शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बांबूंपासून रोजगार मिळवा

By admin | Updated: March 9, 2016 02:53 IST

जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात बांबू आहे. जिल्ह्यातील बुरड कामगारांचे व बांबू कारागिरांचे जीवन बांबूवर अवलंबून आहे.

पालकमंत्री बडोले : बांबू साठवणूक गोदामाचे भूमिपूजन गोंदिया : जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात बांबू आहे. जिल्ह्यातील बुरड कामगारांचे व बांबू कारागिरांचे जीवन बांबूवर अवलंबून आहे. शासन कौशल्य विकासाला प्राधान्य देत असून जिल्ह्यातील बांबू कारागिरांनी त्यांच्या कौशल्यातून बांबूपासून विविध साहित्य व वस्तूंची निर्मिती करुन मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवावा, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील महागाव येथे रविवारी (दि.७) सहवनक्षेत्र सहायक कार्यालयाच्या परिसरात बांबू साठवणूक गोदामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दयाराम कापगते, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जि.प.सदस्य भास्कर आत्राम, जि.प.माजी सभापती प्रकाश गहाणे, उमाकांत ढेंगे, पं.स.सदस्य रामदास कोहाडकर, सरपंच पपिता जांभूळकर, उपसरपंच त्र्यंबक झोडे, बुरड कामगार संस्थेचे अध्यक्ष कैलास वरखडे यांची उपस्थिती होती. पालकमंत्री बडोले म्हणाले, बुरड व्यवसाय करणारे अत्यंत गरीबीतून जीवन जगत आहे. त्यांचा बाबू हा आधार आहे. या बांबू साठवणूक गोदामामुळे त्यांना बांबू उपलब्ध होणार असून बांबूपासून विविध वस्तू व साहित्यांची येथे निर्मिती करता येईल. त्यांना चांगल्याप्रकारे बांबूपासून कौशल्यपूर्ण वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांच्या वस्तू प्रदर्शनात ठेवून त्याची विक्र ी मोठ्या प्रमाणात करता येईल. सर्वसामान्य नागरिकांनासुध्दा या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचा विचार असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पूढे म्हणाले, संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वन व्यवस्थापनाचे चांगले काम या क्षेत्रात उभे राहू शकते. जिल्हा वन व जलसंपन्न असल्यामूळे जिल्ह्यात एकात्मिक योजना तयार करु न भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचा विचार आहे. बोड्या व तलावांचे रोजगार हमी योजनेतून खोलीकरण करु न पाणी साठे निर्माण होण्यासोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गहाणे यांनी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या व विविध घटकातील लाभार्थ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती ग्रामस्थांना व लाभार्थ्यांना देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने पार पाडावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.महागावातील बांबू शिल्पकार उत्तम प्रकारचे साहित्य निर्माण करतील असा विश्वास व्यक्त करु न कापगते यांनी, बुरड कामगारांना येथील उपलब्ध होणाऱ्या बांबूपासून चांगल्या प्रकारच्या वस्तू व साहित्यांची निर्मिती करता येईल. कौशल्यातून कलात्मक बांबू साहित्यांची निर्मिती करावी. जंगलातील वृक्षांचा वापर जळतन म्हणून करु नका. वनविभागाने दिलेल्या गॅस कनेक्शनचा वापर स्वयंपाकासाठी करावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. कोहाडकर यांनी, बांबू साठवणूक गोदामाचे बांधकाम पावसाळयापूर्वी पुर्ण झाले पाहिजे त्यामुळे बुरड कामगारांना लवकरच तेथे काम करता येईल. रोहयोच्या माध्यमातून गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होऊन विकास कामे झाली पाहिजे. शाळेच्या मैदानाजवळ रस्त्याच्या बाजूला कॉम्प्लेक्स उभारावे त्यामुळे गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला महागांव तसेच परिसरातील गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)