शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जिल्हावासीयांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: April 7, 2017 01:28 IST

सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत माणसाला लागणाऱ्या अनेक गोष्टी त्याच्या आरोग्याशी निगडीत असतात.

अन्न प्रशासनच नाही : विषयुक्त पदार्थांचे करावे लागते सेवन, तपासणी शून्यमनोज ताजने   गोंदियासकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत माणसाला लागणाऱ्या अनेक गोष्टी त्याच्या आरोग्याशी निगडीत असतात. त्यांची तपासणी करण्यासाठी शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. मात्र गेल्या १७ वर्षात गोंदिया जिल्ह्यात ही यंत्रणा नसल्यामुळे जिल्हावासीयांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येत आहे.ज्या-ज्या गोष्टी आपण तोंडावाटे सेवन करतो त्या आरोग्यासाठी कितपत हितकारक आहेत आणि कितपत घातक याची कल्पना वरकरणी आपल्याला नसते. त्यामुळेच या गोष्टींची वेळोवेळी तपासणी करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांसह, निरीक्षक व इतर संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र राज्याच्या ३५ जिल्ह्यात गोंदिया जिल्हा मात्र त्यासाठी अपवाद ठरला आहे. जिल्ह्याच्या निर्मितीला येत्या १ मे २०१७ रोजी १८ वर्षे पूर्ण होतील. परंतू व्यापारी शहर असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात या विभागाची यंत्रणाच कार्यरत नाही. आजही या जिल्ह्याचा कारभार भंडारा येथील अन्न व औषध प्रशासन विभाग पाहात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असणाऱ्या या अत्यावश्यक विभागाची यंत्रणा व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात असू नये याचे आश्चर्य खुद्द सरकारी यंत्रणेलाही आहे. पण शासनच त्यासाठी उदासीन असेल तर आम्ही काय करणार? असा प्रश्न संबंधित अधिकारी करतात. त्यामुळे विद्यमानच नाही तर आतापर्यंतच्या सरकारलाही गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सध्या बालाघाट मार्गावरील एका भाड्याच्या इमारतीत या विभागाचे एक कार्यालय आहे. त्या ठिकाणी भंडारा येथील एका लिपिकाला डेप्युटेशनवर पाठविले होते. पण भंडारा कार्यालयात कर्मचारी कमी असल्यामुळे त्या लिपिकाला आता जास्तीत जास्त वेळ भंडाऱ्याला द्यावा लागत आहे. याशिवाय एक अन्न निरीक्षक व एका औषध निरीक्षकाला गोंदियाला पाठविले आहे. परंतू ते कार्यालयात कधी दिसत नाही. त्यामुळे अन्न व औषधात भेसळ करणाऱ्यांसाठी गोंदिया जिल्ह्यात रान मोकळे आहे. यातूनच जिल्हावासियांचे आरोग्य पणाला लागले आहे.खाद्यपदार्थाची विक्री करणारे प्रत्येक दुकानदार, रेस्टॉरेंट मालक तसेच औषधी विक्रेते यांना दरवर्षी आपल्या परवान्याचे नुतनीकरण करावे लागते. त्यासाठी भंडाऱ्याला चकरा माराव्या लागतात. सहायक आयुक्तांचे कार्यालय जर गोंदियात असते तर त्यांचा वेळ, पैसा वाचला असता. पण आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष दिलेले नाही.नियमांची ऐसीतैसी, कारवाई मात्र नाहीचार वर्षापूर्वी गोंदियात मध्यप्रदेशातून येणारा बोगस खोवा पकडला होता. एवढेच नाही तर बोगस खोव्याचा वापर करून मिठाई बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. पण त्यानंतर गेल्या चार वर्षात कोणाचीही तपासणी होऊन कारवाई झाली नाही. खोव्याप्रमाणेच नागरिकांच्या दैनंदिन वापराचा अविभाज्य घटक असलेल्या खाद्यतेलातही गोंदियात भेसळ होते. अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी नागपूरसह सर्वत्र नियमित कारवाया करते, पण गोंदियात कोणावरही कारवाई झालेली नाही.राज्य शासनाने तंबाखूजन्य खर्ऱ्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे खर्रा विकताना आढळणाऱ्या पानठेल्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न निरीक्षकांची आहे. पण गोंदियात आजपर्यंत एकाही पानठेल्यावर कारवाई झालेली नाही.