शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल दुनियेतही टपालचे महत्त्व कायमच

By admin | Updated: October 10, 2016 00:19 IST

संदेश वहनाची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी टपालचे महत्त्व आजही टिकून आहेत. पोस्टकार्ड व

राज्याचे टपाल विभाग फायद्यातच : टेलीग्राम व अंडर पोस्टिंग सेवा बंद नरेश रहिले ल्ल गोंदिया संदेश वहनाची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी टपालचे महत्त्व आजही टिकून आहेत. पोस्टकार्ड व आंतरदेशीकार्ड वगळता सर्व टपाल सुरुच आहेत. टपाल वाहतुकीचे काम मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इंटरनेट व मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला असला तरी टपालाचे महत्व कायमच आहे. पूर्वीच्या काळी भावनात्मक दृष्ट्या एकमेकांना जवळ आणण्याचे काम पोस्टाचे पत्र किंवा आंतरदेशी कार्ड करायचे. पोस्टमन कधी येईल याची प्रतीक्षा नागरिकांना असायची. नातेवाईकांनी पाठविलेले पत्र डाक कार्यालयात आले का याची शहनिशाही अनेकदा करायचे किंवा त्या पत्राच्या प्रतीक्षेत लोक असायचे. परंतु आता संदेश वहनाची कामे मोबाईलचे एसएमएस, फोन, व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल, फेसबुक, टिष्ट्वटर या माध्यमातून केले जातात. डाक विभागाचे संदेश वहन म्हणजे पोस्टकार्ड व अंतरदेशीकार्ड आता संदेशासाठी विक्रीला जात नाही. मात्र टपालचे महत्व कमी झाले असे मुळीच नाही. पूर्वीच्या तुलनेत लोक शिक्षीत झाले आहेत. आजच्या काळात ९० टक्के लोक सुशिक्षीत असल्यामुळे आपला व्यवहार करताना पोस्टाचा आधार घेतात असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सर्व बँकांचे एटीएम, महत्वाची कागदपत्रे, चेकबुक किंवा कोणतेही कागदपत्र पोस्टाच्याच माध्यमातून पाठविण्यात येतात. संदेश वहनाची इतकी साधने उपलब्ध नव्हती त्यावेळी दिवसाला १०० पोस्ट पत्रके पाठविली जात असली तर आता ५०० पोस्ट पत्र आता एकाच दिवशी पाठविले जात आहेत. यात एका दिवसात ४०० पत्राने वाढ झाली आहे. आता एलआयसीचे सर्व कागदपत्र पोस्टाच्याच माध्यामातून जात आहेत. सन २०१० मध्ये सरकारने केलेल्या मुल्यमापनात महाराष्ट्राची डाकसेवा १०७ कोटींच्या फायद्यात होती. आधुनिकीकरणाबरोबरच आताही महाराष्ट्र पुढे आहे. डाकविभागाचे काम वाढले आहे. परंतु सन १९८२ पासून भरती झाली नसल्याने मनुष्यबळाचा अभाव डाक विभागाला जाणवत आहे. शहराचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु पोस्टमन वाढविण्यात येत नाही. डाक विभागाने वेळेनुसार वर्षभरापूर्वी टेलीग्राम व दोन वर्षापूर्वी अंडर पोस्टींग सेवा बंद केली आहे. असे असतानाही डिजिटल दुनियेत टपालाचे महत्त्व आजही कायम आहे. दिल्या जातात या नवीन सेवा ४डाक विभागामार्फत अटल पेंशन, न्यू पेंशन स्कीम, गंगाजल, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसाद, एक्स्प्रेस पोस्टल पोस्ट, फॉरेन मेल, स्पीडपोस्ट, पीएलआय, आरपीएलआयची सेवा देण्यात येत आहे. नागरिकांना विश्वसनीय वाटणाऱ्या डाक विभागाची सेवा आजही जोमाने दिली जात आहे. आधुनिकीकरणातही पोस्टाचे किंचीतही महत्व कमी झाले नाही. -एच.आर. लांजेवार प्रभारी डाकपाल, गोंदिया मुख्य शाखा