटी खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:00 IST

कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील जवळपास १ लाख ५ हजार शेतकºयांनी अर्ज केले असून त्यापैकी ३४ हजार २११ शेतकºयांसाठी ११५.८0 कोटी आले असून ८0 कोटी प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले आहेत. आता ज्यांचे अर्ज शिल्लक आहेत त्यांना पुन्हा बँकेत याद्या लागल्यावर त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत.

ठळक मुद्देहिंगोली : ३४ हजार शेतक-यांसाठी ११५.८0 कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील जवळपास १ लाख ५ हजार शेतक-यांनी अर्ज केले असून त्यापैकी ३४ हजार २११ शेतक-यांसाठी ११५.८0 कोटी आले असून ८0 कोटी प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले आहेत. आता ज्यांचे अर्ज शिल्लक आहेत त्यांना पुन्हा बँकेत याद्या लागल्यावर त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतक-यांनी रांगा लावल्या होत्या. १ लाख ५ हजार शेतकºयांनी अर्ज भरले होते. त्यापैकी दुबार किती हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मात्र ज्यांनी अर्ज भरले त्यातील अनेकांच्या अर्ज व बँकेच्या माहितीत मोठी तफावत आढळून आल्याचे निदर्शनास येत असल्यास असे अर्ज तूर्त बाजूला ठेवले आहेत. या सर्व अर्जदारांची यादी बँकांना पाठविली जाणार आहे. बँका ही यादी आपल्या नोटीस बोर्डावर डकवतील. त्यानंतर यातील त्रुटी दूर करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी पुन्हा शेतकºयांना रांगा लावून बँकेत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर ही यादी पुन्हा तालुकास्तरीय समितीकडे जाणार आहे. या समितीकडून पडताळणी झाल्यानंतरच संबंधित शेतकºयांच्या कर्जमाफीचे भवितव्य ठरणार आहे.येत्या पंधरा दिवसांत या शेतकºयांच्या याद्या मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरच यात खºया अर्थाने कर्जमाफीपासून वंचितांचा आकडा समोर येणार आहे. मात्र ही वेळखाऊ प्रक्रिया ठरत आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १९ हजार १00 लाभार्थ्यांचे २३.८९ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांच्या १0 हजार ३११ शेतकºयांचे ६२.१४ लाख, तर ग्रामीण बँकेच्या ४७२0 खातेदार शेतकºयांचे २९.८२ कोटी रुपये कर्जमाफीत प्राप्त झाले आहेत.यात मध्यवर्तीचे १७ ६६३ जणांचे २३.३१ कोटी, राष्ट्रीयकृतचे ५६९६ जणांचे ३४.७७ कोटी तर ग्रामीण बँकेत ४0५२ जणांचे २३.६९ कोटी असे ८0.७८ कोटी प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले आहेत.रबी हंगाम : ६.२३ टक्के कर्जवाटपयंदाच्या रबी हंगामासाठी शेतकºयांना अवघे ९.७२ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. यंदा शेतकºयांना कर्जमाफीची आस लागल्याने खरीप हंगामात अनेकांनी कर्ज घेणे टाळले होते. मात्र रबी हंगामापूर्वी या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असता तर अनेकांना रबीसाठी आवश्यक कर्ज घेणे शक्य होत होते. तसेही यंदा चांगले पर्जन्य नसल्याने रबीचा पेरा घटला अन् आहे ते पीकही फारसे चांगले नाही. रबीत जि.म.स.ने कर्ज वाटलेच नाही. राष्ट्रीयीकृत बँकांनी ५२८ जणांना ८.0५ कोटी तर ग्रामीण बँकेने ३६८ जणांना १.0६ कोटी रुपये वाटले.