शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

पर्यटनाला वाव; मात्र विकासाचा ध्यास नाही

By admin | Updated: August 13, 2014 23:56 IST

पर्यटनाच्या दृष्टीने सिरेगावबांध हे गाव महत्वपूर्ण स्थान आहे. गोंदिया, भंडारा व इतर जिल्ह्यातील पर्यटक नवेगावबांधला भेट देत असताना येथे आवर्जून थांबतात. या पर्यटनस्थळाला आणखी विकसीत केले

संतोष बुकावन ल्ल अर्जुनी/मोरगावपर्यटनाच्या दृष्टीने सिरेगावबांध हे गाव महत्वपूर्ण स्थान आहे. गोंदिया, भंडारा व इतर जिल्ह्यातील पर्यटक नवेगावबांधला भेट देत असताना येथे आवर्जून थांबतात. या पर्यटनस्थळाला आणखी विकसीत केले जाऊ शकते. मात्र त्यासाठी लोकप्रतिनिधींची आस्था असली पाहिजे. विदेशी पक्षांचे हे वास्तव्यस्थान आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत्या पक्षी शिकारींमुळे पक्षीसुध्दा फिरकेनासे झाले आहेत. आ. राजुकमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या गावांपैकी सिरेगावबांध हे एक गाव आहे. या गावात विकास करण्यासाठी बराच वाव आहे. विकासासाठी हे गाव दत्तक घेणे खरच कौतुकास्पद आहे. पण पर्यटनाला वाव असलेल्या या गावाला पर्यटनाच्या नजरेतून बघितल्याच गेले नाही. १२०० लोकसंख्या असलेले हे गाव निसर्गरम्य वातावरणात आहे. येथील गावकऱ्यांचा शेती व मजुरी हा मुख्य व्यवसाय आहे. या गावात शेतीशिवाय दुसरे रोजगाराचे साधन नाही. गावकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामासाठी प्रतीक्षेत असतात. दरवर्षी येथे मग्रारोहयोजनेची कामे होतात. परंतु नोंदणीकृत कुटुंबांना वर्षभरात किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात यंत्रणेला अपयश आले. ‘गोद मे लडका और गाव में पुकार’ असाच हा प्रकार आहे. निसर्गाने दिलेल्या संपदेला विकसित करून येथे रोजगाराला चालना मिळू शकते. पर्यटनस्थळी तलावात शासनाला खर्च करणे शक्य नसेल तर खिंडसीसारखे बीओटी तत्वावर नौकाविहाराची सुविधा उपलब्ध करून दिल्यास येथे गावकऱ्यांना रोजगार मिळू शकतो. सिरेगावबांध येथे गावअंतर्गत रस्ते काहीशा प्रमाणात सिमेंटीकरण व खडीकरणाने पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनही तीन ते साडेतीन किमी रस्ते कच्चे आहेत. दोन किमीचे नाली बांधकाम शिल्लक आहे. वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांना अद्याप पट्टे मिळाले नाहीत. येथील स्मशानघाटावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. मात्र बैठकीसाठी सभामंडप, चावडी नसल्याने विशेषत: उन्हाळा व पावसाळ्यात त्रास होतो. ग्रामपंचायतच्या वतीने सिरेगाव ते गुढरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आमदारांना निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापही ही मागणी पूर्ण झाली नाही. गावातील एका बड्या व्यक्तीच्या घरासमोर असलेल्या नालीतून दुर्गंध सुटतो. त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्रास होतो. त्यांनी ग्रां.प. कडे तक्रार केली. ग्रा.पं.ने नोटीस बजावली, मात्र अद्यापही यावर तोडगा निघू शकला नाही. सिरेगाव व नजीकच्या सात गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. मात्र या योजनेला शासकीय अनुदान नाही. नियोजन, देखभाल व दुरूस्तीसाठी एक मंडळ स्थापन करण्यात आले. त्यांच्यामार्फत ही योजना चालते. ज्या नळधारकांनी कनेक्शन घेतले आहे, अशा लोकांकडून पैसे गोळा करून ही योजना चालविली जाते. मात्र जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी अनुदान मिळत नसल्याने योजना पुढे चालविण्यासाठी बराच त्रास होतो.