शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी दिसायला मोठा, पण आतून पोकळ

By admin | Updated: November 28, 2015 02:56 IST

यावर्षी नैसर्गिक आपदेमुळे शेतकऱ्यांना निम्म्यापेक्षा कमी उत्पन्न हाती येणार असून शेतकऱ्यांची स्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे.

बन्सोड यांचे मत : मजुरांना पेंशन मिळवून देण्याचा प्रयत्न काचेवानी : यावर्षी नैसर्गिक आपदेमुळे शेतकऱ्यांना निम्म्यापेक्षा कमी उत्पन्न हाती येणार असून शेतकऱ्यांची स्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीला पाहता तो दिसतो मोठा, पण आतून पोकळ आहे, असे मत माजी आ. दिलीप बंसोड यांनी व्यक्त केले.बरबसपुरा येथे मंडईनिमित्त तमाशाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.उद्घाटन माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या हस्ते सरपंच ममता लिचडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून पं.स. सदस्य संध्या गजभिये, उपसरपंच धनलाल रहांगडाले, माजी सरपंच सदाशिव कटरे, पोलीस दिलीप मेश्राम, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष भिष्मकुमार परिहार, ग्रा.पं. सदस्य ममता पटले, तिडके, तेजराम चौधरी उपस्थित होते.या वेळी सरपंच ममता लिचडे आणि उपसरपंच धनलाल रहांगडाले यांनी गावच्या समस्या निदर्शनात आणून दिल्या. उद्घाटनीय भाषणात माजी आ. बंसोड यांनी, पदावर असताना बरबसपुरा गावच्या समस्या आणि विकास कामाकरिता भरपूर प्रयत्न केले. आज आपण पदावर नसलो तरी समस्या घेऊन या, आपण निश्चितच सोडविण्याचा प्रयत्न करू. शेतकरी शब्द समोर येताच खूप वाईट वाटते. आज शेतकऱ्यांची समस्या अतिशय गंभीर आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या नशिबी ५० टक्के उत्पन्न मिळणार नसून त्यांच्यासमोर आर्थिक समस्या निर्माण होणार आहे, असे ते म्हणाले. मग्रारोहयोतंर्गत १०० दिवसांचे काम प्रत्येक मजुरास मिळावे याकरिता ग्रा.पं.ने कामाची योजना तयार करावी. मजुरांची यादी तयार करुन ती मंजूर करावी. याकरिता आपण केव्हाही मदत करण्यास तयार आहोत. ज्या शेतकऱ्यांनी शंभर दिवस कामे केले त्यांची नावे कल्याण कामगार आयुक्तालयात नोंदणी करून त्यांना पेंशन मिळवून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारू व त्यासाठी प्रयत्नास सुरूवात केल्याचेही त्यांनी सांगितले. संचालन प्रा. नरेश असाटी यांनी केले. आभार किशोर असाटी यांनी मानले. (वार्ताहर)ओबीसीसाठी निधी उपलब्ध होत नाहीघरकुलाचा निधी असो किंवा शिष्यवृत्तीचा निधी असो, ८० टक्के निधी केंद्रशासन आणि २० टक्के निधी राज्यशासन देते. परंतु घरकुलाकरिता निधी उपलब्ध होत नसल्याने लाखो घरकूल आजही तयार होवू शकले नाहीत. ओबीसीकरिता विकासाच्या नावावर होत असलेला अन्याय विरोधात येत्या हिवाळी अधिवेशनात आपण निदर्शनात आणून देवू, असे माजी आ. बंसोड यांनी आपल्या भाषणातून सांगितले. शाळा समित्यांनी लक्ष केंद्रित करावेसध्या शिक्षण पध्दतीत बदल होत असल्याने भविष्यात शिक्षक संख्येची समस्या निर्माण होणार आहे. पहिली ते सातवीपर्यंत असणाऱ्या शाळेत १०० पटसंख्या असेल तर मात्र तीन शिक्षक कार्यरत राहतील. तीन शिक्षक सात वर्गांना शिक्षण देवू शकणार नाही. अशावेळी खेडे गावातील विद्यार्थी गावातच राहणार नाही. याकरिता शाळा समिती आणि पालकांनी शाळेकडे लक्ष देऊन अशा समस्या निदर्शनात आणून द्यावे. यावर शासन स्तरावर आपल्याला मार्ग काढण्याचा प्रयत्न करता येईल, असा सल्ला माजी आ. बंसोड यांनी दिला.