शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

उन्हाळी पिकांवर पाणी टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 01:52 IST

यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची झळ बसणार अशा संशय पुर्वीच शेतकऱ्यांना होता.

भूजल पातळी खालावली : पिके सुकण्याच्या मार्गावररावणवाडी : यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची झळ बसणार अशा संशय पुर्वीच शेतकऱ्यांना होता. परंतु फेबु्रवारीच्या शेवटीच विहिरीतील पाण्याची पातळी खालावल्याचे शेतकरी बोलत आहेत. त्यामुळे मे व जून महिन्यात पाणी टंचाईच्या सामना करावा लागणार असल्याचे आताच दिसून येत आहे.यावर्षी अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती. जून, जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पावसाअभावी दुबार-तिबार पेरणी करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. अत्यल्प पावसामुळे शेकडो हेक्टर शेतातील पीके करपून गेली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र फेबु्रवारी महिन्यातच पाण्याची पातळी खालावणार नाही असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र तसे झाले नाही व भूजल पातळी खालावली असे शेतकऱ्यांचे बोलणे आहे. गतवर्षी या महिन्यात विहिरींना मुबलक पाणी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाचे नियोजन केले. त्यानुसार शेतात भाजीपाला, गहू, टरबूज, काकडी, लवकी आदी पिकांची लागवड केली. मात्र फेबु्रवारीच्या अखेरच पाण्याची पातळी खालावल्याने रब्बी हंगामातही खरीपा प्रमाणे पीक हाती येईल किंवा नाही अशी शंका आता पासूनच शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.खरीप हंगामात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर आता अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, जवस, लाखोळी आदी पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर पर्याय म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाची लागवड केली.फेबु्रवारी महिन्याच्या अखेरीस बहुतांश भागातील विहिरीतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आतापासूनच अशी परिस्थिती निर्माण झाली तर मे व जून महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)