शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मलेरिया पसरतोय पाय! एक महिला दगावली

By admin | Updated: July 30, 2016 00:07 IST

यावर्षी डेंग्यूच्या डासांचा प्रकोप वाढला नसल्याने या आजाराने अद्याप डोके वर काढलेले नाही.

गोंदिया : यावर्षी डेंग्यूच्या डासांचा प्रकोप वाढला नसल्याने या आजाराने अद्याप डोके वर काढलेले नाही. मात्र मलेरिया जिल्ह्यात आपले पाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यावर्षी मलेरियाने एका महिलेचा बळी घेतला असून अनेकांना लागण झाली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी हिवताप विभागाने फवारणीचा पहिला टप्पा सुरू केला आहे. पावसाळा म्हणजे आजारांसाठी पोषक काळ. या दिवसात डासांचा उद्रेक वाढतो व त्यापासून मलेरिया व डेंग्यूसारखे आजार बळावतात. या डासांमुळेच जिल्ह्यात दरवर्षी मलेरिया व डेंग्यूचा उद्रेक वाढून अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यातही मलेरियाचे प्रमाण जास्त दिसून येते. यावर्षी गेल्या गेल्या सात महिन्यात ४३७ मलेरिया रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात जानेवारी ते जूनदरम्यान ३७७ रूग्ण पॉझिटिव्ह मिळून आले आहेत. शिवाय १ जुलै ते २१ जुलै या काळात ३४ हजार ९९१ नमुने घेण्यात आले असून त्यात १६० मलेरिया पॉझिटिव्ह आढळले आहेत. गंभीर बाब म्हणजे, २२ जुलै रोजी मुल्ला (देवरी) आरोग्य केंद्रांतर्गत पहाडीटोला येथील पुस्तकला मुरारी पुसाम (२२) या महिलेचा मलेरियाने मृत्यू झाला. या डासांचा धसका घेत जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात फवारणी मोहिम सुरू केली आहे. दरवर्षी या काळात सदर मोहिमेतून डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जातात. यंदाही १ जूनपासून फवारणी सुरू करण्यात आली असून त्यासाठी जिल्ह्यातील ४८९ गावांची निवड करण्यात आली आहे. यात ३७१ आदिवासी तर ११८ बिगर आदिवासी गावांचा त्यात समावेश आहे. ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४ लाख ९ हजार ९३८ लोकसंख्येच्या क्षेत्रात फवारणी करून त्यांना सुरक्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ४८९ गावांत होणार फवारणी हिवताप नियंत्रण विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दरवर्षी फवारणी केली जाते. यासाठी गावे निवडली जात असून त्यासाठी विभागाने काही निकष ठरवून दिले आहेत. शिवाय ज्या गावात मागील तीन वर्षात डेंग्यू व मलेरियाने मृत्यू किंवा उद्रेक झाला असेल त्या गावांची निवड प्राधान्याने केली जाते. ठरवून देण्यात आलेल्या निकषांच्या आधारे या विभागाने यंदा ४८९ गावांची निवड केली आहे. यात आदिवासीबहुल गावांत फवारणी अगोदर उरकली जात आहे.