शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

पाणीपट्टीची १७ कोटी ५८ लाखांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:35 IST

कपिल केकत।आॅनलाईन लोकमतगोंदिया : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्या जाणाºया पाण्याकरिता सिंचन विभागाकडून पाणीपट्टीच्या स्वरुपात पैसे वसूल केले जातात. मात्र मागील चाळीस वर्षांपासून जिल्ह्यातील २७४ गावांतील शेतकºयांकडे पाणीपट्टीचे १७ कोटी ५८ लाख २८ हजार रूपयांची थकबाकी असल्याची बाब उघडकीस आली. दरम्यान या थकबाकीमुळे सिंचन विभागाच्या अडचणीत वाढ झाली आहे.जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही ...

ठळक मुद्देसिंचन विभाग अडचणीत : चाळीस वर्षांपासून दुर्लक्ष

कपिल केकत।आॅनलाईन लोकमतगोंदिया : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्या जाणाºया पाण्याकरिता सिंचन विभागाकडून पाणीपट्टीच्या स्वरुपात पैसे वसूल केले जातात. मात्र मागील चाळीस वर्षांपासून जिल्ह्यातील २७४ गावांतील शेतकºयांकडे पाणीपट्टीचे १७ कोटी ५८ लाख २८ हजार रूपयांची थकबाकी असल्याची बाब उघडकीस आली. दरम्यान या थकबाकीमुळे सिंचन विभागाच्या अडचणीत वाढ झाली आहे.जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही वरथेंबी पावसावरच अवलंबून आहे. पावसाने पाठ फिरविल्यास शेतकºयांना सिंचन प्रकल्पांच्या मदतीने शेती करावी लागते. मागील दोन तीन वर्षांपासून निसर्गाने सतत दगा दिल्याने शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागले. यंदा देखील कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांची भिस्त सिंचन प्रकल्पावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.खरीप आणि उन्हाळी पिकांसाठी शेतकºयांना पुजारीटोला व इटियाडोह या प्रकल्पाच्या उपकालव्यातून पाणी दिले जाते. बाघ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पुजारीटोला प्रकल्पातून गोंदिया, आमगाव व सालेकसा या तालुक्यांना तर इडियाडोह प्रकल्पातून जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव, लगतच्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर व गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या तालुक्यांना पाणी दिले जाते.पुजारीटोला प्रकल्पातून १६५ गावांतील शेतकऱ्याना सिंचनासाठी पाणी दिले जाते. इटियाडोह प्रकल्पाच्या पाण्यातून १०९ गावातील शेतकरी शेती पिकवितात.शेतकºयांना सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यावर सिंचन विभागाकडून पाणीपट्टीची आकारणी केली जाते. यात, पुजारीटोला प्रकल्पासाठी अद्याप पाणी वापर संस्थांची स्थापना झाली नाही. त्यामुळे थेट सिंचन विभागातर्फे शेतकºयांना पाणी दिले जाते.इटियाडोह येथे ५५ पाणी वापर संस्था असल्याने त्यांच्यामार्फत पाणी दिले जाते. यात उन्हाळी शेती तर या प्रकल्पांतून दिल्या जाणाऱ्या पाण्यावरच अवलंबून आहे. ज्या पाण्याच्या भरवशावर शेतकरी पिके घेतात. त्याच पाण्याचे पैसे भरण्याकडे पाणी वापर संस्थाचे दुर्लक्ष झाले आहे.पुजारीटोला व इटियाडोह या दोन्ही प्रकल्पांच्या पाण्यावर शेती करणाऱ्या २७४ गावांतील पाणी वापर संस्था आणि शेतकºयांकडे पाणी पट्टीची १७ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे.नक्षलग्रस्त जिल्ह्यामुळे ५० टक्के सुटशेतकºयांना सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यावर सिंचन विभागाकडून दर आकारले जात आहेत. विशेष म्हणजे गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने या दरातही सुट दिली जात आहे. त्यानंतर इटियाडोह प्रकल्पाकडून खरिपात २० हजार रूपये दलघमी तर उन्हाळीसाठी ८० हजार रूपये दलघमी असे दर आकारले जात आहे. तर बाघ प्रकल्पाकडून खरिपात २४० रूपये हेक्टरी व उन्हाळीत ७२० रूपये हेक्टरी आकारले जात आहे. नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून या दरात शेतकऱ्याना ५० टक्के सुट दिली जाते.प्रकल्पांच्या स्थापनेपासूनची थकबाकी२७४ गावांतील बहुतांश शेतकरी पाणी पट्टीचे थकबाकीदार असतानाच यातील बहुतांश पाणी वापर संस्था आणि शेतकरी या प्रकल्पांच्या स्थापनेपासूनचे थकबाकीदार असल्याचीही माहिती आहे. पुजारीटोला व इटियाडोह हे दोन्ही प्रकल्प सन १९७० च्या सुमारास तयार झाले आहेत. आता ४० वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी लोटूनही कित्येक पाणी वापर संस्था आणि शेतकऱ्यांनी पाणी पट्टी भरलेली नसल्याची माहिती आहे.