शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

सक्रांतीनिमित्त महिलांना ‘तिळाची’ भेट

By admin | Updated: January 14, 2017 01:18 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव स्थिर दिसत असल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे

यावर्षी भाव स्थिर : तीळ खरेदीसाठी वाढली गर्दी गोंदिया : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव स्थिर दिसत असल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे वाणात ‘तिळाची’ भेट मिळाली आहे. त्यामुळे संक्रातीनिमित्त तीळ खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. अशात यंदा तिळाचे लाडू बिनधास्त खाता येणार असल्याचे दिसते. ‘तिळ-गुळ खा अन् गोडगोड बोला’ ही म्हण संक्रातीसाठी प्रचलीत आहे. बाजारात तिळ दिसताच संक्रातीची आठवण येते व डोळ््यापुढे येतात ते तिळाचे लाडू. मात्र तिळाचे भाव चांगलेच उंचावलेले राहत असल्याने तिळाचे लाडू बनवितानाही बजेटवर नजर ठेवावी लागते. मात्र मागील वर्षापासून तिळाचे चांगले उत्पादन होत असल्याने तिळाचे भाव स्थिर दिसून येत आहे. परिणामी महिलांना संक्रांतीत दिलासा मिळाला आहे. संक्रात आली की तीळ-गुळ या दोन वस्तूंची खरेदी वाढते. आता शनिवारी (दि.१४) संक्रांत आली असल्याने महिला व पुरूषांची बाजारात तीळ-गुळ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. येथे दुकानांसोबतच बाजारात रस्त्यावर दुकानी लावून तीळ विकणारे विक्रेतेही ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्या घरचे उत्पादन किंवा ग्रामीण भागातून खरेदी करून शहरात विकण्यासाठी ते दुकान लावत असल्याचे दिसते. हाच प्रकार यंदाही बाजारात दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला दुकान लावून तिळ व गूळ विकले जात असून जागोजागी हातठेलेही दिसत आहेत. सध्या या विक्रेत्यांकडे खरेदी करणाऱ्यांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. यंदा भाव कमी असल्याने थोडे जास्त लाडू तयार करून त्यांचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठीचीही तयारी दिसत आहे. (शहर प्रतिनिधी) रेडिमेड पापडीही उपलब्ध ४आजच्या युगात प्रत्येकच वस्तू किंवा पदार्थ रेडिमेड उपलब्ध असतानाच बाजारात तिळाची पपडीही रेडिमेड विकली जात आहे. धकाधकीच्या जीवनाच तीळ खरेदी करून त्याचे लाडू व पपडी तयार करण्यासाठी नोकरदार महिलांकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे त्यांचा कल रेडिमेड पापडीकडे असतो. नेमकी ही बाब हेरून बाजारात रेडिमेड पापडी उपलब्ध करण्यात आली आहे. २४० रूपये किलो दराने पापडी सध्या विकली जात आहे. तीळ-गुळाचे औषधीयुक्त लाभ ४मकर संक्रांत येते तेव्हा शिशिर ऋतू शेवटच्या टप्यात असतो. थंडीत शरिरात कफ वाढून जमा होतो. तसेच वाताचा त्रासही असतो. आयुर्वेदानुसार तीळ हे सर्वाेत्कृष्ट स्नेह द्रव्य असल्याने त्याच्या जोडीला गुळ दिल्यास कफाच पचन होऊन वाताच समन होते. त्यामुळे पुढे येणाऱ्या वसंत ऋतूतील ऋतूजन्य (सिजनल व वायरल) आजारांचा त्रास होत नाही. त्यामुळेच संक्रांतीत तीळ-गुळ खाण्याची परंपरा पूर्वजांी सुरू केल्याचे वैद्य अपर्णा कमलापती खोब्रागडे यांनी सांगीतले. १०० ते १३० रुपये भाव ४गोंदियाच्या बाजारात सध्या पांढरे व काळ््या दान्याचे तीळ विक्रीला आले आहे. यात पांढरे तीळ १३० रूपये तर काळ््या दान्याचे तीळ १०० रूपये किलो दराने विकले जात आहे. शिवाय ४०-५० रूपये किलो दराने गुळ विकला जात आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही तिळाचे दर असेच होते. चांगले उत्पादन झाल्याने तीळाचे भाव स्थिर दिसत आहे. दर स्थिर असल्याने ग्राहक चांगलीच खरेदी करीत असल्याचेही चुलोद येथील विक्रेते श्रावण वंजारी यांनी सांगितले.