शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सरल डाटाबेसने वाढविली शिक्षकांची डोकेदुखी

By admin | Updated: August 10, 2015 01:24 IST

नवेगावबांध : शासनाच्या नवीन धोरणानुसार इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सर्वंकष माहिती शासनाकडे असणे आवश्यक आहे.

नवेगावबांध : शासनाच्या नवीन धोरणानुसार इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सर्वंकष माहिती शासनाकडे असणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आॅनलाईन करणे गरजेचे आहे. माहितीमध्ये विद्यार्थ्याशी संबंधित सर्वच माहिती समाविष्ट असल्याने ही बाब शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सदर माहिती १५ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन करावयाची आहे. यामध्ये संबंधित सर्वच विद्यार्थ्यांची कौटुंबिक व शैक्षणिक माहिती, रक्तगट, पालकाचे उत्पन्न, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, शिक्षण घेत असलेला भाऊ किंवा बहिणीची माहिती, त्याच्याशी संबंधित प्रमाणपत्र आदी सर्व बाबींच्या नोंदी आॅनलाईन करायच्या आहेत. ग्रामीण भागातील पालक सध्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांच्या पाल्यांचे प्रमाणपत्र मिळविण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे विद्यार्थी देखील निहीत वेळेत आपापले प्रमाणपत्र सादर करू शकत नाहीत. यामुळे शिक्षकांचा मनस्ताप वाढत आहे. अनेक शाळांमध्ये संगणकाची सुविधा नाही. अशावेळी शिक्षकांनी माहिती कशी अपलोड करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. स्मार्टफोनवरून देखील माहिती अपलोड करता येऊ शकते. परंतु किती शिक्षकांजवळ स्मार्ट फोन आहेत आणि कितींना तो हाताळता येतो, हा संशोधनाचा विषय आहे. शाळेमध्ये संगणक नसल्यामुळे बहुतेक शिक्षकांना संगणक हाताळता येत नाही. सदर डाटाबेसचे काम युद्धपातळीवर करायचे आहे, असे सांगण्यात येते. परंतु बऱ्याचदा ‘लिंक फेल्यूअर’ किंवा ‘वेबसाईट जाम’ अशा समस्या येतात. त्यामुळे दिलेल्या वेळेत संस्था, शाळा, समित्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची माहिती अपलोड होईल किंवा नाही, याचा ताण शिक्षकांवर आल्याचे सांगितले जाते.सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची माहिती कमी केली असली तरी विहित केलेली माहिती निर्धारित वेळेत अपलोड करण्याची डोकेदुखी वाढली असल्याचे शिक्षण वर्तुळात बोलले जाते. (वार्ताहर)वर्गशिक्षक व मुख्याध्यापकावर जबाबदारी निश्चितविद्यार्थ्यांची माहिती तर आॅनलाईन होणारच, पण शाळेमध्ये ज्या विविध समित्या व समितीच्या सदस्यांसंबंधीची माहितीदेखील आॅनलाईन करायची आहे. स्वत: शिक्षकांचीदेखील शैक्षणिक, व्यायसायिक, सेवाकार्य, प्रशिक्षण आदींची सर्वकष माहिती द्यायची आहे. ही सर्व माहिती गोळा करून आॅनलाईन करणे क्रमप्राप्त आहे. सदर माहिती गोळा करणेच मोठे जिकरीचे काम आहे. या सर्व कामांची शालेय पातळीवर जबाबदारी वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर निश्चित करण्यात आलेली आहे.