शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

सक्रांतीनिमित्त महिलांना ‘तिळाची’ भेट

By admin | Updated: January 14, 2017 01:18 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव स्थिर दिसत असल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे

यावर्षी भाव स्थिर : तीळ खरेदीसाठी वाढली गर्दी गोंदिया : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव स्थिर दिसत असल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे वाणात ‘तिळाची’ भेट मिळाली आहे. त्यामुळे संक्रातीनिमित्त तीळ खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. अशात यंदा तिळाचे लाडू बिनधास्त खाता येणार असल्याचे दिसते. ‘तिळ-गुळ खा अन् गोडगोड बोला’ ही म्हण संक्रातीसाठी प्रचलीत आहे. बाजारात तिळ दिसताच संक्रातीची आठवण येते व डोळ््यापुढे येतात ते तिळाचे लाडू. मात्र तिळाचे भाव चांगलेच उंचावलेले राहत असल्याने तिळाचे लाडू बनवितानाही बजेटवर नजर ठेवावी लागते. मात्र मागील वर्षापासून तिळाचे चांगले उत्पादन होत असल्याने तिळाचे भाव स्थिर दिसून येत आहे. परिणामी महिलांना संक्रांतीत दिलासा मिळाला आहे. संक्रात आली की तीळ-गुळ या दोन वस्तूंची खरेदी वाढते. आता शनिवारी (दि.१४) संक्रांत आली असल्याने महिला व पुरूषांची बाजारात तीळ-गुळ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. येथे दुकानांसोबतच बाजारात रस्त्यावर दुकानी लावून तीळ विकणारे विक्रेतेही ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्या घरचे उत्पादन किंवा ग्रामीण भागातून खरेदी करून शहरात विकण्यासाठी ते दुकान लावत असल्याचे दिसते. हाच प्रकार यंदाही बाजारात दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला दुकान लावून तिळ व गूळ विकले जात असून जागोजागी हातठेलेही दिसत आहेत. सध्या या विक्रेत्यांकडे खरेदी करणाऱ्यांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. यंदा भाव कमी असल्याने थोडे जास्त लाडू तयार करून त्यांचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठीचीही तयारी दिसत आहे. (शहर प्रतिनिधी) रेडिमेड पापडीही उपलब्ध ४आजच्या युगात प्रत्येकच वस्तू किंवा पदार्थ रेडिमेड उपलब्ध असतानाच बाजारात तिळाची पपडीही रेडिमेड विकली जात आहे. धकाधकीच्या जीवनाच तीळ खरेदी करून त्याचे लाडू व पपडी तयार करण्यासाठी नोकरदार महिलांकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे त्यांचा कल रेडिमेड पापडीकडे असतो. नेमकी ही बाब हेरून बाजारात रेडिमेड पापडी उपलब्ध करण्यात आली आहे. २४० रूपये किलो दराने पापडी सध्या विकली जात आहे. तीळ-गुळाचे औषधीयुक्त लाभ ४मकर संक्रांत येते तेव्हा शिशिर ऋतू शेवटच्या टप्यात असतो. थंडीत शरिरात कफ वाढून जमा होतो. तसेच वाताचा त्रासही असतो. आयुर्वेदानुसार तीळ हे सर्वाेत्कृष्ट स्नेह द्रव्य असल्याने त्याच्या जोडीला गुळ दिल्यास कफाच पचन होऊन वाताच समन होते. त्यामुळे पुढे येणाऱ्या वसंत ऋतूतील ऋतूजन्य (सिजनल व वायरल) आजारांचा त्रास होत नाही. त्यामुळेच संक्रांतीत तीळ-गुळ खाण्याची परंपरा पूर्वजांी सुरू केल्याचे वैद्य अपर्णा कमलापती खोब्रागडे यांनी सांगीतले. १०० ते १३० रुपये भाव ४गोंदियाच्या बाजारात सध्या पांढरे व काळ््या दान्याचे तीळ विक्रीला आले आहे. यात पांढरे तीळ १३० रूपये तर काळ््या दान्याचे तीळ १०० रूपये किलो दराने विकले जात आहे. शिवाय ४०-५० रूपये किलो दराने गुळ विकला जात आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही तिळाचे दर असेच होते. चांगले उत्पादन झाल्याने तीळाचे भाव स्थिर दिसत आहे. दर स्थिर असल्याने ग्राहक चांगलीच खरेदी करीत असल्याचेही चुलोद येथील विक्रेते श्रावण वंजारी यांनी सांगितले.