शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

जिल्ह्यात संततधार सुरूच

By admin | Updated: July 20, 2015 01:18 IST

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार रविवारी (दि.१९) सुरूच होती.

सर्वत्र पाणीच पाणी : शेतीच्या कामांना आला वेग गोंदिया : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार रविवारी (दि.१९) सुरूच होती. या संततधार पावसामुळे जिल्हा ओलाचिंब झाला असून शेतकरी वर्ग या पावसाचे चांगलाच सुखावला आहे. जिल्ह्यात सर्वत्र या पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे शेतीच्या कामांनी वेग धरला आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात २१५.९ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून याची सरासरी २६.९८ एवढी आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. जुलै महिना अर्धा लोटून गेला तरिही पावसाने पाहिजे तशी हजेरी लावली नसल्याने दुष्काळाचे सावट दिसून येत होते. पाऊस नसल्याने शेतीची कामे खोळंबली होती व शेततऱ्यांच्या माथ्यावर चिंतेच्या रेघोट्या दिसून येत होत्या. आतापर्यंत फक्त पाण्याची सोय असलेल्या शेतक ऱ्यांचीच कामे सुरू होती. तर वरथेंबी पावसावर अवलंबून असलेले शेतकरी मात्र आकाशाकडे नजरा लावून पाऊस बरसावा यासाठी देवाकडे प्रार्थना करीत होते. मात्र शुक्रवारपासून (दि.१७) पाऊस जिल्ह्यात परतून आला असून रविवारपर्यंत (दि.१९) पावसाची रिपरिप सुरूच होती. मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या या संततधार पावसामुळे जिल्हा ओलाचिंब झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील आठही तालुक्यांत पाऊस बरसत असल्याने शेतकरी सुखावला असून शेतीच्या कामाला लागला आहे. त्यामुळे सध्या बघावे तेथे शेतांत गर्दी दिसून येत असून सर्वच आपल्या कामात व्यस्त दिसून येत आहेत. विशेष म्हणजे तर मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या या संततधार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी पाऊस दडी मारून बसल्याने असहनीय उकाड्याचा सामना करावा लागत होता. उकाड्यापासून सुटका मिळावी यासाठी बंद झालेले कुलर पुन्हा सुरू करण्याची पाळी लोकांवर आली होती. मात्र या संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून सुटका मिळाली आहे. तर मागील चोवीस तासांत अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधिक ६४.४ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून आमगाव तालुक्यात सर्वात कमी ८ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)२४ तासांत २१५.९ मिमी पाऊसशनिवारपासून आतापर्यंत बरसत असलेल्या पावसाची रविवारी सकाळ पर्यंत २१५.९ मीमी एवढी नोंद घेण्यात आली आहे. याची २६.९८ एवढी सरासरी आहे. तर जिल्ह्यात १ जूननपासून आतापर्यंत ३२२३.६ मीमी पाऊस बरसला असून त्याची ४०२.९४ एवढी सरासरी आहे. यात आतापर्यंत सालेकसा तालुक्यात सर्वाधिक ५००.६ मीमी पाऊस बरसला असून सडक-अर्जुनी तालुक्यात सर्वात कमी ३३२.४ मीमी पाऊस बरसल्याची नोंद आहे. रोवणीच्या कामांना आला वेग पाऊस नसल्यामुळे अडून असलेली रोवणीची कामे आता वेगात आली आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतकरी रोवणीसाठी पावसाची वाट बघत होता. त्यात आता मागील दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप शेतीसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी कंबरकसून शेतात उतरला आहे. आपल्या परिवारासह शेतकरी रोवणी आटोपण्यात व्यस्त असून जिल्ह्यात बघावे तेथे रोवणीची कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे.