शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी दिसायला मोठा, पण आतून पोकळ

By admin | Updated: November 28, 2015 02:56 IST

यावर्षी नैसर्गिक आपदेमुळे शेतकऱ्यांना निम्म्यापेक्षा कमी उत्पन्न हाती येणार असून शेतकऱ्यांची स्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे.

बन्सोड यांचे मत : मजुरांना पेंशन मिळवून देण्याचा प्रयत्न काचेवानी : यावर्षी नैसर्गिक आपदेमुळे शेतकऱ्यांना निम्म्यापेक्षा कमी उत्पन्न हाती येणार असून शेतकऱ्यांची स्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीला पाहता तो दिसतो मोठा, पण आतून पोकळ आहे, असे मत माजी आ. दिलीप बंसोड यांनी व्यक्त केले.बरबसपुरा येथे मंडईनिमित्त तमाशाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.उद्घाटन माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या हस्ते सरपंच ममता लिचडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून पं.स. सदस्य संध्या गजभिये, उपसरपंच धनलाल रहांगडाले, माजी सरपंच सदाशिव कटरे, पोलीस दिलीप मेश्राम, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष भिष्मकुमार परिहार, ग्रा.पं. सदस्य ममता पटले, तिडके, तेजराम चौधरी उपस्थित होते.या वेळी सरपंच ममता लिचडे आणि उपसरपंच धनलाल रहांगडाले यांनी गावच्या समस्या निदर्शनात आणून दिल्या. उद्घाटनीय भाषणात माजी आ. बंसोड यांनी, पदावर असताना बरबसपुरा गावच्या समस्या आणि विकास कामाकरिता भरपूर प्रयत्न केले. आज आपण पदावर नसलो तरी समस्या घेऊन या, आपण निश्चितच सोडविण्याचा प्रयत्न करू. शेतकरी शब्द समोर येताच खूप वाईट वाटते. आज शेतकऱ्यांची समस्या अतिशय गंभीर आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या नशिबी ५० टक्के उत्पन्न मिळणार नसून त्यांच्यासमोर आर्थिक समस्या निर्माण होणार आहे, असे ते म्हणाले. मग्रारोहयोतंर्गत १०० दिवसांचे काम प्रत्येक मजुरास मिळावे याकरिता ग्रा.पं.ने कामाची योजना तयार करावी. मजुरांची यादी तयार करुन ती मंजूर करावी. याकरिता आपण केव्हाही मदत करण्यास तयार आहोत. ज्या शेतकऱ्यांनी शंभर दिवस कामे केले त्यांची नावे कल्याण कामगार आयुक्तालयात नोंदणी करून त्यांना पेंशन मिळवून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारू व त्यासाठी प्रयत्नास सुरूवात केल्याचेही त्यांनी सांगितले. संचालन प्रा. नरेश असाटी यांनी केले. आभार किशोर असाटी यांनी मानले. (वार्ताहर)ओबीसीसाठी निधी उपलब्ध होत नाहीघरकुलाचा निधी असो किंवा शिष्यवृत्तीचा निधी असो, ८० टक्के निधी केंद्रशासन आणि २० टक्के निधी राज्यशासन देते. परंतु घरकुलाकरिता निधी उपलब्ध होत नसल्याने लाखो घरकूल आजही तयार होवू शकले नाहीत. ओबीसीकरिता विकासाच्या नावावर होत असलेला अन्याय विरोधात येत्या हिवाळी अधिवेशनात आपण निदर्शनात आणून देवू, असे माजी आ. बंसोड यांनी आपल्या भाषणातून सांगितले. शाळा समित्यांनी लक्ष केंद्रित करावेसध्या शिक्षण पध्दतीत बदल होत असल्याने भविष्यात शिक्षक संख्येची समस्या निर्माण होणार आहे. पहिली ते सातवीपर्यंत असणाऱ्या शाळेत १०० पटसंख्या असेल तर मात्र तीन शिक्षक कार्यरत राहतील. तीन शिक्षक सात वर्गांना शिक्षण देवू शकणार नाही. अशावेळी खेडे गावातील विद्यार्थी गावातच राहणार नाही. याकरिता शाळा समिती आणि पालकांनी शाळेकडे लक्ष देऊन अशा समस्या निदर्शनात आणून द्यावे. यावर शासन स्तरावर आपल्याला मार्ग काढण्याचा प्रयत्न करता येईल, असा सल्ला माजी आ. बंसोड यांनी दिला.