शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा तालुका; कोरोना आला आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वर-खाली होत असून, एकंदर स्थिती आटोक्यात असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे ...

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वर-खाली होत असून, एकंदर स्थिती आटोक्यात असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, क्रियाशील रुग्णांची संख्या आता बोटावर मोजण्या इतपत उरली आहे. मात्र विशेष बाब म्हणजे, जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट असलेला तिरोडा आता आटोक्यात आला आहे. तिरोडा तालुक्यात आता फक्त ४ क्रियाशील रुग्ण उरले असून, आता लवकरच हा तालुका ‘कोरोनामुक्त’ होईल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण गोंदिया तालुक्यात आढळून आले आहेत. गोंदियानंतर तिरोडा तालुका दुसऱ्या क्रमांकावर होता व हे दोन तालुके जिल्ह्यातील ‘हॉटस्पॉट’ ठरले होते. गोंदिया तालुक्यात आजही सर्वाधिक रुग्णांची नोंद घेतली जात असून, तालुका सुरुवातीपासून आजही हॉटस्पॉट आहे. गोंदिया तालुक्यात आतापर्यंत ७,८१२ बाधितांची नोंद घेण्यात आली असून, आजही दररोज रुग्ण आढळत आहेत. परिणामी, तालुक्यात सर्वाधिक ८६ क्रियाशील रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तिरोडा तालुका असून येथे १,३९६ बाधितांची नोंद आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की, आता तिरोडा तालुक्यात बाधितांचे प्रमाण कमी झाले असून म्हणूनच तालुका आटोक्यात आल्याचे दिसत आहे. आता तालुक्यात फक्त ४ क्रियाशील रुग्ण उरले आहेत व त्यातील २ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत.

उपरोक्त आकडेवारी बघता तिरोडा तालुका नियंत्रणात आलेला दिसून येतो. याशिवाय, जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव या तालुक्यांतही १० च्या आत बाधित रुग्ण असून हे तालुकेसुद्धा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. मात्र आमगाव तालुक्यात बाधितांची संख्या व क्रियाशील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळेच आता आमगाव तालुक्यात १७ क्रियाशील रुग्ण असून जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. अधिक खबरदारी घेतल्यास लवकरच जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होणार यात शंका नाही.

--------------------------------

त्रिसूत्रीवर अंमलबजावणी गरजेची

जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असून दररोज निघणारी बाधितांची संख्या दिलासादायक दिसून येत आहे. मात्र ही संख्या शून्यावर आलेली नाही. म्हणजेच कोरोना पूर्णपणे गेला नसून बघता-बघता मृतांची संख्या १८२ पर्यंत पोहोचली आहे. अशात कोरोना अद्याप जिल्ह्यात असल्याने त्याला पूर्णपणे मूठमाती देण्यासाठी कोरोनाविषयक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी मास्कचा नियमित वापर, शारीरिक अंतराचे पालन व सतत हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करावीच लागणार आहे.