शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

धान पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 7, 2015 00:27 IST

यंदा एकूण पडलेल्या पावसात गोंदिया जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा सालेकसा तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे.

कीटकनाशक निष्फळ : एकाच वेळी अनेक रोगांचा हल्लासालेकसा : यंदा एकूण पडलेल्या पावसात गोंदिया जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा सालेकसा तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. याचा फायदा अनेक ठिकाणी धानपिकांवर झालेला आहे. त्यामुळे सुरुवातीला रोवणी करण्यात आलेल्या शेतीत भरघोष उत्पादन होण्याची चित्रे दिसत आहेत. परंतु काही शेतामध्ये धानावर अनेक प्रकारच्या किडीने हल्ला चढवला असल्यामुळे तालुक्यात शेकडो हेक्टर शेतीत धानपीक येण्यापुर्वीच तणाचे तणीस झाल्याचे चित्र दिसत आहेत. काही शेतकऱ्यांच्या संपुर्ण शेतीवर सरसकट किडींचा हल्ला सुरु झाला आहे. त्यामुळे त्यांना धानपीक प्राप्त करुन घरी आणता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी धास्तावले आहेत. तालुक्याच्या कावराबांध झालीया धानोली साकरीटोला परिसरात तसेच उन्हाळी धानपीक घेण्यात आलेल्या शेती पिरसरात धान पिकांवर एवढा किंडीचे आक्रमक झाले की शेतकरी सतत किटकनाशक फवारणी करीत आहेत. रोगावर नियंत्रण करण्यात अपयशी होत आहे. खोडकिडी, मावा तुडतुडा, बेरडी फक्त इत्यादी रोगांचे सारखे आक्रमक झाल्याने पाने गुंडाळणारी अळी, तणाला पोकळ करणारी अळी, पाने खाणारी अळी इत्यादी अनेक प्रकारच्या अळ्या सारख्या हल्ला करीत आहेत. ऐनवेळी कोणती अळी आक्रमण केल्याने हातात येणारे पिक नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)पिकांचे सर्वेक्षण कराअनेक शेतकऱ्यांनी रोगग्रस्त झालेल्या शेतातील पिकांचे सर्वेक्षण करुन शासनाने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू कटरे, लक्ष्मण नागपूरे यांच्या नेतृत्वात अनेक शेतात प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यात त्यांना पिकांची दयनीय अवस्था आढळून आली. महसूल विभागाने पाहणी करुन अहवाल सादर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.योग्य मार्गदर्शन व नियोजन हवेधानपिकावर रोगांवर किंवा रोग होण्यापुर्वी शेतकऱ्यांनी अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन घेवून शेतीचे नियोजन करावे. खोडकिडीचा प्रभाव झाल्यास वरुन कितीही फवारणी केली तरी ते किड मरत नाही. कारण ते कीड बुडात तनाच्या आत असते. धानाची कापणी जमिनीला लागून झाल्यास दुसऱ्या हंगामात खोडकिडीचा प्रभाव कमी पडतो. नर्सरी रोवणी च्या पुर्वी सुरुवातीलाच थायमेट सारखी औषधी टाकावी. काही मिळ किड असतात. ते किडीच्या अळी खातात म्हणून ते मरुन नये अशी औषधी टाकू नका. कृषी विभागाचा सल्ला घेवून औषधी फवारणी करा’’- टी.एस. तुरकर, कृषी सहायक