शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

कनेरी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या

By admin | Updated: February 18, 2015 01:33 IST

तालुक्यातील कनेरी गावात दोन वर्षापासून दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. यावर्षी उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच...

सडक-अर्जुनी : तालुक्यातील कनेरी गावात दोन वर्षापासून दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. यावर्षी उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच पाणीटंचाईने डोके वर काढले असल्याची माहिती उपसरपंच प्रेमलाल मेंढे यांनी दिली. कनेरी-राम गावाला पिण्याचे पाणी देण्यासाठी ३० हजार लिटर पाण्याची क्षमता असलेल्या मिनी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत गावकऱ्यांची तहान भागविली जाते. गाव परिसरात पाण्याचे स्त्रोत कमी असल्यामुळे ती ३० हजार लिटर पाण्याची टाकी भरण्यासाठी तीन दिवस लागतात. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळू शकत नाही. कनेरी-राम गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर शासनाचे पाच बंधारे बांधून सुध्दा एकाही बंधाऱ्याजवळ थेंबभर पाणी साठवण न केल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होत आहे. लाखो रुपये खर्चून हे बंधारे बांधले, पण आता ते शोभेच्या वास्तु ठरले आहेत. सार्वजनिक पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्यांची डागडुजी कडून पाणी कसे साठविता येईल याचा नियोजनबध्द आराखडा तयार करून पाणी अडविण्याची सुविधा केली पाहिजे. पाणी अडविल्याने पाण्याची पातळी उंचावेल व पाण्याची समस्या दूर होईल. सध्या तात्पुरती पिण्याच्या पाण्याची निवारणासाठी इंदू मेंढे, वासराम मेंढे यांच्या घराजवळ बोरवेल देण्यात यावे. या बोरवेलच्या माध्यमातून ते पाणी मिनी पाणी पुरवठ्याच्या टाकीत देवून संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करता येईल. पंचायत समितीच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष देवून पाणी समस्या दूर करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)