शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:09 IST

गेल्या आठवडाभर कधी सुरु तर कधी बंद, अशा अवस्थेत असलेली बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा मंगळवारी दिवसभर ठप्प होती. त्यामुळे शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातील कामांचा खोळंबा झाला होता. आठवडाभरापासून या सेवेला ग्रहण लागले आहे.

ठळक मुद्देआठवडाभरापासून लागले ग्रहण : गोंदियातील कार्यालय वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या आठवडाभर कधी सुरु तर कधी बंद, अशा अवस्थेत असलेली बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा मंगळवारी दिवसभर ठप्प होती. त्यामुळे शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातील कामांचा खोळंबा झाला होता. आठवडाभरापासून या सेवेला ग्रहण लागले आहे. शिवाय जबाबदार अधिकारी-कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे उघड झाले आहे.तुमसर-तिरोडा तसेच गोंदिया शहराच्या काही भागात केबल तुटल्याचे कारण यापूर्वी बीएसएनएल कार्यालयाने दिले होते. हे काम तातडीने सुरु केले जाईल, असेही सांगितले होते. या गोष्टीला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला. तरीही बीएसएनएलची सेवा पाहिजे त्या प्रमाणात काम करीत नाही. गत आठवड्याभरापासून ही सेवा अधिकच त्रासदायक ठरु लागली आहे. कधी सुरु तर कधी मध्येच बंद, असा लपंडाव आहे. दोन-दोन तास इंटरनेट सेवा ठप्प पडत असल्याने अनेकांची कामे रेंगाळली आहेत. शासकीय, निमशासकीय असो वा खासगी कार्यालयातील बहुतांश कामे ही इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाईन केली जात आहेत. मात्र ही सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने कामानिमित्त येणाºया नागरिकांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे.परिणामी, अनेकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. मोबाईल सेवेच्या बाबतीतही हेच रडगाणे आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी बीएसएनएलच्या सीम फेकून खासगी कंपन्यांच्या सीम खरेदी करण्याला पसंती दिली आहे.उल्लेखनिय म्हणजे, गोंदिया येथील बीएसएनएलचे कार्यालय वाऱ्यावर आहे. कोणताही जबाबदार अधिकारी कार्यालयात हजर असताना दिसत नाही. एक दोन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर या कार्यालयाचा डोलारा उभा आहे.या कर्मचाऱ्यांना इंटरनेट सेवेच्या बाबतीत काहीही सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी या कार्यालयाच्या कामकाजावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.भंडाऱ्यातून हाकला जातोगोंदिया कार्यालयाचा कारभारभंडारा जिल्ह्याची फाळणी होऊन गोंदिया जिल्हा निर्मितीला दीर्घ कालावधी लोटला. अनेक शासकीय कार्यालये गोंदियात स्थापन झालीत. मात्र, महत्त्वाच्या कार्यालयापैकी एक असलेल्या बीएसएनएल कार्यालयाचा कारभार आजही भंडाऱ्यातून हाकला जातो. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांचे या कार्यालयाकडे सपेशल दुर्लक्ष झाले आहे.अतिवृष्टीचाही फटकागेल्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याने संपूर्ण सेवा विस्कळीत झाली आहे. अधिकारी आणि कर्मचारीच नसल्यामुळे ही सेवा दुरुस्त करता आली नाही. याचा फटकाही ग्राहकांना बसत आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची ग्राहकांची मागणी आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल