शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

शेतकऱ्यांवर वाढतेय कर्जाचे ‘टेंशन’

By admin | Updated: December 17, 2015 01:54 IST

गोंदिया जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे व किडीच्या आक्रमणामुळे उत्पादन कमी ...

मुंडीकोटा : गोंदिया जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे व किडीच्या आक्रमणामुळे उत्पादन कमी व लागलेला खर्च अधिक झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना कर्जाच्या परतफेडीचे टेंशन येत आहे.तिरोडा तालुक्यात मुंडीकोटा परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. यावर्र्षीे निसर्गाने साथ दिली नाही. त्यामुळे एका पावसासाठी धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. ज्या शेतकऱ्यांकडे विद्युत पंप तसेच सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे त्यांनी थोडे फार उत्पन्न घेतले. पण इतर शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मावा, तुडतुड्याने हातात येणारे पीक गेले. यावर्षी धानावर गादमासी, करपा, तुडतुडा, मावा, तोंड्या अळीचा प्रादुर्भाव होता. या रोगाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावून नेला. शेतकऱ्यांनी रासायनिक औषधीची बरेचदा फवारणी केली. परंतु फायदा झाला नाही. पुन्हा परिस्थिती जशीच्या तशीच झाली.पण दिवाळीचा सण समोर येताच हलक्या धानाची कापणी व मळणी केली. दिवाळीच्या खर्चासाठी व्यापाऱ्यांना धान विकावे लागले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कमी भावाने धान घेऊन शेतकऱ्यांची लूबाडणूक करुन दिशाभूल केली. शेतकरी चहूबाजूनी संकटात सापडला आहे. जो दिवस निघतो तो शेतकऱ्यांसाठी सारखाच उगवतो. आधी मिळालेल्या कर्जानंतर खरीप पिकांच्या भरवशावर कर्जाची उचल केली. तेही कर्ज शेतकऱ्यांकडून परत फेड करने होत नाही. पिकेल तरच विकेल पण काय? चांगल्या उत्पादनाच्या आशेवर कर्जबाजारी होतात. बँकाकडून घेतलेले पैसे यामुळे शेतकरी पूर्णत: संकटात सापडला आहे. कर्ज कसे फेडावे, मुलाबाळांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह व हंगागात पैसे कोठून आणावे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांची उपेक्षा भंग केली. आणि खोटी फसवणूक केली. शेतकऱ्यांना यावेळी बुरे दिनाचा सामना करावा लागत आहे. गरीब शेतकऱ्यांजवळ फक्त पोट भरण्यासाठी धान उरले आहेत. बाकी धान्य खर्चापायी व्यापाऱ्यांना विकून टाकले. पण यावेळी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडे बँकेनी वसुलीचा तगादा लावत आहेत.पण यावेळी शेतकरी कर्ज कुठून देणार अशी गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांची दिसत आहे. पण वसुलीची गाडी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचत असते. त्यामुळे शेतकरी दारातून पळवाट काढतात. मग कशासाठी गाडी घेऊन अधिकारी दररोज डिझेल व पेट्रोल जाळून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जात असतात. पण एक जरी शेतकरी मिळाला तर तो म्हणतो साहेब यावर्षी मी कर्ज देऊ शकत नाही. कर्ज वसूली शुन्य व डिझेल पेट्रोल खर्च अधिक. मग याला काय म्हणावे. शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या वसुलीची कारवाई थांबवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकरी आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.(वार्ताहर)