शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात प्रदूषण मोजणारे यंत्रच नाहीत

By admin | Updated: June 5, 2017 00:55 IST

जिल्ह्यात मोठे उद्योग नसले तरी लघुउद्योगात मोडणाऱ्या आणि जिल्हाभर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या राईस मिल्समुळे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास : राईस मिल्सची तपासणी अधिकाऱ्यांच्या मनमर्जीनेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मोठे उद्योग नसले तरी लघुउद्योगात मोडणाऱ्या आणि जिल्हाभर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या राईस मिल्समुळे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र दूषित गोंदियाचे प्रदूषण किती आहे हे जाणून घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे गुणवत्ता मोजणारे यंत्रच नाही. प्रदूषण आणि पर्यावरणाच्या बाबतीत सरकार विविध उपाययोजना करीत असताना गोंदियातील प्रदूषणाकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे ‘अर्थपूर्ण’ संबंध कारणीभूत असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे याकडे आतापर्यंत जिल्हा प्रशासनानेही कधी गांभिर्याने लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.‘रेड’ मार्क असलेल्या उद्योगांची महिन्यातून दोन वेळा तपासणी करून त्या संदर्भातील सूचना संबधित कंपनीला दिली जाते. गोंदियात अदानी व टीम फेरो या दोन उद्योग कंपन्यांची तपासणी दर महिन्याला केली जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यात २६० राईस मिल्स असून त्यांची गेल्या दोन वर्षापासून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणीच झालेली नाही. राईस मिल्समधून फक्त धानाची मळणी करून तांदूळ बनविणाऱ्या २०० तर उष्णा तांदूळ तयार करणाऱ्या ६० राईस मिल्स आहेत. तांदूळ तयार करणाऱ्या राईस मिल्सना प्रदूषण मंडळ प्लेन लि तर उष्णा तांदूळ काढणाऱ्या मिल्सना पॅरामीट राईस मिल म्हणून संबोधतात. या राईस मिलमुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते. या राईस मिलपासून होणाऱ्या प्रदूषणाची गुणवत्ता मोजणारे यंत्र गोंदिया शहरात नाही. गोंदिया जिल्हा निर्मीती होऊन १६ वर्षाचा कालावधी लोटला, मात्र गोंदियात अजूनही प्रदुषण मापक यंत्रणा नाही. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण मोजणारे केंद्र शासनातर्फे देण्यात आले नाही. त्यासाठी प्रस्तावही पाठविण्यात आला नाही. दिवसेंदिवस गोंदियात वाहनांची गर्दीही वाढत आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होणे साहजिकच आहे. राईस मिल्समधून निघणारा प्राणघातक वायू दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याची तपासणी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी येतच नाही. यावरून गोंदियातील राईस मिल मालक व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याची खात्री पटते.वृक्षांची कत्तल व लागणाऱ्या आगी कारणीभूतवाढत्या प्रदूषणाबरोबर सतत होणाऱ्या झाडांच्या कत्तलीमुळे जंगलाचे रूपांतर माळरानात होत आहेत. त्यामुळे संतुलन ढासळत आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०१६ मध्ये मोठ्या प्रमाणात वन जमिनीला आग लागली. जिल्ह्याच्या ४३ टक्के जमीनीवर वन आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात २५ हजारापेक्षा झाडांची कत्तल करण्यात आली. ही कारणे पर्यावरणाला घातक ठरत आहेत.एकच व्यक्ती सांभाळते दोन जिल्हेप्रदूषण नियंत्रण मंडळात चार पदे मंजूर असून फक्त उपप्रादेशिक प्रदूषण अधिकारी हे एकच अधिकारी कार्यरत आहेत. तीन फिल्ड आॅफीसरची पदे मंजूर असताना तिन्ही पदे रिक्त असल्याची माहिती आहे. रिक्त पदांमुळे मागील अनेक वर्षापासून गोंदियातील प्रदूषण किती आहे हे अधिकाऱ्यांना सांगताच येत नाही.रेतीमाफियांमुळे ढासळतेय पर्यावरणनद्यांमुळे जलस्तर वाढतो. नदीतील पाण्याला जमिनीत मुरविण्यासाठी त्या नदीतील रेती महत्वाची ठरते. परंतु अलीकडे रेतीचा उपसा करणारे कंत्राटदार पर्यावरण नियमांना बगल देत जेसीबीच्या सहाय्याने नदीतील रेती काढतात. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. बाराही महिने प्रवाहित असणारी वैनगंगा नदी यावर्षी कोरडी झाली. त्यामुळे रेती उपसा करणाऱ्या कंत्राटदारांनी या नदीची काय दुरवस्था केली आहे, याची कल्पना येते.