शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिल्या १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z समाज आक्रमक, सरकारविरोधात जोरदार निदर्शने
3
बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
4
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
5
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
6
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
7
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
8
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
9
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
10
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 
11
१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा
12
प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक
13
"कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर ३ तास रडत होतो", संजय दत्तचा खुलासा, म्हणाला- "माझी पत्नी, मुलं सगळंच..."
14
विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे?
15
Pitru Paksha 2025: पितृपक्षात इतर प्राणी पक्षी सोडून कावळ्यालाच एवढं महत्त्व का? वाचा!
16
खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे
17
नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
18
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
19
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
20
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?

धान पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 7, 2015 00:27 IST

यंदा एकूण पडलेल्या पावसात गोंदिया जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा सालेकसा तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे.

कीटकनाशक निष्फळ : एकाच वेळी अनेक रोगांचा हल्लासालेकसा : यंदा एकूण पडलेल्या पावसात गोंदिया जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा सालेकसा तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. याचा फायदा अनेक ठिकाणी धानपिकांवर झालेला आहे. त्यामुळे सुरुवातीला रोवणी करण्यात आलेल्या शेतीत भरघोष उत्पादन होण्याची चित्रे दिसत आहेत. परंतु काही शेतामध्ये धानावर अनेक प्रकारच्या किडीने हल्ला चढवला असल्यामुळे तालुक्यात शेकडो हेक्टर शेतीत धानपीक येण्यापुर्वीच तणाचे तणीस झाल्याचे चित्र दिसत आहेत. काही शेतकऱ्यांच्या संपुर्ण शेतीवर सरसकट किडींचा हल्ला सुरु झाला आहे. त्यामुळे त्यांना धानपीक प्राप्त करुन घरी आणता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी धास्तावले आहेत. तालुक्याच्या कावराबांध झालीया धानोली साकरीटोला परिसरात तसेच उन्हाळी धानपीक घेण्यात आलेल्या शेती पिरसरात धान पिकांवर एवढा किंडीचे आक्रमक झाले की शेतकरी सतत किटकनाशक फवारणी करीत आहेत. रोगावर नियंत्रण करण्यात अपयशी होत आहे. खोडकिडी, मावा तुडतुडा, बेरडी फक्त इत्यादी रोगांचे सारखे आक्रमक झाल्याने पाने गुंडाळणारी अळी, तणाला पोकळ करणारी अळी, पाने खाणारी अळी इत्यादी अनेक प्रकारच्या अळ्या सारख्या हल्ला करीत आहेत. ऐनवेळी कोणती अळी आक्रमण केल्याने हातात येणारे पिक नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)पिकांचे सर्वेक्षण कराअनेक शेतकऱ्यांनी रोगग्रस्त झालेल्या शेतातील पिकांचे सर्वेक्षण करुन शासनाने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू कटरे, लक्ष्मण नागपूरे यांच्या नेतृत्वात अनेक शेतात प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यात त्यांना पिकांची दयनीय अवस्था आढळून आली. महसूल विभागाने पाहणी करुन अहवाल सादर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.योग्य मार्गदर्शन व नियोजन हवेधानपिकावर रोगांवर किंवा रोग होण्यापुर्वी शेतकऱ्यांनी अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन घेवून शेतीचे नियोजन करावे. खोडकिडीचा प्रभाव झाल्यास वरुन कितीही फवारणी केली तरी ते किड मरत नाही. कारण ते कीड बुडात तनाच्या आत असते. धानाची कापणी जमिनीला लागून झाल्यास दुसऱ्या हंगामात खोडकिडीचा प्रभाव कमी पडतो. नर्सरी रोवणी च्या पुर्वी सुरुवातीलाच थायमेट सारखी औषधी टाकावी. काही मिळ किड असतात. ते किडीच्या अळी खातात म्हणून ते मरुन नये अशी औषधी टाकू नका. कृषी विभागाचा सल्ला घेवून औषधी फवारणी करा’’- टी.एस. तुरकर, कृषी सहायक