शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

आनंदी व्हायला पैसे थोडीच लागतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 15:04 IST

करुन पाहा हे सोप्पे आठ उपाय आणि घ्या जीवनाचा आनंद नव्यानं.

ठळक मुद्देसकारात्मक विचाराच्या लोकांसोबत राहा.इतरांना मदत करा.स्वत:तल्या चांगल्या गोष्टी शोधा.कोणतीही जबाबदारी घ्या आणि ती तडीस न्या.

- मयूर पठाडेआपल्या आजूबाजूचं वातावरणच बºयाचदा असं असतं की, नकारात्मक विचारांनी आपलं मन पूर्णत: व्यापलेलं असतं. नेहमी हसत राहा, प्रसन्न राहा, काळजी करू नका.. त्यानं तुमच्या वर्तमानात काहीही फरक पडणार नाही.. आता हे काही आपल्याला माहीत नाही असं नाही. पण रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक ताणांना आपल्याला सामोरं जावं लागतं, अशावेळी नकारात्मक विचारांपासून दूर राहावं तरी कसं?..अनेकांना हा प्रश्न पडतो, पण लक्षात ठेवा त्यावरही उपाय आहेत. नकारात्मक विचारांनी काहीच होणार नाही, झालंच तर आपलं टेन्शन आणि डोकेदुखी तेवढी वाढेल, हे तुम्हालाही माहीत आहे.. मग करुन पाहा या गोष्टी. त्यानं तुमचं टेन्शनही कमी होईल आणि नकारात्मक गोष्टीही दूर पळतील.कसे घालवाल नकारात्मक विचार?१- सकात्मक विचारांच्या, कायम प्रफुल्लित दिसणाºया लोकांच्या, तशाच प्रकारच्या आपल्या मित्रमंडळींसमवेत, कुटुंबियांसमवेत राहाण्याचा प्रयत्न करा. त्यांची सकारत्मकता तुम्हालाही प्रफुल्लित करील२- ध्यानधारणा किवा योगाचा आधार घ्या. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल आणि मुख्य म्हणजे वर्तमानात राहायला त्यामुळे मदत होईल.३- ताणातही हसणं, हसत राहाणं अवघड आहे, असं कोणीही म्हणेल, पण करुन तर पाहा, अगदी आर्टिफिशिअल हसण्यानंही फायदा होतो हे संशोधनांतून सिद्ध झालं आहे.४- नकारात्मक विचार आपल्याला गाठणार नाहीत, यासाठी कायम सकारात्मक गोष्टींचा विचार करा. तरीही नकारात्मक विचार येतीलच, पण त्यांचं प्रमाण खूपच कमी होईल एवढं नक्की.५- कुठल्याही गोष्टीची स्वत:हून जबाबदारी घ्या. एकदा का अशी जबाबदारी घेतली की ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण स्वत:हून करतो. त्यात गुंतल्यामुळे इतर गोष्टींवरचा, नकारात्मक वेळ आपोआपच दूर जातो.६- अगदी काहीच नाही, तर इतरांना मदत करा. कोणत्याही गोष्टीत. घरी आईला, बायकोला, बहिणीला, रस्त्यावरच्या कुणा गरजूला, आॅफिसात.. ही मदत किती का किरकोळ असेना, पण ती नक्की तुमच्या मनांत आनंदी विचारांची रुजवात करील.७- आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जगातला कोणताच माणूस परफेक्ट नाही. कोणालाही कोणत्याही भावभावना आणि नकारात्मकता चुकलेली नाही. प्रत्येकालाच त्या चक्रातून जावं लागतं. त्यामुळे त्याचं फार टेन्शन घेण्याची गरज नाही. खांदे झटका आणि पुन्हा कामाला लागा. बघा, काय फरक पडतो ते.८- भले नकारात्मक विचारांनी तुम्ही भारलेले असाल, पण एक गोष्ट करा, आपल्याकडे काय चांगल्या गोष्टी आहेत त्याचाही एकदा विचार करा. थेट लिहूनच काढा ना ते.. तुमच्या लक्षात येईल, रडत, कुढत बसण्यापेक्षा करायच्या अशा अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत.