शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

जिल्ह्यातील सर्व मुख्यालय ठिकाणी मिळणार हक्कलेख निक्षेप सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST

गोंदिया : राज्यात जिल्ह्याची ओळख धानाचे कोठार म्हणून आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा भात गिरणी (राईस मिल) आहे. ...

गोंदिया : राज्यात जिल्ह्याची ओळख धानाचे कोठार म्हणून आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मुख्य

व्यवसाय हा भात गिरणी (राईस मिल) आहे. जिल्हा निर्मितीपासून उद्योजकांसाठी हक्कलेख निक्षेप सुविधा उपलब्ध

नसल्यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना इतर जिल्ह्यात जावे लागत होते. उद्योजकांच्या सुविधेसाठी जिल्हाधिकारी

नयना गुंडे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व मुख्यालय ठिकाणी व्यवसायाकरिता हक्कलेख निक्षेप सुविधा नुकतीच

सुरु करण्यात आलेली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गुंडे यांनी जिल्ह्यातील सर्व

उद्योजक व नागरिकांना केले आहे.

व्यवसायामधील अडीअडचणी दूर करण्यासाठी राईस मिलर्स असोसिएशन यांनी ही बाब

जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली होती. तसेच दस्त मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२पासून ही

सुविधा जिल्ह्यात उपलब्ध नव्हती. सन १९९९मध्ये गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली असून, जिल्ह्यातील

नागरिक - व्यावसायिकांना हक्कलेख निक्षेप सुविधेसाठी भंडारा व नागपूर जिल्ह्यात जावे लागत होते. परंतु

जिल्हाधिकारी गुंडे यांच्या पुढाकाराने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डिकर यांनी

अधिनियमात अधिक्रमण करून गोंदिया जिल्हा व सर्व तालुका मुख्यालयांचा समावेश केला असून, जिल्ह्यातील राईस

मिलर्स यांनी जिल्हा प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत. या सुविधेमुळे जिल्ह्यातील उद्योजकांना चालना

मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, प्रभारी सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) सरिता पराते, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, राईस मिलर्स असोसिएशन अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी उपस्थित

होते.

----------------------

असा होणार जिल्हावासीयांना लाभ

पूर्वी कर्ज व्यवहारांकरिता निष्पादीत होणारा हक्कलेख निक्षेपाचा दस्त मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२चे कलम ५८ (फ) नुसार अधिसूचित केलेल्या शहरांमध्येच करता येत होते. त्यामध्ये गोंदिया शहर व जिल्ह्याचा समावेश नव्हता. त्यामुळे येथील रहिवासी व व्यापाऱ्यांना इतर शहरांमध्ये जावे लागत होते व ते त्यांना फार गैरसोयीचे ठरत होते.

महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाने याबाबत ६ सप्टेंबर २०२१ रोजी नवीन अधिसूचना निर्गमित केली असून, या अधिसूचनेनुसार याबाबतीत काढलेल्या आधीच्या सर्व अधिसूचना, आदेश किंवा संलेखांचे अधिक्रमण

करून वरील अधिनियमांच्या कलम ५८च्या खंड (च) च्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरे, गावे, तालुके

आणि जिल्हे यांचा समावेश केला आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्याचा समावेश त्यात झाला असून, येथील रहिवासी व व्यापाऱ्यांना कर्जाकरितांचे हक्कलेख निक्षेप दस्तांसाठी आता इतर जिल्ह्यात जाण्याची आवश्यकता राहिलेली

नाही. असे व्यवहार जिल्ह्यामध्ये बँकेतच करता येतील व ते फार सोयीचे ठरणार आहे.