शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

ग्रामीण विकास यंत्रणेने थकविले ३१ लाख

By admin | Updated: February 24, 2016 01:39 IST

सुवर्ण जयंती स्वयंरोजगार योजनेंतर्गत सन २००८ मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने सुमारे ३१ लाखांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी प्रदान केली.

कंत्राटदार-अभियंते हवालदिल : सात वर्षापूर्वीच मिळाली होती प्रशासकीय मंजुरी गोंदिया : सुवर्ण जयंती स्वयंरोजगार योजनेंतर्गत सन २००८ मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने सुमारे ३१ लाखांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. सर्वच बांधकाम होवून सुमारे तीन वर्षाचा कालावधी लोटला, मात्र त्याचे अद्याप बिल काढण्यात आलेले नाही. त्यामुळे कंत्राटदार, बेरोजगार अभियंता पैशासाठी चांगलेच हवालदिल झाले असून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या ढिम्म प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. स्वर्णजयंती स्वयंरोजगार योजनेंतर्गत ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे तिरोडा, सालेकसा आणि अर्जुनी-मोरगाव येथे विविध कामाला प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. यात तिरोडा तालुक्यातील बेरडीपार, मांडवी, सालेकसा तालुक्यातील सालेकसा, पाऊलदौना, नवेगाव, सोनपूरी येथे व्यवसायीक गाळ्यांच्या बांधकामाला, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथे पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या बांधकामाला तर तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा आणि अर्जुनी येथे विविध कामाला सन २००८ मध्येच प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आली. नियमानुसार सर्व सोपस्कार पार पडले. बेरोजगार कंत्राटदार अभियंत्यानी त्यांचे गेल्या तीन वर्षापूर्वीच बांधकाम पूर्ण केले. त्याचे मूल्याकन सुध्दा तीन वर्षापूर्वीच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला पाठविण्यात आल. लवकरच निधी मिळेल, त्यामुळे बांधकामासाठी घेतलेले कर्ज फेडता येईल. असा आशावाद घेवून बेरोजगार अभियंता होते. मात्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील ढीम्म प्रशासनाने त्यांच्या आशावादावरच पाणी फेरले. अनेक अभियंत्यांनी कार्यालयाच्या गेल्या तीन वर्षापासून चकरा मारून चपला झिजविल्या. परंतु निधी कधी मिळणार याबाबत योग्य माहितीच देण्यात येत नसल्याचे या अभियंत्यांचे म्हणणे आहे. निधी उपलब्ध असतांनाच कामाला प्रशासकीय मंजूरी प्रदान केली जाते. याचा अर्थ निधी असतांनाच या बांधकामाला प्रशासकीय मंजूरी दिली असण्याची शक्यता आहे. जर निधी उपलब्ध होता तर मग तो आतापर्यंत काढण्यात का आला नाही? सदर निधी दुसरीकडे तर वळविण्यात आलेला नाही आणि जर निधी उपलब्ध नव्हता तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने या बांधकामाला प्रशासकीय मंजूरी प्रदान कशी केली?असे एक ना अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत. निधी उपलब्ध असतांना सुध्दा विकास कामांचे निधी न काढण्याच्या या प्रकारामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान झालेले विविध विकास कामांचे निधी तत्काळ काढण्याची मागणी बेरोजगार कंत्राटदार अभियंत्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)काठीने बदडलेगोंदिया : शिवधुऱ्यावर असलेले झाड पेटविण्यासाठी गेले असताना झाड कशाला पेटवितोस म्हणून असे म्हणून परसवाडा येथील मोरेश्वर केवळराम भगत (६०) यांना आरोेपी महेश काशिनाथ भगत (३२), मुकेश काशिनाथ भगत (२९) रा.वडेगाव या दोघांनी काठीने मारहाण केली.