शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

‘कुटुंब नियोजना’त महिलांची आघाडी

By admin | Updated: February 25, 2015 00:18 IST

आधुनिक तंत्रज्ञान कितीही मोठ्या प्रमाणात वाढले तरी, स्त्री-पुरूष समानता आजही केवळ कागदावरच आहे. समाजात असलेल्या अनेक गैरसमजांचा पगडा ..

लोकमत विशेषप्रशांत देसाई भंडाराआधुनिक तंत्रज्ञान कितीही मोठ्या प्रमाणात वाढले तरी, स्त्री-पुरूष समानता आजही केवळ कागदावरच आहे. समाजात असलेल्या अनेक गैरसमजांचा पगडा आरोग्य विभागही अद्याप दूर करून न शकल्याने कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट समाधानकारक असले तरी ते महिलांच्या बाबतीत म्हणायला हवे. कारण गेल्या दहा महिन्यात शस्त्रक्रिया केलेल्या जिल्ह्यातील महिलांची संख्या ३,९९५ आहे. तर, केवळ १,०८६ पुरूषांनीच शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला आहे. जग कितीही आधुनिकतेकडे गेले तरी पुरूषांना कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यातही कमीपणा वाटतो, हे चित्र आजही ठळकपणे दिसत आहे.पुरूषप्रधान संस्कृतीने पुरूषांना बाहेरचे क्षेत्र जणूकाही बहाल केले होते. आणि स्त्रीने केवळ 'चूल आणि मूल' सांभाळणे एवढीच तिची जबाबदारी ठरवून दिली होती. मात्र, काळ बदलला आणि स्त्रीला तिच्या हक्कांची जाणीव होऊ लागली. त्यामुळे शिक्षणातही स्त्रीया अग्रक्रमाने येऊ लागल्या. शिक्षणामुळे स्वावलंबी झाल्याने विविध पदांवर काम करून लागल्या. काही कालावधीनंतर तर पुरूषांच्या बरोबरीने अर्थार्जन करणे, ही काळाची गरज बनली. स्त्रीने स्वत:ला सक्षम बनवत सर्व क्षेत्रात पदार्पण केले असले तरीही अजूनही निर्णयप्रक्रियेत तिला डावलले जाते. ही स्थिती ग्रामीण भागातच नव्हे तर अगदी शहरी भागातही दिसून येत आहे. म्हणूनच आज २१ व्या शतकातही लिंगभेदाचे प्रकार मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. स्त्रीपुरूष समानतेचा डांगोरा समाजाने कितीही पिटला तरी आजही असमानता आहे. याचा प्रत्यय आरोग्य विभागाच्या कुटूंब कल्याण कार्यक्रमात येतो. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी 'कुटूंब लहान, सुख महान' चा नारा देत शासनाने कुटूंब कल्याण मोहिम राबविली. एक किंवा दोन मुलांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या दांपत्याला प्रोत्साहनात्मक योजना राबविण्यास सुरूवात केली. मात्र, ही शस्त्रक्रिया केली तर पुरूष शारीरिक कष्टाची कामे करण्यात कमजोर होतो. या गैरसमजाबरोबरच समाजातील आपल्या प्रतिमेला धक्का लागेल या अहंकारामुळे पुरूष ही शस्त्रक्रिया करून घेण्यास तयार नाहीत.खरंतर पुरूष शस्त्रक्रिया ही स्त्री शस्त्रक्रियेपेक्षा अतिशय सुलभ आणि वेदनारहित आहेत. पण ती पुरूषाला कमजोर करणारी नाही, याबाबत आरोग्य विभागाकडून पुरेसे प्रबोधनही होत आहे. एवढेच नव्हे तर प्रोत्साहनासाठी शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरूषांना १,४०० रूपयांपर्यंत रक्कमही दिली जात आहे. मात्र, तरीही कुटूंब कल्याण शस्त्रक्रियेबाबत पुरूष मागे राहत आहेत. ही स्थिती ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही आहे. जिल्ह्याला ५,१३० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. यापैकी एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्याच्या कालावधीत ५,०८१ शस्त्रक्रियांची उद्दिष्टपूर्ती झाली असली त्यात ३,९९५ शस्त्रक्रिया महिलांच्या तर पुरूषांवरील शस्त्रक्रिया केवळ १,०८६ इतक्याच आहेत.पुरूष शस्त्रक्रियेसाठी जिल्हा आरोग्य विभागाला केवळ २२० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले आहे. आरोग्य विभागाने १,०८६ जणांनी शस्त्रक्रिया करून उद्दिष्ट्यपूर्तीपेक्षा जास्त काम केले आहे. हा अपवाद वगळल्यास पुरूषांची महिलांशी तुलना केल्यास फारच अत्यल्प आहे.वित्तीय वर्ष संपायला आता केवळ एकच महिना शिल्लक आहे. पुरूष उद्दिष्टांपैकी आतापर्यंत ८८ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. मात्र, आता उरलेल्या काळात किती उद्दिष्ट पूर्ण होईल, हे सांगता येणे कठिण आहे. आतापर्यंतच्या काळात पुरूष शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी आहे. आर्थिक दुर्बल असलेले पुरूष लाभ मिळतो. म्हणून शस्त्रक्रिया करण्यात पुढे येतात. मात्र, इतरांची पुरूषी मानसिकताच आडवी येते, हे सत्य आहे. शस्त्रक्रिया करायची झाली तर ती महिलेनेच करायची, असा अलिखित नियमच पडून गेला आहे. पुरूषाला नसबंदीसाठी प्रवृत्त करण्यासाठी विविध प्रकारे जागृतीही होत आहे. पण तरीही हे प्रमाण अजून वाढलेले नाही.मुदतठेव उपलब्ध सावित्रिबाई फुले कन्या कल्याण योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील एखाद्या विवाहित जोडप्याने एकच अपत्य, तेही मुलगी असताना कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १० हजार रूपये रक्कमेची मुदतठेव उपलब्ध करून देण्यात येते. दोन मुलींच्या जन्मानंतर, मुलगा नसताना कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली असेल तर त्या दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी ५,००० रूपये प्रमाणे १०,००० रूपये रक्कमेची १८ वर्षांची मदतठेव देण्यात येते.दोन मुलानंतर पाळणा कायमचा थांबविण्यासाठी शक्यतो पतीने नसबंदी शस्त्रक्रिया करून घ्यावी.पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया ही स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा कितीतरी सोपी आहे. बिनटाक्याची पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया आता फक्त तीन मिनीटात होते.स्त्री शस्त्रक्रिया दवाखान्यात सात दिवस भरती व्हावे लागते पण पुरूष शस्त्रक्रियेसाठी भरती होण्याची गरज नाही.तसेच शस्त्रक्रियेमुळे कमजोरी येत नाही.पुरूष शस्त्रक्रियेत कुठलीही जखम केली जात नाही. अथवा टाके घालावे लागत नाही. त्यामुळे वेदना होत नाहीत. वैवाहिक सुख पूर्वीप्रमाणेच मिळते. पुरूषार्थ कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शस्त्रक्रिया करून घेतल्याबद्दल स्त्रीला ती दारिद््रयरेषेखालील किंवा अनुसुचित जाती-जमातीची असेल तर ६०० आणि इतर प्रवर्गातील महिलांना २५० रूपये लाभ दिला जातो. मात्र, पुरूष शस्त्रक्रियेत १,५०० रूपयांचे अनुदान मिळते.