शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
3
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
4
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
5
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
6
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
7
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
8
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
9
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
10
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
11
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
12
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
13
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
14
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
15
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
16
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
17
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
18
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
19
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
20
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?

अर्जुनीत पाण्याची भीषण टंचाई

By admin | Updated: March 6, 2016 01:37 IST

गोंदिया तालुक्यातील अर्जुनी ग्राम येथे भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची वेळ आली आहे.

२२ विहिरी कोरड्या : पाणीपुरवठा योजना झाली ठप्पविजेंद्र मेश्राम ल्ल खातियागोंदिया तालुक्यातील अर्जुनी ग्राम येथे भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची वेळ आली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच गावातील २२ विहीरी आटून गेल्या आहेत. उन्हाळ्याला जेमतेम सुरूवात झाली असताना ही स्थिती आहे तर पुढे काय होणार? अशी चिंता गावकऱ्यांना सतावत आहे.गावात ६५००० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. २६ फेब्रुवारीला ११ महिन्याचे ६६ हजार रुपयांचे विद्युत बिल थकबाकी असल्यामुळे टाकीचे कनेक्शन काढण्यात आले. त्यामुळे आता २६ फेब्रुवारीपासून लोकांना पाणी टाकीच्या माध्यमातून पाणी मिळत नाही. यामुळे गावकरी पाण्यासाठी त्राही-त्राही होत आहेत. आपल्या या समस्येचे त्वरीत निराकरण करण्याची मागणी अर्जुनीच्या गावकऱ्यांनी केली आहे. काही ग्रामीण लोकांच्या म्हणण्यानुसार जवळील परिसरातील शेतांमध्ये करण्यात आलेल्या बोअरमुळे गावातील विहीरींची भूजल पातळी खालावली आहे. ही समस्या क्षेत्रातील जि.प.सदस्य विजय सोनारे यांना सांगितल्यानंतर त्यांनी ४ मार्चला स्वत: येऊन यांनी गावातील भिषण पाण्याची समस्या जाणून घेतली. सुकलेल्या विहीरी पाहिल्या. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपुरे, उपसरपंच सूरजलाल खोटेले उपस्थित होते. या समस्येवर तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पाण्याची समस्या त्वरीत निकाली काढली नाही तर भारतीय कॉम्युनिष्ट पार्टीतर्फे ११ मार्चपासून उपोषणाला बसण्याचा इशारा नरेंद्र गजभिये यांनी दिला.