शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात आग लावणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 01:29 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जंगलांना आग लागणे ही नित्याचीच बाब ठरली आहे. मोहफूल वेचणारे लोक मोह वेचण्यासाठी

तेंदूपत्ता संकलकांचे कृत्य : रेंगेपार सहवनक्षेत्रातील घटनासडक अर्जुनी : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलांना आग लागणे ही नित्याचीच बाब ठरली आहे. मोहफूल वेचणारे लोक मोह वेचण्यासाठी आगी लावतात अशी शंका होती, पण दि.५ ला सायंकाळी तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून गाव खेड्यातील लोकांना अल्पशा मजुरीत जंगलाला वनवा लावण्यासाठी पाठविले जात असल्याची घटना उघडकीस आली.सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या सहवनक्षेत्र रेंगेपारमधील शशीकरण पहाडीला आग लावताना दोन इसामांना रंगेहात पकडले. त्यात तालुक्यातील प्रधानटोला येथील आरोपी नामदेव जैपाल रहांगडाले (वय ४५), कुवरलाल सुकल ठाकरे (वय ३७) यांना पकडण्यात यश आले. या आरोपींकडे आगपेटी मिळाली आहे. सायंकाळी गस्तीवर असताना वनक्षेत्र अधिकारी प्रमोद फुले, वनरक्षक विनायक नागरिकर, संगीता काठेवार, कोहमाराचे वनक्षेत्र सहायक सुनील खांडेकर, वनरक्षक अरविंद बडगे, रमेश काळबांधे, विलास गौतम, वनमजुर बेलवंशी, भोंडे, खोटेले, रमेश मेश्राम यांनी आरोपींना पकडण्यासाठी सहकार्य केले.सदर दोन्ही आरोपी सायंकाळी चार वाजता जंगलाला आग लावण्यासाठी निघाले. ५.३० वाजता जंगलाच्या बाहेर निघत असताना दोघांनाही पकडण्यात आले. त्यावेळी जंगलात आग लागली होती. पण वन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणली. त्या आरोपींना जंगलाला आग लावण्यासाठी सांगितले कुणी? तो सांगणारा कोण? तेंदूपत्ता संकलन करणारी कंपनी कोणती? याची उत्तरे तपासात पुढे येत आहेत. जंगलाना आगी लावणारे लोक उन्हाळ्याचे दिवसात तत्पर असतात. आगी लावल्याने तेंदूच्या लहान झाडांना नवीन पालवी फुटते. तेंदू झाडे कटाईचे काम केल्या जातात. पण आगी लावल्याने मजूर न लावता कमी पैशात काम होत असल्याने ही आग लावली जात असावी अशी चर्चा आहे. जंगलाना आगी लावल्याने लहान मौल्यवान रोपटे मरतात. मोठ्या झाडाच्या बिया पडल्या असतात त्या जळून खाक होतात. त्यामुळे पुन्हा जंगलात नवीन रोपटे तयार होत नाही. जंगल विराण होते. आगीमुळे प्राणी सैरावैरा पळतात, काही प्राणी आगीमुळे भाजतात तर कधी जीव गमवावा लागतो. या आगीत लहान किटक मरतात. एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांची पंचाईत होत असते. उन्हाळ्याचे दिवसात प्राणी पाण्यासाठी जंगलात भटकत असतात. (शहर प्रतिनिधी)