शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

उन्हाळी पिकांवर पाणी टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 01:52 IST

यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची झळ बसणार अशा संशय पुर्वीच शेतकऱ्यांना होता.

भूजल पातळी खालावली : पिके सुकण्याच्या मार्गावररावणवाडी : यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची झळ बसणार अशा संशय पुर्वीच शेतकऱ्यांना होता. परंतु फेबु्रवारीच्या शेवटीच विहिरीतील पाण्याची पातळी खालावल्याचे शेतकरी बोलत आहेत. त्यामुळे मे व जून महिन्यात पाणी टंचाईच्या सामना करावा लागणार असल्याचे आताच दिसून येत आहे.यावर्षी अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती. जून, जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पावसाअभावी दुबार-तिबार पेरणी करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. अत्यल्प पावसामुळे शेकडो हेक्टर शेतातील पीके करपून गेली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र फेबु्रवारी महिन्यातच पाण्याची पातळी खालावणार नाही असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र तसे झाले नाही व भूजल पातळी खालावली असे शेतकऱ्यांचे बोलणे आहे. गतवर्षी या महिन्यात विहिरींना मुबलक पाणी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाचे नियोजन केले. त्यानुसार शेतात भाजीपाला, गहू, टरबूज, काकडी, लवकी आदी पिकांची लागवड केली. मात्र फेबु्रवारीच्या अखेरच पाण्याची पातळी खालावल्याने रब्बी हंगामातही खरीपा प्रमाणे पीक हाती येईल किंवा नाही अशी शंका आता पासूनच शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.खरीप हंगामात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर आता अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, जवस, लाखोळी आदी पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर पर्याय म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाची लागवड केली.फेबु्रवारी महिन्याच्या अखेरीस बहुतांश भागातील विहिरीतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आतापासूनच अशी परिस्थिती निर्माण झाली तर मे व जून महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)