शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

पर्यटनाला वाव; मात्र विकासाचा ध्यास नाही

By admin | Updated: August 13, 2014 23:56 IST

पर्यटनाच्या दृष्टीने सिरेगावबांध हे गाव महत्वपूर्ण स्थान आहे. गोंदिया, भंडारा व इतर जिल्ह्यातील पर्यटक नवेगावबांधला भेट देत असताना येथे आवर्जून थांबतात. या पर्यटनस्थळाला आणखी विकसीत केले

संतोष बुकावन ल्ल अर्जुनी/मोरगावपर्यटनाच्या दृष्टीने सिरेगावबांध हे गाव महत्वपूर्ण स्थान आहे. गोंदिया, भंडारा व इतर जिल्ह्यातील पर्यटक नवेगावबांधला भेट देत असताना येथे आवर्जून थांबतात. या पर्यटनस्थळाला आणखी विकसीत केले जाऊ शकते. मात्र त्यासाठी लोकप्रतिनिधींची आस्था असली पाहिजे. विदेशी पक्षांचे हे वास्तव्यस्थान आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत्या पक्षी शिकारींमुळे पक्षीसुध्दा फिरकेनासे झाले आहेत. आ. राजुकमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या गावांपैकी सिरेगावबांध हे एक गाव आहे. या गावात विकास करण्यासाठी बराच वाव आहे. विकासासाठी हे गाव दत्तक घेणे खरच कौतुकास्पद आहे. पण पर्यटनाला वाव असलेल्या या गावाला पर्यटनाच्या नजरेतून बघितल्याच गेले नाही. १२०० लोकसंख्या असलेले हे गाव निसर्गरम्य वातावरणात आहे. येथील गावकऱ्यांचा शेती व मजुरी हा मुख्य व्यवसाय आहे. या गावात शेतीशिवाय दुसरे रोजगाराचे साधन नाही. गावकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामासाठी प्रतीक्षेत असतात. दरवर्षी येथे मग्रारोहयोजनेची कामे होतात. परंतु नोंदणीकृत कुटुंबांना वर्षभरात किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात यंत्रणेला अपयश आले. ‘गोद मे लडका और गाव में पुकार’ असाच हा प्रकार आहे. निसर्गाने दिलेल्या संपदेला विकसित करून येथे रोजगाराला चालना मिळू शकते. पर्यटनस्थळी तलावात शासनाला खर्च करणे शक्य नसेल तर खिंडसीसारखे बीओटी तत्वावर नौकाविहाराची सुविधा उपलब्ध करून दिल्यास येथे गावकऱ्यांना रोजगार मिळू शकतो. सिरेगावबांध येथे गावअंतर्गत रस्ते काहीशा प्रमाणात सिमेंटीकरण व खडीकरणाने पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनही तीन ते साडेतीन किमी रस्ते कच्चे आहेत. दोन किमीचे नाली बांधकाम शिल्लक आहे. वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांना अद्याप पट्टे मिळाले नाहीत. येथील स्मशानघाटावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. मात्र बैठकीसाठी सभामंडप, चावडी नसल्याने विशेषत: उन्हाळा व पावसाळ्यात त्रास होतो. ग्रामपंचायतच्या वतीने सिरेगाव ते गुढरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आमदारांना निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापही ही मागणी पूर्ण झाली नाही. गावातील एका बड्या व्यक्तीच्या घरासमोर असलेल्या नालीतून दुर्गंध सुटतो. त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्रास होतो. त्यांनी ग्रां.प. कडे तक्रार केली. ग्रा.पं.ने नोटीस बजावली, मात्र अद्यापही यावर तोडगा निघू शकला नाही. सिरेगाव व नजीकच्या सात गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. मात्र या योजनेला शासकीय अनुदान नाही. नियोजन, देखभाल व दुरूस्तीसाठी एक मंडळ स्थापन करण्यात आले. त्यांच्यामार्फत ही योजना चालते. ज्या नळधारकांनी कनेक्शन घेतले आहे, अशा लोकांकडून पैसे गोळा करून ही योजना चालविली जाते. मात्र जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी अनुदान मिळत नसल्याने योजना पुढे चालविण्यासाठी बराच त्रास होतो.