शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

मशागतीसाठी ट्रॅक्टरकडे कल

By admin | Updated: June 8, 2015 01:32 IST

आधुनिक युगात यांत्रिक प्रगती झाल्यामुळे आता शेतीत ट्रॅक्टरचा वापर वाढत आहे. परिणामी दिवसेंदिवस बैल जोड्यांची संख्या कमी होत आहे.

यांत्रिक प्रगती : जनावरांच्या चारा-पाण्याची समस्या बिकट गोंदिया : आधुनिक युगात यांत्रिक प्रगती झाल्यामुळे आता शेतीत ट्रॅक्टरचा वापर वाढत आहे. परिणामी दिवसेंदिवस बैल जोड्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळेच एकेकाळी प्रसिद्ध असलेले बैल बाजारही आता मोडीत निघालेले दिसत आहे.पूर्वी शेतकरी सालगडी भल्या पहाटे उठून ऊन डोक्यावर येईपर्यंत शेतात नांगरणी- वखरणी करीत होते. दुपारनंतर ऊन्ह ओसरल्यानंतर पुन्हा दुपारनंतर शेतीची मशागत करण्यात ते गुंग होऊन जात होते. कडक उन्हाळ्यात शेतीची मशागत करण्यासाठी शेतकरी सर्ज्या-राज्यासोबत घाम गाळत होते. आताही अनेक शेतकरी बैलजोडीचा वापर करतात. रखरखत्या उन्हात आपल्या ढवळ्या-पवळ्यासोबत ते नांगरणी-वखरणी करतात. उन्हामुळे त्यांच्या जीवाची लाहीलाही होते. मात्र मशागत करणे अतिआवश्यक असल्याने त्याची तमा न बाळगता ते शेतात राबतात. त्याशिवाय काळ्या आईच्या अंगावर हिरवा शालू पांघरणे अशक्य असते. सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आले आहे. आधुनिकीकरणामुळे शेतीही आता आधुनिक झाली आहे. परिणामी शेती मशागतीची कामे आधुनिक यंत्राच्या सहाय्याने करण्यास सुरूवात झाली आहे. पूर्वी नांगरणी-वखरणीसाठी बैलजोडीशिवाय काम भागत नव्हते. आता हिच कामे ट्रॅक्टरने केली जातात. त्यामुळे मशागत त्वरित पूर्ण होण्यास मदत मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गुरांना वैरण मिळत नसल्याने पाळीव जनावरांची विक्रीही वाढली आहे. सोबतच दिवसेंदिवस शेतकऱ्यांना बैलजोडी विकत घेणे परवडण्यासारखे राहिले नाही. त्यामुळे आता बैलांनी मशागत करणे शेतकऱ्यांना अवघडही जात आहे. शेती कामासाठी मजूर मिळणेही कठीण झाले आहे. मोठ्या शेतकऱ्यांना जोमाने शेती करताना अनेक दिवस लागतात. (प्रतिनिधी)