शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पिढीच्या महिलांतही वाणाचा ट्रेंड कायम

By admin | Updated: January 16, 2016 02:10 IST

पतीच्या सौभाग्यासाठी सुहासिनी तीळ संक्रातीपासून पाच दिवस वाण वाटतात. लहान मुलांची लूट करतात.

दुरावलेली मने एकत्र येणार : हळदी-कुंकवातून सुहासिनींचा सन्मानगोंदिया : पतीच्या सौभाग्यासाठी सुहासिनी तीळ संक्रातीपासून पाच दिवस वाण वाटतात. लहान मुलांची लूट करतात. महादेव व माता पार्वती यांच्या पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतिक ठरवित महिला मंडळीही मकरसंक्रातीपासून पाच दिवस वाण वाटतात. शेजारच्या पाजारच्या महिलांना वाणाच्या स्वरूपात विविध वस्तू भेट देऊन त्यांना कुंकू लावतात. शेजारीपाजारी राहणाऱ्या महिला वर्षभर भांडत असल्या तरी या वाणाच्या निमित्ताने एकमेकींना आपल्या घरी बोलावतात. वाणाच्या स्वरूपात गहू, तांदूळ, भेटवस्तू, तिळगूळ, बोर असे देतात. वाण घेताना वाण देणाऱ्या महिलेचा हात पकडून त्यांना त्यांच्या पतीविषयी उखाणा विचारला जातो. महिला मंडळीही एकापेक्षा एक उखाणा सादर करून आपल्या पतीचे नाव त्या उखाण्यातून घेतात. जूनीच ही परंपरा आजही चालू आहे. विज्ञान युगात या प्रथेला अधिकच महत्व आले आहे. एखादी महिला नोकरी करीत असेल तरी ती वेळ काढून शेजारच्या-पाजारच्या महिलांना वाण वाटते. या वाणाच्या निमीत्ताने अनेक महिला ते उखणा पाठ करण्याची तयारीच आठवडाभर किंवा पंधरवाडाभर करीत असतात. कोणती महिला किती उखाणे सांगते. चांगले व जास्तीत जास्त उखाने सांगणाऱ्या महिलेकडे उपस्थित महिला अधिकच आकर्षीत होतात. प्रत्येक महिला आपला उखाणा इतर महिलांपेक्षा चांगला असावा याचा प्रयत्न करते. मकरसंक्रातपासून वाटणाऱ्या वाणामुळे महिला-महिलांमध्ये असलेला दुरावा कमी होत असतो. (तालुका प्रतिनिधी)असे वाटतात साहित्यकुंकूची डबी, चहा गाळणी, पाणी गाळणी, स्टील, प्लास्टीकचे चेंडू, पीठ चाळणी, चमच, गृहउपयोगी विविध साहित्य वाटप केले जाते. वाणासोबत वटाण्याच्या शेंगा, बोर, गाजर, सिंगाडे वाटप केल्या जातात. आर्थिक उत्पन्नानुसार वाटतात वाणग्रामीण किंवा शहरी भाग असो या दोन्ही भागातील महिला वाण वाटतात ते वाण त्यांच्या आर्थिक मिळकतीवरूनही लक्षात येतो. ज्याच्ंयाकडे नोकरी आहे किंवा आर्थिक मिळकत जास्त आहे. त्या घरातील महिला वाणात मोठ्या वस्तू देतात. ज्यांची मिळकत कमी आहे त्याही महिला कुंकूला जास्त महत्व आहे असे म्हणत त्या वाटतात. दोन्ही प्रकारच्या महिला सौभाग्याचे लेणं म्हणून कुंकवाचा वापर करतात. पतंग व तिळगूळ आजही आकर्षकमकरसंक्रातच्या निमित्ताने बालक मंडळी पतंग उडविण्याचे काम करतात. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना, मित्रमंडळींना या निमीत्ताने तिळगूळ वाटून नास्ता करण्यासाठी बोलावले जाते. जून्या काळापासून आजही तिळगूळाचा कार्यक्रम केला जातो.