शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

समूह गट सेंद्रिय शेती शेतकºयांसाठी फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 21:13 IST

समाजात वावरत असताना आजघडीला एकत्र कुटुंब पद्धती दिसून येत नाही. प्रत्येक कुटुंबाचे विभाजन होत असल्याने शेतीचे तुकडे पडतात. लहान-लहान शेतजमिनीच्या आकारात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेता येत नाही.

ठळक मुद्देकृषी अधिकारी तुमडाम : भरणोली येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : समाजात वावरत असताना आजघडीला एकत्र कुटुंब पद्धती दिसून येत नाही. प्रत्येक कुटुंबाचे विभाजन होत असल्याने शेतीचे तुकडे पडतात. लहान-लहान शेतजमिनीच्या आकारात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेता येत नाही. शेतीमधून अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन सामूहिक गट सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढे यावे, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी दिला.मंडळ कृषी अधिकारी कार्यालय नवेगावबांध अंतर्गत येणाºया भरणोली येथे समाज मंदिरात समूह गट सेंद्रिय शेती प्रकल्प राबविण्यासंदर्भात आयोजित ग्रामस्थांच्या सभेत ते बोलत होते.याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी संजय रामटेके, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे उपस्थित होते. तसेच सरपंच प्रमिला कोरामी, पं.स. सदस्य रामलाल मुंगणकर, माजी पं.स. सभापती तानेश ताराम, तंमुस अध्यक्ष कन्हैयालाल राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.शेतकºयांना मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी तुमडाम म्हणाले, दिवसेंदिवस शेतजमिनीचे भावाभावांमध्ये हिस्सेवाटे होत असल्याने जमिनीचे विभाजन होत आहे. पर्यायाने शेतीशी निगडीत नवनवीन तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करुन शेतीची मशागत करणे अशक्य होत आहे. विपणन पद्धत, काढणीनंतर प्रक्रिया करणे, प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धन, शेतीपूरक जोडधंदे उभारणे शक्य होत नाही. या समस्यांवर मात करण्यासाठी गावातील शेतकºयांनी एकत्र येवून समूह गट शेती करण्यासाठी पुढे येणे काळाची गरज आहे, असे सांगून समूह गट शेती प्रकल्प राबविण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सर्वोतोपरी मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.नवेगावबांधचे मंडळ कृषी अधिकारी संजय रामटेके यांनी समूह सेंद्रिय गट शेतीसंबंधी मार्गदर्शन करताना म्हणाले, शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात कीटकनाशके व रासायनिक खताचा वापर केला जातो. काही ठिकाणी अमर्याद मात्राचा डोस दिला जातो. त्यामुळे त्याचा आरोग्यावरसुद्धा परिणाम होतो. शेती करताना खर्चाला आळा बसणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती सामान्य शेतकºयांना परवडणारी आहे. सेंद्रिय शेती केल्याने शेतकºयांचा निविष्टांवर होणाºया खर्चाची बचत होणार असल्याचे सांगून ते म्हणाले, सेंद्रिय शेतीमधून उत्पादित केलेल्या मालाला मनाप्रमाणे भाव मिळून जास्तीत जास्त आर्थिक फायदा निश्चितपणे मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शेतकºयांनी एकत्र येत शेती करण्याचे आवाहन केले.तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या सेंद्रिय शेतीबाबद शेतकºयांना माहिती दिली. संचालन व आभार कृषी सहायक मोतीलाल येळणे यांनी केले. मार्गदर्शन सभेला गावातील महिला-पुरुष शेतकरी उपस्थित होते.