शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

धापेवाडा प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: April 28, 2016 01:36 IST

तिरोडा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळख असलेला धापेवाडा प्रकल्प वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळख असलेला धापेवाडा प्रकल्प वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे अदानी समूहाच्या व पाटबंधारे विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आला. ४४.०५ दलघमी (१५.५६ टी.एम.सी.) पाणी क्षमतेच्या या प्रकल्पात वैनगंगा नदीतील ३२७ द.ल.घ.मी. (११.५५ टी.एम.सी.) पाणी शेतीसाठी आहे. मात्र संबंधित यंत्रणेच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकऱ्यांना पाणीच मिळणे कठीण झाले आहे.या प्रकल्पातून अदानी वीज प्रकल्पासाठी वार्षिक २.४७ टी.एम.सी. पाणीसाठा पुरवठा करण्यास शासनाने मंजूरी दिली. त्यानुसार पाणी पुरवठा केला जातो. पण शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कोणतेही नियोजन केले जात नाही. या प्रकल्पात पाणी भरले असल्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी कर्ज काढून पाईपलाईन करुन विद्युत पंप लावले. अनेक बेरोजगार शेतीकडे वळले. पण वैनगंगेत पाणीच नसल्याने संपूर्ण लावलेले रबी पीक जळून गेले आहे. लाखो रुपये खर्च करुनही हाती काहीच येणार नाही. उलट कर्जाचा बोझा वाढणार आहे. चांदोरी खुर्द, पिपरिया, सावरा, अर्जुनी, बिहिरीया, मुरदाडा, महालगाव, किडंगीपार, करटी बु., इंदोरा व इतर ठिकाणी बोअरवेलने उपसा केला जातो. मात्र परसवाडा खैरलांजी, बोरा, बघोली व इतर गावे तहानलेलीच आहेत. प्रकल्पात फक्त ४ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. या प्रकल्पात १७.५ दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध होता. ते पाणी गेले कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कवलेवाडा ते सावरापर्यंत वैनगंगा नदी तुडूंब भरून होती. १५ मार्च पर्यंत पाणी होते. अचानक पाणी एवढ्या झपाट्याने एका महिन्यात कमी झाले कसे? धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. शेतकऱ्यांना पाणी देणे बंद होते. त्या कालावधीत कार्यकारी अभियंता यांनी प्रकल्पातील दोन-तीन दार उघडून पाणी सोडले असल्याने पाणीसाठा कमी झाला. नियोजन बरोबर नसल्याने त्याचा त्रास शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी श्रेय लाटले. शेतकऱ्यांना भोगावे लागले. (वार्ताहर)‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई होणार?प्रकल्पात एवढे मुबलक पाणी होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी रबी पीक घेण्याची मानसिकता तयार केली व शेतीची मशागत केली. पीक लावले, मात्र शेवटच्या टोकावर आलेल्या शेतात पाणीच पोहोचले नाही. पाणीसाठा कमी असल्याचे कधीही कार्यकारी अभियंता यांनी शेतकऱ्यांना सांगितले नाही. साधी नोटीसही दिली नाही. या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पाणीसाठा कमी झाल्याने डबक्यातील पाणी जेसीबीच्या साह्याने नाली करून पंपाजवळ नेले जात आहे.बावनथडी व संजय सरोवराचे पाणी सोडाबावनथडी प्रकल्प वैनगंगा बपेरा चांदोरीपासून ४० ते ५० कि.मी. अंतरावर आहे. या धरणातून पाणी सोडले तर रात्रभरात पाणी वैनगंगेत येते. संजय सरोवराचे पाणी दोन-तीन दिवसात येते. पाणी कधी सोडले जाणार अशी विचारणा शेतकऱ्यांनी आ.विजय रहांगडाले यांच्याकडे केली. त्यांनी संजय सरोवरचे पाणी सोडण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळविल्याचे सांगितले. याबाबत शेतकऱ्यांनी मुरदाड्यात आमदारांना व्यथा सांगितली आहे. पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र पाणी मिळाले नाही. शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मे महिन्यात येणार असल्याचे सांगितले जाते.