शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

जंगलात आग लावणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 01:29 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जंगलांना आग लागणे ही नित्याचीच बाब ठरली आहे. मोहफूल वेचणारे लोक मोह वेचण्यासाठी

तेंदूपत्ता संकलकांचे कृत्य : रेंगेपार सहवनक्षेत्रातील घटनासडक अर्जुनी : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलांना आग लागणे ही नित्याचीच बाब ठरली आहे. मोहफूल वेचणारे लोक मोह वेचण्यासाठी आगी लावतात अशी शंका होती, पण दि.५ ला सायंकाळी तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून गाव खेड्यातील लोकांना अल्पशा मजुरीत जंगलाला वनवा लावण्यासाठी पाठविले जात असल्याची घटना उघडकीस आली.सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या सहवनक्षेत्र रेंगेपारमधील शशीकरण पहाडीला आग लावताना दोन इसामांना रंगेहात पकडले. त्यात तालुक्यातील प्रधानटोला येथील आरोपी नामदेव जैपाल रहांगडाले (वय ४५), कुवरलाल सुकल ठाकरे (वय ३७) यांना पकडण्यात यश आले. या आरोपींकडे आगपेटी मिळाली आहे. सायंकाळी गस्तीवर असताना वनक्षेत्र अधिकारी प्रमोद फुले, वनरक्षक विनायक नागरिकर, संगीता काठेवार, कोहमाराचे वनक्षेत्र सहायक सुनील खांडेकर, वनरक्षक अरविंद बडगे, रमेश काळबांधे, विलास गौतम, वनमजुर बेलवंशी, भोंडे, खोटेले, रमेश मेश्राम यांनी आरोपींना पकडण्यासाठी सहकार्य केले.सदर दोन्ही आरोपी सायंकाळी चार वाजता जंगलाला आग लावण्यासाठी निघाले. ५.३० वाजता जंगलाच्या बाहेर निघत असताना दोघांनाही पकडण्यात आले. त्यावेळी जंगलात आग लागली होती. पण वन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणली. त्या आरोपींना जंगलाला आग लावण्यासाठी सांगितले कुणी? तो सांगणारा कोण? तेंदूपत्ता संकलन करणारी कंपनी कोणती? याची उत्तरे तपासात पुढे येत आहेत. जंगलाना आगी लावणारे लोक उन्हाळ्याचे दिवसात तत्पर असतात. आगी लावल्याने तेंदूच्या लहान झाडांना नवीन पालवी फुटते. तेंदू झाडे कटाईचे काम केल्या जातात. पण आगी लावल्याने मजूर न लावता कमी पैशात काम होत असल्याने ही आग लावली जात असावी अशी चर्चा आहे. जंगलाना आगी लावल्याने लहान मौल्यवान रोपटे मरतात. मोठ्या झाडाच्या बिया पडल्या असतात त्या जळून खाक होतात. त्यामुळे पुन्हा जंगलात नवीन रोपटे तयार होत नाही. जंगल विराण होते. आगीमुळे प्राणी सैरावैरा पळतात, काही प्राणी आगीमुळे भाजतात तर कधी जीव गमवावा लागतो. या आगीत लहान किटक मरतात. एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांची पंचाईत होत असते. उन्हाळ्याचे दिवसात प्राणी पाण्यासाठी जंगलात भटकत असतात. (शहर प्रतिनिधी)