शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

लाखो रुपयांचा बंधारा निकामी

By admin | Updated: July 12, 2014 01:26 IST

झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बाबा मेळघाट कोल्हापूरी बंधाऱ्याचे बांधकाम झाले. कालव्यासाठी शेतकऱ्यांना ...

संतोष बुकावन अर्जुनी/मोर.झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बाबा मेळघाट कोल्हापूरी बंधाऱ्याचे बांधकाम झाले. कालव्यासाठी शेतकऱ्यांना जमिनी २० वर्षापूर्वी अधिग्रहीत झाल्या. लाखों रुपयांचा बंधारा बांधण्यात आला. कालवा तयार झाला. मात्र अद्यापही थेंबभर पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध होऊ शकले नाही. खांबी/पिंपळगाव येथील शेतकरी आजही चातकासारखी सिंचनाच्या पाण्याची प्रतिक्षा करीत आहेत.अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आ. राजकुमार बडोले यांनी २००९ मध्ये तालुक्यातील २० गावे दत्तक घेतली. त्यातील खांबी/पिंपळगाव हे एक आहे. या गावचे पुरुषोत्तम डोये हे दत्तक ग्राम समितीचे अध्यक्ष आहेत. अध्यक्ष व समितीने आमदारांकडे खांबी गावातील २० समस्यांचा आराखडा २००९ मध्ये आमदारांकडे सुपूर्द केला. या गावातील समस्या साडेचार वर्षातही पूर्ण होऊ शकल्या नाहीत, असे गावकरी, समितीचे पदाधिकारी व सरपंच यांची म्हणणे आहे.मेळघाट कोल्हापूरी बंधाऱ्यासाठी शासनाचे लाखों रुपये खर्च झाले. कालवे तयार झाले. ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून कालवा गेला त्याचा मोबदला शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही. उलट शेतजमिनीतून कालवा गेल्यामुळे काही शेतकरी भूमीहिन झाले. शेतकऱ्यांना अद्याप थेंबभर सिंचनाचे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. हे दत्तक ग्राम योजनेतील प्रमुख मागणी होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची खांबी या गावाच्या नावाने अस्तित्वात आहे. ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी तयार करण्यात आली. १९ गावांसाठी ही योजना आहे. मात्र या पाणीपुरवठा योजनेचा थेंबभर पाणी गावकऱ्यांना मिळाले नाही. खांबी पाणी पुरवठा योजनेच्या नावे दरवर्षी लाखों रुपयांचा निधी येतो. पण हा नेमका कुठे खर्च होतो असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.राहुल रेवीचंद फुंडे हा युवक पूर्णत: अपंग आहे. दत्तक ग्राम योजनेच्या सभेत आ. बडोले यांनी या युवकाला दरमहा ५०० रुपये मदत देण्याची घोषणा केली. मात्र गेल्या साडेचार वर्षात एकही पैसा देण्यात आला नसल्याचे दत्तक ग्राम योजनेचे पदाधिकारी सांगतात. दलित वस्तीत १ कि.मी. रस्त्याचे सिमेंटीकरण अथवा खडीककरण शिल्लक आहे. खांबी या गावची लोकसंख्या १३७० आहे. शेती व मजुरी हे रोजगाराचे साधन आहे. या गावातील ७० टक्के लोक रोजगारासाठी हंगामात स्थलांतर करतात. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी या गावावरून वाहतुकीची साधने नाहीत. दिवसातून केवळ एक बस एकदाच ये-जा करते. स्वत:च्या वाहनाने गावकरी ये-जा करतात. गतवर्षी शालेय विद्यार्थ्यांना एस.टी. बसच्या पासेस देण्यात आल्या मात्र बस उपलब्ध झाली नाही. विद्यार्थी सायकल व पायदळ चार कि.मी. अंतरावरील बोंडगावदेवी येथे शिक्षणासाठअी ये-जा करतात. आमदारांकडे सिंचन, नळयोजना यासारख्या समस्यांचे निवेदन देण्यात आले. मात्र समस्यांचे निराकरण झाले नसल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जॉब कार्डधारकांना शासनाने वर्षात किमान शंभर दिवस रोजगाराची हमी दिली असली तरी या गावात १०० दिवस रोजगार उपलब्ध झाले नाही.खांबी हे गाव दत्तक घेताना २० समस्या मांडण्यात आल्या. गेल्या साडेचार वर्षात यापैकी केवळ चार समस्यांचे निराकरण झाले. उर्वरित १६ समस्या अजूनही कायम आहेत. दत्तक गावांसाठी आमदारांनी आमदार निधीचा पुरेसा वापर केला नाही. साडेचार वर्षात गावाच्या दृष्टीने खांबी ते इंजोरी व खांबी ते निमगाव रस्त्यावरील नाल्यांवर लहान पुलांचे महत्वपूर्ण काम झाले. या गावातील ९० टक्के अतिक्रमणधारकांना वनजमिनी कायद्यांतर्गत पट्टे मिळाले. बंधारा बांधकामाचे पाईप, लोखंडी पत्रे, दरवाजे, आदी चोरीला गेले असल्याचे सांगितले जाते. कंत्राटदाराने या साहित्याचा वापर केला नसल्याचे काही लोक सांगतात.या संदर्भात सरपंच शारदा खोटेले यांच्याशी चर्चा केली असता आ. बडोले यांनी केवळ दोनदा गावात भेट दिली. एकदा मंदिराच्या भूमिपूजनासाठी तर दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीदरम्यान खा. नाना पटोले यांंच्यासोबत प्रचारासाठी आल्याचे सांगितले. गावकऱ्यांशी चर्चा केली असता आमदार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो त्यांनी वर्षातून किमान दोनदा गावात भेट द्यावी. विकासकामे करावी हे गाव केवळ कागदोपत्री दत्तक म्हणून नोंद आहे. जी नैसर्गिक विकासकामे व्हायची तेवढीच कामे झाली.आमदारांने गाव दत्तक घेतले तेव्हापासूनच ते या गावापासून दूरावले अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.