शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

एसटीच्या मोफत प्रवासापासून सिकलसेलग्रस्त वंचित

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

एसटीच्या मोफत प्रवासापासून सिकलसेलग्रस्त वंचित

एसटीच्या मोफत प्रवासापासून सिकलसेलग्रस्त वंचित
-अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा : शासनाने केली १५.११ कोटींची तरतूद

नागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा मोफत प्रवासाचा लाभ सिकलसेलग्रस्तांना मिळावा म्हणून शासनाने १५.११ कोटींची तरतूद केली खरी, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सिकलसेलचे रुग्ण या लाभापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या समस्येसोबतच सिकलसेलग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी सिकलसेल केंद्र नागपूरला हलवावे, अशी मागणी सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी केली आहे.
रामटेके यांना माहितीच्या अधिकाऱ्यात मिळालेल्या माहितीनुसार शासनाने २०१४-१५ साठी १५.११ कोटी रु पये सिकलसेलग्रस्तांना दिले आहेत. यात आदिवासी विभागाने १२.५६ कोटी, सामाजिक न्याय विभागाने १.८८ कोटी रु पये आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने ०.६६ कोटी रु पये दिलेले आहेत. परंतु ही रक्कम एसटी महामंडळाकडे वळतीच करण्यात आलेली नाही.
सिकलसेल आजाराची जागतिक स्तरावर गंभीर आजारांमध्ये नोंद आहे. सिकलसेल रु ग्णांवर नेहमी मृत्यूची तलवार टांगलेलीच असते, अशा रु ग्णांचा जीव वाचवणारे औषधोपचार फक्त शासकीय जिल्हा रु ग्णालये किंवा शासकीय वैद्यक महाविद्यालयांमध्येच उपलब्ध आहेत. विशेषत: या आजाराचे रुग्ण मुख्यत्वे खेड्यापाड्यात, आदिवासी व मागासवर्गीयात आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयापर्यंत पोहचण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून गेल्या १४ वर्षांपासून एस.टी. बस प्रवास भाड्यात सवलत मिळावी म्हणून रामटेके प्रयत्नशील होते. त्यांनी आंदोलनेही केली. अखेर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या रु ग्णांना एका मदतनिसासह मोफत एस.टी. प्रवासाची सवलतीची घोषणा केली. २०१४-१५ साठी १५.११ कोटी रु पयांची तरतूदही करण्यात आली. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही रक्कम एसटी महामंडळाकडे वळतीच केली नाही. परिणामी नागपूरसह विदर्भातील अडीच लाख सिकलसेलग्रस्त या लाभापासून वंचित राहिले आहेत.
-रुग्णांना दिलासा द्यावा
रामटेके यांनी सांगितले, माजी मुख्यमंत्र्यांकडून मोफत एस.टी. प्रवासाची सवलतीची घोषणा झाल्यानंतर नियमावली बनविण्यासाठी मुंबईत एनआरएचएमद्वारे आमंत्रितही करण्यात आले होते. आता आर्थिक बजेट आहे तेव्हा शासनाने परिपत्रक काढून रु ग्णांना दिलासा द्यावा, तसेच या वर्षी उरलेला निधी पुढील वर्षीच्या खर्चासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी आहे.