शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नातवंडांना मांडीवर खेळवायचं ना? -मग महिलांनी या गोष्टी करायलाच हव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 17:44 IST

नियमित तपासणी करून स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं.

ठळक मुद्देमहिलांचं आरोग्याकडे दुर्लक्ष नकोनियमित तपासण्या गरजेच्याचाळीशीनंतर अधिक काळजी गरजेचीदीर्घकाळ लुटता येईल आयुष्याचा आनंद

- मयूर पठाडेकोणतीही स्त्री घ्या, ती एकवेळ आपल्या दिसण्याकडे लक्ष देईल, आपण ठीकठाक दिसतो की नाही याची काळजी घेईल, याला त्याला ब्युटी टिप्स विचारेल, चेहºयाच्या सौंदर्याची तर वारेमाप काळजी घेईल, त्यासाठी इंटरनेटपासून तर जो जे काही सांगेल, ते सारं भक्तिभावानं करील, पण आपल्या आरोग्याची काळजी घ्या, सांगितलं, तर त्याकडे सहजपणे दुर्लक्ष करील.बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत असाच प्रकार आपल्याला दिसून येतो. घरासाठी, परिवारासाठी झटत असताना त्या प्रत्येकासाठी सारं काही करतील, पण आरोग्याच्या बाबतीत स्वत:साठी काही करायचं म्हटलं, तर नेहमीच चालढकल केली जाते. नंतरच्या काळात केव्हा ना केव्हा याचा फटका त्यांना बसतोच.त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष न करता काही गोष्टी महिलांनी करायला हव्यातच. स्वत:च्या काही चाचण्या त्यांनी नियमितपणे करवून घ्यायला हव्यातच. आपल्या मुलांवर, नातवंडांवर कोणत्याही स्त्रीचा अपार जीव असतो. आपल्या नातवंडांबरोबर खेळायला, त्यांच्यासाठी काही करायलाही त्यांना फारच आवडतं. पण नातवंडांबरोबर खेळायचं असेल तर स्वत:च्या आरोग्याकडे त्यांनी लक्ष द्यायलाच हवं.

महिलांनी या चाचण्यांवर द्यावं लक्ष१- स्मिअर टेस्ट-गर्भाशयाच्या कॅन्सरनं त्रस्त झालेल्या अनेक स्त्रिया दिसतात. याचं कारण वेळीच त्याकडे लक्ष न दिल्यामुळे. त्यासाठीची स्मिअर टेस्ट ही एक चाचणी आहे. दर तीन वर्षांतून एकदा ही चाचणी केली पाहिजे. ही चाचणी केल्यास त्यासंदर्भात वेळीच माहिती मिळू शकेल.२- ब्लड प्रेशर-या गोष्टीकडे अनेक जण अगदी कॅज्युअली बघतात. पण तुम्हाला हृदयविकार किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकण्याची ती निदर्शक आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर कमी जास्त असण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.३- कोलेस्टेरॉल-आपल्या शरीरातील कोलेस्टोरॉलचं प्रमाण किती आहे हे वेळोवेळी तपासलं पाहिजे. एका साध्या टेस्टद्वारे हे कळू शकतं. तुमच्या शरीरातून अगदी थोडंसं रक्त इंजेक्शनद्वारे काढलं जातं, त्यातून हृदयविकाराची शक्यताही स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे वयाच्या चाळीशीनंतर ही चाचणी नियमित करायलाच हवी.४- संपूर्ण शरीराची तपासणी-बºयाचदा आपल्याला काही आजार आहे किंवा काय, याची लक्षणं आपल्याला दिसत नाहीत. अनेकदा तर ती कळतही नाहीत. अचानक काही झाल्यावर कळतं, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. त्यामुळे प्रत्येक महिलेनं चाळीशीनंतर ही तपासणी करवून घ्यायला हवी.5- डोळ्यांची तपासणी-चाळीशीनंतर जवळपास सगळ्यांनाच चष्मा लागतो. दृष्टी कमी झालेली असते. पण काही गोष्टी फक्त चष्मा लावून सुटत नाहीत. मोतीबिंदूसारख्या गोष्टींसाठी तुम्हाला आॅपरेशनच करावं लागतं, नाहीतर तुमची दृष्टी आणखी खराब होऊ शकते.त्यामुळे आपल्या स्वत:च्या आरोग्याकडे महिलांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे आणि वेळोवेळी तपासणीही केली पाहिजे.