शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर वाढतेय कर्जाचे ‘टेंशन’

By admin | Updated: December 17, 2015 01:54 IST

गोंदिया जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे व किडीच्या आक्रमणामुळे उत्पादन कमी ...

मुंडीकोटा : गोंदिया जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे व किडीच्या आक्रमणामुळे उत्पादन कमी व लागलेला खर्च अधिक झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना कर्जाच्या परतफेडीचे टेंशन येत आहे.तिरोडा तालुक्यात मुंडीकोटा परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. यावर्र्षीे निसर्गाने साथ दिली नाही. त्यामुळे एका पावसासाठी धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. ज्या शेतकऱ्यांकडे विद्युत पंप तसेच सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे त्यांनी थोडे फार उत्पन्न घेतले. पण इतर शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मावा, तुडतुड्याने हातात येणारे पीक गेले. यावर्षी धानावर गादमासी, करपा, तुडतुडा, मावा, तोंड्या अळीचा प्रादुर्भाव होता. या रोगाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावून नेला. शेतकऱ्यांनी रासायनिक औषधीची बरेचदा फवारणी केली. परंतु फायदा झाला नाही. पुन्हा परिस्थिती जशीच्या तशीच झाली.पण दिवाळीचा सण समोर येताच हलक्या धानाची कापणी व मळणी केली. दिवाळीच्या खर्चासाठी व्यापाऱ्यांना धान विकावे लागले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कमी भावाने धान घेऊन शेतकऱ्यांची लूबाडणूक करुन दिशाभूल केली. शेतकरी चहूबाजूनी संकटात सापडला आहे. जो दिवस निघतो तो शेतकऱ्यांसाठी सारखाच उगवतो. आधी मिळालेल्या कर्जानंतर खरीप पिकांच्या भरवशावर कर्जाची उचल केली. तेही कर्ज शेतकऱ्यांकडून परत फेड करने होत नाही. पिकेल तरच विकेल पण काय? चांगल्या उत्पादनाच्या आशेवर कर्जबाजारी होतात. बँकाकडून घेतलेले पैसे यामुळे शेतकरी पूर्णत: संकटात सापडला आहे. कर्ज कसे फेडावे, मुलाबाळांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह व हंगागात पैसे कोठून आणावे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांची उपेक्षा भंग केली. आणि खोटी फसवणूक केली. शेतकऱ्यांना यावेळी बुरे दिनाचा सामना करावा लागत आहे. गरीब शेतकऱ्यांजवळ फक्त पोट भरण्यासाठी धान उरले आहेत. बाकी धान्य खर्चापायी व्यापाऱ्यांना विकून टाकले. पण यावेळी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडे बँकेनी वसुलीचा तगादा लावत आहेत.पण यावेळी शेतकरी कर्ज कुठून देणार अशी गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांची दिसत आहे. पण वसुलीची गाडी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचत असते. त्यामुळे शेतकरी दारातून पळवाट काढतात. मग कशासाठी गाडी घेऊन अधिकारी दररोज डिझेल व पेट्रोल जाळून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जात असतात. पण एक जरी शेतकरी मिळाला तर तो म्हणतो साहेब यावर्षी मी कर्ज देऊ शकत नाही. कर्ज वसूली शुन्य व डिझेल पेट्रोल खर्च अधिक. मग याला काय म्हणावे. शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या वसुलीची कारवाई थांबवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकरी आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.(वार्ताहर)