शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश गवई म्हणाले- पहलगाम विसरू शकत नाही
3
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
4
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
5
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
6
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
7
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
8
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
9
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
10
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
11
लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
12
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
13
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
14
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
15
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
16
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
17
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
18
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
19
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

डिजिटल दुनियेतही टपालचे महत्त्व कायमच

By admin | Updated: October 10, 2016 00:19 IST

संदेश वहनाची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी टपालचे महत्त्व आजही टिकून आहेत. पोस्टकार्ड व

राज्याचे टपाल विभाग फायद्यातच : टेलीग्राम व अंडर पोस्टिंग सेवा बंद नरेश रहिले ल्ल गोंदिया संदेश वहनाची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी टपालचे महत्त्व आजही टिकून आहेत. पोस्टकार्ड व आंतरदेशीकार्ड वगळता सर्व टपाल सुरुच आहेत. टपाल वाहतुकीचे काम मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इंटरनेट व मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला असला तरी टपालाचे महत्व कायमच आहे. पूर्वीच्या काळी भावनात्मक दृष्ट्या एकमेकांना जवळ आणण्याचे काम पोस्टाचे पत्र किंवा आंतरदेशी कार्ड करायचे. पोस्टमन कधी येईल याची प्रतीक्षा नागरिकांना असायची. नातेवाईकांनी पाठविलेले पत्र डाक कार्यालयात आले का याची शहनिशाही अनेकदा करायचे किंवा त्या पत्राच्या प्रतीक्षेत लोक असायचे. परंतु आता संदेश वहनाची कामे मोबाईलचे एसएमएस, फोन, व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल, फेसबुक, टिष्ट्वटर या माध्यमातून केले जातात. डाक विभागाचे संदेश वहन म्हणजे पोस्टकार्ड व अंतरदेशीकार्ड आता संदेशासाठी विक्रीला जात नाही. मात्र टपालचे महत्व कमी झाले असे मुळीच नाही. पूर्वीच्या तुलनेत लोक शिक्षीत झाले आहेत. आजच्या काळात ९० टक्के लोक सुशिक्षीत असल्यामुळे आपला व्यवहार करताना पोस्टाचा आधार घेतात असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सर्व बँकांचे एटीएम, महत्वाची कागदपत्रे, चेकबुक किंवा कोणतेही कागदपत्र पोस्टाच्याच माध्यमातून पाठविण्यात येतात. संदेश वहनाची इतकी साधने उपलब्ध नव्हती त्यावेळी दिवसाला १०० पोस्ट पत्रके पाठविली जात असली तर आता ५०० पोस्ट पत्र आता एकाच दिवशी पाठविले जात आहेत. यात एका दिवसात ४०० पत्राने वाढ झाली आहे. आता एलआयसीचे सर्व कागदपत्र पोस्टाच्याच माध्यामातून जात आहेत. सन २०१० मध्ये सरकारने केलेल्या मुल्यमापनात महाराष्ट्राची डाकसेवा १०७ कोटींच्या फायद्यात होती. आधुनिकीकरणाबरोबरच आताही महाराष्ट्र पुढे आहे. डाकविभागाचे काम वाढले आहे. परंतु सन १९८२ पासून भरती झाली नसल्याने मनुष्यबळाचा अभाव डाक विभागाला जाणवत आहे. शहराचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु पोस्टमन वाढविण्यात येत नाही. डाक विभागाने वेळेनुसार वर्षभरापूर्वी टेलीग्राम व दोन वर्षापूर्वी अंडर पोस्टींग सेवा बंद केली आहे. असे असतानाही डिजिटल दुनियेत टपालाचे महत्त्व आजही कायम आहे. दिल्या जातात या नवीन सेवा ४डाक विभागामार्फत अटल पेंशन, न्यू पेंशन स्कीम, गंगाजल, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसाद, एक्स्प्रेस पोस्टल पोस्ट, फॉरेन मेल, स्पीडपोस्ट, पीएलआय, आरपीएलआयची सेवा देण्यात येत आहे. नागरिकांना विश्वसनीय वाटणाऱ्या डाक विभागाची सेवा आजही जोमाने दिली जात आहे. आधुनिकीकरणातही पोस्टाचे किंचीतही महत्व कमी झाले नाही. -एच.आर. लांजेवार प्रभारी डाकपाल, गोंदिया मुख्य शाखा