शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

आक्छीऽऽ.. कितीही आॅकवर्ड वाटलं तरी शिंक कधीच दाबून ठेऊ नका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 16:13 IST

शिंकण्यापेक्षा शिंक दाबून ठेवणं जास्त घातक आहे..

ठळक मुद्देकानाच्या पडद्यांवर दाब येतोडोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो सायनसच्या त्रासाला सामोरं जावं लागू शकेलमेंदूलाही पोहोचू शकतो आघात

- मयूर पठाडेचारचौघांत शिंक आली आणि तीही मोठ्यानं तर आपल्याला किती चोरासारखं होतं ना?.. स्वत:चीच लाज वाटते. सर्दी झाली असेल तर परत परत शिंका येणार नाही याचीही किती काळजी आपण घेतो...त्यामुळे नाक चोंदतं, लालेलाल होतं, काहीतरी अस्वस्थ फिलिंगही येतं, पण तरीही आपण ते करतो. कारण काय? - तर ते विचित्र दिसतं..तोंडावर रुमाल न ठेवता शिंकणं तसं चुकीचंच. त्यामुळे सर्दी-पडसं, खोकला, तापासारखे सर्वसामान्य आजार तर पसरतातच, पण सार्वजनिक आरोग्य बिघडण्यात मोठा हातभारही लागतो.स्वाईन फ्लूसारखे आजारही शिंकेमुळे पसरू शकतात. आपल्याला लक्षात येत नाही, पण शिंकेमुळे नाकातून बाहेर पडणारे पाण्याचे कण फार लांबपर्यंत जातात. अगदी तीस फुटापर्यंतही. आणि त्यांचा वेगही बराच असतो. त्यामुळे शिंक आल्यावर नाकावर रुमाल ठेवणं केव्हाही चांगलं, पण कितीही आॅकवर्ड वाटलं तरी शिंक दाबून मात्र ठेऊ नका..ते आपल्यासाठी फारच घातक आहे.शिंक दाबून ठेवल्यानं काय होईल?१- शिंक आलेली असताना आपण ती दाबून ठेवली तर आपल्या कानांना इजा होण्याची शक्यता असते. कानाच्या पडद्यांवर त्यामुळे अतिरिक्त दाब येतो.२- शिंक बळजबरी दाबून ठेवली तर डोळ्यांवरही परिणाम होऊ शकते. डोळ्यांजवळची ब्लड व्हेसल त्यामुळे ओपन होऊ शकते.३- इतकंच नाही, आलेली शिंक परतवली तर सायनसचा त्रास सुरू होऊ शकतो आणि अगदी आपल्या कवटीपर्यंत, मेंदूपर्यंत त्याचा आघात पोहोचू शकतो.अर्थात कुठलेही आघात, आजार दुरुस्त करण्यासाठी आपली बॉडी नॅचरली प्रयत्न करीत असते, तो डॅमेज बºयाचदा बॉडी स्वत:च भरुनही काढते, पण प्रत्येकवेळी ते शक्य होईलच असं नाही.त्यामुळे शिंक आली तर येऊ द्या, काळजी तेवढी घ्या. घरात, सार्वजनिक ठिकाणी कुठेही तुम्ही असलात, तरी लगेच तोंडावर नाकावर रुमाल ठेवा. गरज पडली तर तातडीने त्यावर उपचारही करा, पण ‘वाईट दिसतं’ म्हणून शिंकच दाबून ठेवण्याचा आततायी प्रकार कधीच करू नका.