शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

ऑक्सिजनअभावी रुग्णवाहिकेत रूग्णाचा मृत्यू; गोंदिया जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 17:02 IST

गोंदिया तालुक्यातील काटी (बिरसोला) येथील एका रूग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.४) पहाटेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे१०८ रूग्ण वाहिकेत ऑक्सिजनचा तुटवडाआरोग्य विभागाने झटकली जबाबदारी

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर कमी असला तरी आता आरोग्य विभागाच्या उदासीनता आणि हलगर्जीपणामुळे रूग्णांचा मृत्यू होत आहे. गोंदिया तालुक्यातील काटी (बिरसोला) येथील एका रूग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.४) पहाटेच्या सुमारास घडली.काटी येथील ४० वर्षाच्या महिलेला ताप आला, श्वासोच्छश्वासाचा त्रास होता आणि छातीत दुखू लागल्याने सोमवारी (दि.३) उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सायंकाळी ६ वाजता दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी या महिलेवर उपचार करण्यासाठी कोरोना चाचणी करण्यासाठी स्वॅब नमुने घेतले. परंतु तिची प्रकृती खालावत होती म्हणून तेथे कार्यरत डॉ. मोहबे यांनी यासंदर्भात वैद्यकीय अधिष्ठाता यांना माहिती देऊन काटी येथील व गोंदिया शास्त्री वॉर्डातील एक अशा दोन रूग्णांना पुढील उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून मंगळवारी पहाटे २.३० वाजता नागपूरसाठी १०८ या रूग्णवाहिकेने रवाना करण्यात आले.

रूग्णवाहिका बोलविण्यात आली तेव्हा त्या रूग्णवाहिकेतील सिलिंडरमधील ऑक्सिजन संपले होते म्हणून त्यांनी ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वैद्यकीय महाविद्यालयाकडे केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी सिलिंडर पूर्णपणे भरले आहे किंवा नाही याची खात्री न करताच निष्काळजीपणे काम करीत कमी भरलेले सिलिंडर त्या रूग्णवाहिकेला दिले. रूग्णवाहिका नागपूरच्या दिशेने रवाना झाली. रूग्णवाहिका सडक-अर्जुनी तालुक्याच्या डव्वापर्यंतच गेली असता ऑक्सिजन संपल्याने तडफडून रूग्णाचा मृत्यू झाला. त्या रूग्ण वाहिकेत दोन रूग्ण असल्याने ती रूग्णवाहिका परत गोंदियाला आणण्यात आली. काटी येथील ज्या ४० वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला ती कोरोनाची संशयित रूग्ण असल्याने तिचा मृतदेह एका पॉलीथीनमध्ये पॅक करून तिच्या गावाला पाठविण्यात आला.शास्त्री वॉर्डातील रूग्णाला पुन्हा दुसºया रूग्णवाहिकेने नागपूरला रवाना करण्यात आले. गोंदियातून रूग्ण घेऊन नागपूरला निघालेल्या रूग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडर अवघ्या ३० कि.मी.अंतरावर गेल्यावर संपणे ही बाब आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी आहे. ऑक्सिजनअभावी रूग्णाचा मृत्यू होणे ही बाब कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणा किती सजगपणे काम करीत आहे दर्शविते.तब्बल दोन तास उशिराने आली रूग्णवाहिकागंभीर असलेल्या रूग्णांना नागपूर रेफर करण्यासाठी रूग्णवाहिका बोलाविण्यात आली. परंतु तब्बल दोन तास रूग्णवाहिका आलीच नाही असे वैद्यकीय अधिष्ठाता व्ही.पी.रूखमोडे यांनी सांगितले. त्यानंतर आलेल्या रूग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडर संपले होते. त्यामुळे शासकीय वैद्यकीत महाविद्यालयातून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला. मात्र ते सिलिंडर पूर्ण भरले अथवा अर्धे आहे हे तपासण्याची जबाबदारी ही १०८ या रूग्णावाहिकेच्या डॉक्टर व तेथील ब्रदरची होती.कोविडसाठी १६७ ऑक्सिजन सिलिंडरकोविड रूग्णांच्या सुरक्षेसाठी २० लहान व १४७ मोठे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असताना ऑक्सिजनअभावी रूग्णांचा मृत्यू होत असेल तर या प्रकाराला हलगर्जीपणाशिवाय दुसरे काहीच म्हणता येणार नाही.१२ लावले ३० व्हेंटिलेटर नवीन आलेगोंदिया जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सुरूवातीपासून १२ व्हेंटिलेटर लावण्यात आले. परंतु जिल्ह्यातील कोरोना रूग्णासाठी व्हेंटीलेटरवर कमी जात असल्यामुळे नवीन आलेले ३० व्हेंटिलेटर अद्याप लावण्यात आले नाही. म्हणजेच कोविड केअर सेंटरसाठी जिल्ह्यात ४२ व्हेंटीलेटरची सोय करण्यात आली आहे.कोरोना संशयित असलेल्या त्या मृताचा स्वॉब आधीच घेण्यात आला. परंतु आतापर्यंत तपासणीचा रिपोर्ट आला नाही. ऑक्सिजन सिलिंडरचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना ऑक्सिजनअभावी रूग्णाचा मृत्यू होणे ही बाब दुर्दैवी आहे. या रुग्णाचा ऑक्सीजनअभावी मृत्यू झाला की दुसरे काही कारण आहे याची चौकशी करू.डॉ.व्ही.पी.रूखमोडे, वैद्यकीय अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.

टॅग्स :Deathमृत्यू