शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

समूह गट सेंद्रिय शेती शेतकºयांसाठी फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 21:13 IST

समाजात वावरत असताना आजघडीला एकत्र कुटुंब पद्धती दिसून येत नाही. प्रत्येक कुटुंबाचे विभाजन होत असल्याने शेतीचे तुकडे पडतात. लहान-लहान शेतजमिनीच्या आकारात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेता येत नाही.

ठळक मुद्देकृषी अधिकारी तुमडाम : भरणोली येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : समाजात वावरत असताना आजघडीला एकत्र कुटुंब पद्धती दिसून येत नाही. प्रत्येक कुटुंबाचे विभाजन होत असल्याने शेतीचे तुकडे पडतात. लहान-लहान शेतजमिनीच्या आकारात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेता येत नाही. शेतीमधून अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन सामूहिक गट सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढे यावे, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी दिला.मंडळ कृषी अधिकारी कार्यालय नवेगावबांध अंतर्गत येणाºया भरणोली येथे समाज मंदिरात समूह गट सेंद्रिय शेती प्रकल्प राबविण्यासंदर्भात आयोजित ग्रामस्थांच्या सभेत ते बोलत होते.याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी संजय रामटेके, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे उपस्थित होते. तसेच सरपंच प्रमिला कोरामी, पं.स. सदस्य रामलाल मुंगणकर, माजी पं.स. सभापती तानेश ताराम, तंमुस अध्यक्ष कन्हैयालाल राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.शेतकºयांना मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी तुमडाम म्हणाले, दिवसेंदिवस शेतजमिनीचे भावाभावांमध्ये हिस्सेवाटे होत असल्याने जमिनीचे विभाजन होत आहे. पर्यायाने शेतीशी निगडीत नवनवीन तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करुन शेतीची मशागत करणे अशक्य होत आहे. विपणन पद्धत, काढणीनंतर प्रक्रिया करणे, प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धन, शेतीपूरक जोडधंदे उभारणे शक्य होत नाही. या समस्यांवर मात करण्यासाठी गावातील शेतकºयांनी एकत्र येवून समूह गट शेती करण्यासाठी पुढे येणे काळाची गरज आहे, असे सांगून समूह गट शेती प्रकल्प राबविण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सर्वोतोपरी मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.नवेगावबांधचे मंडळ कृषी अधिकारी संजय रामटेके यांनी समूह सेंद्रिय गट शेतीसंबंधी मार्गदर्शन करताना म्हणाले, शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात कीटकनाशके व रासायनिक खताचा वापर केला जातो. काही ठिकाणी अमर्याद मात्राचा डोस दिला जातो. त्यामुळे त्याचा आरोग्यावरसुद्धा परिणाम होतो. शेती करताना खर्चाला आळा बसणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती सामान्य शेतकºयांना परवडणारी आहे. सेंद्रिय शेती केल्याने शेतकºयांचा निविष्टांवर होणाºया खर्चाची बचत होणार असल्याचे सांगून ते म्हणाले, सेंद्रिय शेतीमधून उत्पादित केलेल्या मालाला मनाप्रमाणे भाव मिळून जास्तीत जास्त आर्थिक फायदा निश्चितपणे मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शेतकºयांनी एकत्र येत शेती करण्याचे आवाहन केले.तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या सेंद्रिय शेतीबाबद शेतकºयांना माहिती दिली. संचालन व आभार कृषी सहायक मोतीलाल येळणे यांनी केले. मार्गदर्शन सभेला गावातील महिला-पुरुष शेतकरी उपस्थित होते.