शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण उड्डाणपूल पाडण्यास निधीचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे बांधकाम १९५८ मध्ये करण्यात आले होते. या उड्डाणपुलाला ६२ वर्षे झाली आहे. उड्डाणपुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅक परिसरात येत असून तो भाग जीर्ण झाला असल्याने तो खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उड्डाणपुलाला ठिकठिकाणी मोठे भगदाड पडले आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांपासून प्रक्रिया सुरू : सहा महिन्यात पाडायचा होता जीर्ण उड्डाणपूल,

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो सहा महिन्यात पाडण्यात यावा, असे पत्र रेल्वे विभागाने तीन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. मात्र अद्यापही जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली नसून आता हा पूल पाडण्यासाठी निधीचा अडसर असल्याची माहिती आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे बांधकाम १९५८ मध्ये करण्यात आले होते. या उड्डाणपुलाला ६२ वर्षे झाली आहे. उड्डाणपुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅक परिसरात येत असून तो भाग जीर्ण झाला असल्याने तो खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उड्डाणपुलाला ठिकठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने जुलै २०१८ मध्ये जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या पुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद केली. केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना या पुलावरुन वाहतूक करण्यास परवानगी दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे नागपूर येथील एका संस्थेमार्फत स्ट्रक्चरल आॅडिट केले होते.त्यात हा पूल जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने हा जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी शासनास्तरावर पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाला याला मंजुरी दिली. मात्र उड्डाणपुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅक परिसरात येत असल्याने रेल्वे विभागाची यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आठवडाभरापूर्वीच रेल्वेने जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी हिरवी झेंडी दाखविली आहे. तसेच यासाठी कोणत्या तांत्रिक बांबीची काळजी घ्यायची याचा इस्टीमेट प्लान देखील तयार करुन दिला. यासाठी ५२ लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला रेल्वे विभागाकडे जमा करायचा आहे. त्यानंतर निविदा काढून जीर्ण उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला शासनाकडून हा निधी प्राप्त होताच या कामाला गती येणार आहे. मात्र आता शासनाकडून निधी मिळण्यास किती काळ लागतो यावर ही सर्व प्रक्रिया अवलंबून आहे.पुलामुळे धोका कायमगोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला आहे.या पुलाचा बराच भाग खचत आहे. तर सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने पूल खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी या पुलामुळे धोका कायम आहे.उड्डाणपूल पाडण्यासाठी मुंबई येथील एजन्सींची निवडशहरातील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया ही फारच किचकट आहे. यासाठी अनुभवी एजन्सींची गरज आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई येथील एका एजन्सींची निवड केली आहे. मात्र यासाठी निविदा प्रक्रिया करुन पुढील काम सुरू केले जाणार आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेpwdसार्वजनिक बांधकाम विभाग