शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

दहापैकी नऊ जणांना बायकोचा मोबाईल नंबर आठवत नाही.......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

गोंदिया : सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे मनुष्य हा बऱ्याच प्रमाणात आता यंत्रांवर अवलंबून राहत आहे. या गोष्टींचा ...

गोंदिया : सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे मनुष्य हा बऱ्याच प्रमाणात आता यंत्रांवर अवलंबून राहत आहे. या गोष्टींचा त्याचा जीवनशैली आणि काहीसा आरोग्यावरसुद्धा परिणाम होत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे तर अनेकांना पूर्वी मुखपाठ असणारे नंबर आता आठवण राहत नसल्याचे दिसून येते. एकंदरीत या बदलांचा माणसाच्या स्मरणशक्तीवर कितपत होतो आहे याचा रिॲलिटी चेक ‘लाेकमत’ने गोंदिया शहरातील गांधी चौक, गोरेलाल चौक, जयस्तंभ चौक, नेहरु चौक, सिव्हिल लाईन परिसरातील काही व्यक्तींशी संपर्क साधला याची चाचणी करून पाहली. यात अनेकांना आपल्या पत्नीचा आणि मुलाचादेखील मोबाईल नंबर आठवण नसल्याची बाब पुढे आली तर काही गृहिणींना नवऱ्याचा मोबाईल नंबर पाठ नव्हता. मात्र, याउलट घरातील लहान मुलांना त्यांच्या आई-वडील आणि आजी आजोबांचासुद्धा नंबर पाठ आहे. मानसोपचारतज्ज्ञांनी यावर मत मांडताना नागरिक आपल्या रिकॉल मेमरीचा वापर करत नाही. त्यामुळे हा प्रकार घडतो. अद्यावत तंत्रज्ञानाने माणूस हायटेक झाला मात्र आता तो बऱ्याच गोष्टींसाठी परावलंबी झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या रिकॉल मेमरीचा वापर करणे गरजेचे असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.

....................

लोकमत गोंदिया

- बाहेरगावावरून येताना गाडी पंक्चर झाली व मोबाईल बंद पडला. घरी फोन लावायचा होता पण पत्नीचा मोबाईल नंबरच आठवत नव्हता.

- मला माझा आणि माझ्या पत्नीचा नंबर पाठ आहे.

- एका कार्यक्रमात माझा मोबाईल बंद पडला. घरी फोन लावायचा होता पण पत्नीचा नंबरच आठवत नव्हता.

-मला माझ्या कार्यालयातील प्रमुखांचा नंबर आठवण आहे पण पत्नीचा मोबाईल नंबर पाठ नाही.

.....................

कोट

लहान मुलांना आपण वारंवार सांगून नंबर सांगून पाठ करून घेतो, त्यामुळे शाॅर्ट मेमरी लॉगटर्म मेमरीमध्ये परावर्तित होऊन नंबर लक्षात राहतो. मोबाईलमुळे अनेक जण परावलंबी झाले आहेत, त्यामुळे ते आपल्या शाॅर्टटर्म मेमरीचा वापर करत नाहीत.

- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ.

..................

तरुणांपासून वृध्दापर्यंत सारेच सारखे

-मोबाईल आल्यापासून तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण नंबरच्या बाबतीत परावलंबी झाले आहेत.

-पूर्वी मोबाईल नव्हता त्यावेळेस प्रत्येकांना कुटुंबातील सदस्यांसह काही व्यक्तींचे नंबर पाठ राहायचे.

- आता नाव आठविल्यानंतर मोबाईलच्या मेमरी बाॅक्समध्ये जाऊन नंबर काढले जातात. त्यातून रिकाॅल मेमरी कमी होत आहे. त्यामुळे अनेकांना पाठ राहणारे नंबर माेबाईल पाहल्याशिवाय आठवत नाही.

...............................

बायकांनाही पतीदेवाचा नंबर आठवेना

मला माझा, माझ्या पतीचा आणि मुलीचा नंबर पाठ आहे. मात्र, इतर नातेवाईक़ांचा नंबर लक्षात नाही. त्यांच्याशी नेहमी काम पडत असले तरी मोबाईलमधून नंबर काढल्यानंतरच फोन लावला जातो, त्यामुळे नंबर लक्षात राहत नाही.

- एक गृहिणी

.......

दररोज पतीदेवाला आवर्जून फोन लावणाऱ्या महिला दिवसात अनेकवेळेस फोन लावतात, मात्र त्यांना काही महिला वगळल्यास अनेकांना आपल्या पतीचा नंबर तोंडपाठ नाही. कारण कोडवर्डमध्ये पतीदेवाचा नंबर त्यांनी सेव्ह केला आहे.

- एक गृहिणी

............................

पोरांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ

- प्रत्येक पालकांने आपला मुलगा कुठे हरविला तर त्याला घरी परत येता यावे म्हणून कुटुंबीयांनी त्याच्याकडून नंबर पाठ करून घेतला आहे. त्यामुळे त्याला आई-बाबांचा नंबर तोंडपाठ आहे. त्यामुळे तो माेबाईल न बघता नंबर सांगतो.

- पीयूृष

............

मला माझे नाव, माझ्या शाळेचे नाव, शिक्षकांचे नाव आणि आई-बाबांचा मोबाईल क्रमांक तोंडपाठ आहे. मोबाईल न बघता सुध्दा मला नंबर सांगता येतो. मला कधीही कुणी नंबर विचारला तरी मी सहजपणे सांगतो.

-इशान

............