शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

धान पिकासोबत नगदी पिके घ्या

By admin | Updated: January 17, 2016 01:36 IST

शेतकरी वर्षानुवर्षे धानाचे पीक घेत आहेत. बदलत्या हवामानानुसार दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे.

चांदेवार यांचे प्रतिपादन : शेतकरी प्रशिक्षणात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ुेबोंडगावदेवी : शेतकरी वर्षानुवर्षे धानाचे पीक घेत आहेत. बदलत्या हवामानानुसार दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पुरेशा जलसिंचनाच्या सोयी-सुविधा नसल्याने एका पाण्याअभावी हाती येणाऱ्या पिकापासून शेतकऱ्यांना मुकावे लागते. धानाच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाल्याने धानाचे पीक शेतकऱ्यांना मारक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कर्जपाशातून मुक्ती मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व नगदी पिकाची सांगड घातल्यानेच येणाऱ्या दिवसात शेती फायदेशीर ठरणार असल्याचे उद्गार मंडळ कृषी अधिकारी ऋषी चांदेवार यांनी काढले. आसोली येथील शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित शेतकरी प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी आसोलीचे सरपंच मुरलीधर रामटेके, प्रमुख अतिथी म्हणून टिकाराम नाकाडे, दुधराम नाकाडे, पोलीस पाटील भिवा नाकाडे, दयाराम काळसर्पे, सखाराम नैताम उपस्थित होते. प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषी अधिकारी आर.के.चांदेवार, कृषी पर्यवेक्षक एम.बी.ठाकुर, कृषी सहायक पी.एम.सूर्यवंशी, भारती येरणे यांची उपस्थित होते. कृषी विभागाच्या वतीने आयोजित शेतकरी प्रशिक्षणाला शेतकऱ्यांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. पुढे चांदेवार म्हणले, आजच्या वाढत्या महागाईत धानाची शेती परवडण्याजोगी नाही. काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता असून सुध्दा फक्त भातपिकाचीच लागवड होते. भाताच्या पिकावर अवलंबून न राहता ऊस, केळी, मका अशी नगदी पिकांकडे वळून प्रयोगशिल व्हावे. नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये उपयोग करावा नवनवीन पिके घेण्यासाठी शेड-नेट हाऊस, पॅक हाऊस तयार करणे काळाची गरज आहे. कृषी पर्यवेक्षक एम.बी. ठाकूर म्हणाले, जमीनीमधील माती नमूना कसा काढावा, माती नमूना तपासणीची गरज का? याची विस्तृत माहिती दिली. श्री पध्दत लागवड तंत्रज्ञान किड व रोग यातील फरक त्यावरील नियंत्रण, गादी वाफ्यावरील पेरणीचे महत्व यावर मार्गदर्शन केले. कृषी सहायक पी.एम.सूर्यवंशी यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सधन भात पिक प्रात्यक्षिक प्रकल्पात वाटप करण्यात आलेल्या निविष्ठाचे त्यांनी वाचन केले. शेतकऱ्यांना योजनाविषयी माहिती दिली. भारती येरणे यांनी कृषी विभागाच्या विविध अनुदानित योजनांची माहिती दिली. आसोली हे गाव प्रकल्पासाठी घेण्यात आले होते. यावेळी टिकाराम नाकाडे, भोजराज नाकाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी डी. एल. तुमडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्प राबविण्यात आला. संचालन पी.एम.सूर्यवंशी यांनी तर आभार आर.एच.मेश्राम यांनी मानले. आयोजनासाठी कृषी मित्र पतिराम पर्वते, लक्ष्मण नाकाडे, यशवंत गणविर, नामदेव पर्वते यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)