शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

अर्जुनीत पाण्याची भीषण टंचाई

By admin | Updated: March 6, 2016 01:37 IST

गोंदिया तालुक्यातील अर्जुनी ग्राम येथे भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची वेळ आली आहे.

२२ विहिरी कोरड्या : पाणीपुरवठा योजना झाली ठप्पविजेंद्र मेश्राम ल्ल खातियागोंदिया तालुक्यातील अर्जुनी ग्राम येथे भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची वेळ आली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच गावातील २२ विहीरी आटून गेल्या आहेत. उन्हाळ्याला जेमतेम सुरूवात झाली असताना ही स्थिती आहे तर पुढे काय होणार? अशी चिंता गावकऱ्यांना सतावत आहे.गावात ६५००० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. २६ फेब्रुवारीला ११ महिन्याचे ६६ हजार रुपयांचे विद्युत बिल थकबाकी असल्यामुळे टाकीचे कनेक्शन काढण्यात आले. त्यामुळे आता २६ फेब्रुवारीपासून लोकांना पाणी टाकीच्या माध्यमातून पाणी मिळत नाही. यामुळे गावकरी पाण्यासाठी त्राही-त्राही होत आहेत. आपल्या या समस्येचे त्वरीत निराकरण करण्याची मागणी अर्जुनीच्या गावकऱ्यांनी केली आहे. काही ग्रामीण लोकांच्या म्हणण्यानुसार जवळील परिसरातील शेतांमध्ये करण्यात आलेल्या बोअरमुळे गावातील विहीरींची भूजल पातळी खालावली आहे. ही समस्या क्षेत्रातील जि.प.सदस्य विजय सोनारे यांना सांगितल्यानंतर त्यांनी ४ मार्चला स्वत: येऊन यांनी गावातील भिषण पाण्याची समस्या जाणून घेतली. सुकलेल्या विहीरी पाहिल्या. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपुरे, उपसरपंच सूरजलाल खोटेले उपस्थित होते. या समस्येवर तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पाण्याची समस्या त्वरीत निकाली काढली नाही तर भारतीय कॉम्युनिष्ट पार्टीतर्फे ११ मार्चपासून उपोषणाला बसण्याचा इशारा नरेंद्र गजभिये यांनी दिला.