शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

शेतकऱ्यांवर वाढतेय कर्जाचे ‘टेंशन’

By admin | Updated: December 17, 2015 01:54 IST

गोंदिया जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे व किडीच्या आक्रमणामुळे उत्पादन कमी ...

मुंडीकोटा : गोंदिया जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे व किडीच्या आक्रमणामुळे उत्पादन कमी व लागलेला खर्च अधिक झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना कर्जाच्या परतफेडीचे टेंशन येत आहे.तिरोडा तालुक्यात मुंडीकोटा परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. यावर्र्षीे निसर्गाने साथ दिली नाही. त्यामुळे एका पावसासाठी धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. ज्या शेतकऱ्यांकडे विद्युत पंप तसेच सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे त्यांनी थोडे फार उत्पन्न घेतले. पण इतर शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मावा, तुडतुड्याने हातात येणारे पीक गेले. यावर्षी धानावर गादमासी, करपा, तुडतुडा, मावा, तोंड्या अळीचा प्रादुर्भाव होता. या रोगाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावून नेला. शेतकऱ्यांनी रासायनिक औषधीची बरेचदा फवारणी केली. परंतु फायदा झाला नाही. पुन्हा परिस्थिती जशीच्या तशीच झाली.पण दिवाळीचा सण समोर येताच हलक्या धानाची कापणी व मळणी केली. दिवाळीच्या खर्चासाठी व्यापाऱ्यांना धान विकावे लागले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कमी भावाने धान घेऊन शेतकऱ्यांची लूबाडणूक करुन दिशाभूल केली. शेतकरी चहूबाजूनी संकटात सापडला आहे. जो दिवस निघतो तो शेतकऱ्यांसाठी सारखाच उगवतो. आधी मिळालेल्या कर्जानंतर खरीप पिकांच्या भरवशावर कर्जाची उचल केली. तेही कर्ज शेतकऱ्यांकडून परत फेड करने होत नाही. पिकेल तरच विकेल पण काय? चांगल्या उत्पादनाच्या आशेवर कर्जबाजारी होतात. बँकाकडून घेतलेले पैसे यामुळे शेतकरी पूर्णत: संकटात सापडला आहे. कर्ज कसे फेडावे, मुलाबाळांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह व हंगागात पैसे कोठून आणावे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांची उपेक्षा भंग केली. आणि खोटी फसवणूक केली. शेतकऱ्यांना यावेळी बुरे दिनाचा सामना करावा लागत आहे. गरीब शेतकऱ्यांजवळ फक्त पोट भरण्यासाठी धान उरले आहेत. बाकी धान्य खर्चापायी व्यापाऱ्यांना विकून टाकले. पण यावेळी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडे बँकेनी वसुलीचा तगादा लावत आहेत.पण यावेळी शेतकरी कर्ज कुठून देणार अशी गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांची दिसत आहे. पण वसुलीची गाडी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचत असते. त्यामुळे शेतकरी दारातून पळवाट काढतात. मग कशासाठी गाडी घेऊन अधिकारी दररोज डिझेल व पेट्रोल जाळून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जात असतात. पण एक जरी शेतकरी मिळाला तर तो म्हणतो साहेब यावर्षी मी कर्ज देऊ शकत नाही. कर्ज वसूली शुन्य व डिझेल पेट्रोल खर्च अधिक. मग याला काय म्हणावे. शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या वसुलीची कारवाई थांबवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकरी आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.(वार्ताहर)