शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

धान पिकासोबत नगदी पिके घ्या

By admin | Updated: January 17, 2016 01:36 IST

शेतकरी वर्षानुवर्षे धानाचे पीक घेत आहेत. बदलत्या हवामानानुसार दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे.

चांदेवार यांचे प्रतिपादन : शेतकरी प्रशिक्षणात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ुेबोंडगावदेवी : शेतकरी वर्षानुवर्षे धानाचे पीक घेत आहेत. बदलत्या हवामानानुसार दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पुरेशा जलसिंचनाच्या सोयी-सुविधा नसल्याने एका पाण्याअभावी हाती येणाऱ्या पिकापासून शेतकऱ्यांना मुकावे लागते. धानाच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाल्याने धानाचे पीक शेतकऱ्यांना मारक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कर्जपाशातून मुक्ती मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व नगदी पिकाची सांगड घातल्यानेच येणाऱ्या दिवसात शेती फायदेशीर ठरणार असल्याचे उद्गार मंडळ कृषी अधिकारी ऋषी चांदेवार यांनी काढले. आसोली येथील शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित शेतकरी प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी आसोलीचे सरपंच मुरलीधर रामटेके, प्रमुख अतिथी म्हणून टिकाराम नाकाडे, दुधराम नाकाडे, पोलीस पाटील भिवा नाकाडे, दयाराम काळसर्पे, सखाराम नैताम उपस्थित होते. प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषी अधिकारी आर.के.चांदेवार, कृषी पर्यवेक्षक एम.बी.ठाकुर, कृषी सहायक पी.एम.सूर्यवंशी, भारती येरणे यांची उपस्थित होते. कृषी विभागाच्या वतीने आयोजित शेतकरी प्रशिक्षणाला शेतकऱ्यांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. पुढे चांदेवार म्हणले, आजच्या वाढत्या महागाईत धानाची शेती परवडण्याजोगी नाही. काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता असून सुध्दा फक्त भातपिकाचीच लागवड होते. भाताच्या पिकावर अवलंबून न राहता ऊस, केळी, मका अशी नगदी पिकांकडे वळून प्रयोगशिल व्हावे. नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये उपयोग करावा नवनवीन पिके घेण्यासाठी शेड-नेट हाऊस, पॅक हाऊस तयार करणे काळाची गरज आहे. कृषी पर्यवेक्षक एम.बी. ठाकूर म्हणाले, जमीनीमधील माती नमूना कसा काढावा, माती नमूना तपासणीची गरज का? याची विस्तृत माहिती दिली. श्री पध्दत लागवड तंत्रज्ञान किड व रोग यातील फरक त्यावरील नियंत्रण, गादी वाफ्यावरील पेरणीचे महत्व यावर मार्गदर्शन केले. कृषी सहायक पी.एम.सूर्यवंशी यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सधन भात पिक प्रात्यक्षिक प्रकल्पात वाटप करण्यात आलेल्या निविष्ठाचे त्यांनी वाचन केले. शेतकऱ्यांना योजनाविषयी माहिती दिली. भारती येरणे यांनी कृषी विभागाच्या विविध अनुदानित योजनांची माहिती दिली. आसोली हे गाव प्रकल्पासाठी घेण्यात आले होते. यावेळी टिकाराम नाकाडे, भोजराज नाकाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी डी. एल. तुमडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्प राबविण्यात आला. संचालन पी.एम.सूर्यवंशी यांनी तर आभार आर.एच.मेश्राम यांनी मानले. आयोजनासाठी कृषी मित्र पतिराम पर्वते, लक्ष्मण नाकाडे, यशवंत गणविर, नामदेव पर्वते यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)