शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

उत्पादकता वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड आवश्यक

By admin | Updated: June 11, 2017 01:14 IST

विजय घावटे: ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवड्याचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क बोडगावदेवी : भात पिकाचे क्षेत्र जास्त असल्याने, रोग किडींचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी वेळीच खबरदारी घेऊन जागरूक राहणे आवश्यक आहे. मजुरांची वानवा व वाढती मजुरी लक्षात जेता यांत्रिकी पद्धतीने शेती करणे काळाची गरज आहे. उत्पादन घेत असताना रासायनिक खते व औषधांचा प्रमाण वाढणार नाही याकडे डोळेझाड करता येणार नाही. शेतामधून पीक उत्पादकता वाढविण्यासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी केले आहे. अर्जुनी-मोरगाव येथे आयोजीत ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवाड्याच्या समारोप समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, आत्माचे प्रकल्प संचालक चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी रतिराम राणे, कुसन झोळे उपस्थित होते. सर्वप्रथम आधुनिक कृषी जनक डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवडाच्या समारोप समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना घावटे यांनी, आजघडीला नियोजनाअभावी शेतामधून मनाजोगे उत्पन्नच घेता येवू शकत नाही. ठराविक वेळी शेतीची मशागत करण्यात शेतकरी बांधवांनी प्राथमिक देणे आवश्यक आहे. नैराश्यमय विचार सोडून शेती केल्यास निश्चितपणे फलदायी ठरणारी शेती आहे. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. येत्या २०२२ सालापर्यंत शेती उत्पादन दुप्पट करणे असा कृषी विभागाचा माणस असल्याचे सांगुन ते पुढे म्हणाले, कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या शेतकरी गटाने रोवणी यंत्र घेण्यासाठी पुढे यावे. जमिनीचे माती परिक्षण केल्यास शेतीची सुपिकता समजू शकते. त्यानुसार खतांची मात्रा किती द्यावी याचा नेमका अंदाज आपणास येवू शकतो. प्रत्येकाने शेतीची आरोग्य पत्रिका बनविण्यासाठी पुढे यावे. कमी खर्चामध्ये जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारे भाजीपाला, फळबाग यासारखे पिके घेण्याची तत्परता दाखविणे आज गरजेचे झाले आहे. शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय यासारखे शेतीपुरक व्यवसायाची कास धरावी. शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी उत्पादित शेतमालाची साठवणूक करून ठेवावी. त्यासाठी साठवणूक गृह बांधण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. सभापती शिवणकर यांनी, शेती पाण्याशिवाय करताच येवू शकत नाही. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोलवर जात आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. कमीत कमी खर्चाची शेती करावी. कर्जबाजारीचा आव आणुन शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारून नये. जिवन अनमोल असून आलेल्या संकटावर मात करण्याची क्षमता निर्माण करावी असे मत व्यक्त केले. जिल्हा कृषी अधिकारी इंगळे यांनी, शेतकऱ्यांनी पीक वीमा काढणे आवश्यक आहे. धानाची लागवड श्री पद्धतीने करून उत्पादन खर्च कमी करण्याचे आवाहन केले. सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी चंद्रिकापुरे व तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी सुद्धा शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. संचालन विलास कोहाडे यांनी केले. प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी एन.एम. मुनेश्वर यांनी मांडले. आभार मंडळ कृषी अधिकारी संजय रामटेके यांनी मानले. कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, पी.बी. ठाकुर, बी.टी. राऊत, अविनाश शहुकरे, मसराम, एन.आर. मेश्राम, भारती येरणे, कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.