शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:09 IST

गेल्या आठवडाभर कधी सुरु तर कधी बंद, अशा अवस्थेत असलेली बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा मंगळवारी दिवसभर ठप्प होती. त्यामुळे शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातील कामांचा खोळंबा झाला होता. आठवडाभरापासून या सेवेला ग्रहण लागले आहे.

ठळक मुद्देआठवडाभरापासून लागले ग्रहण : गोंदियातील कार्यालय वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या आठवडाभर कधी सुरु तर कधी बंद, अशा अवस्थेत असलेली बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा मंगळवारी दिवसभर ठप्प होती. त्यामुळे शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातील कामांचा खोळंबा झाला होता. आठवडाभरापासून या सेवेला ग्रहण लागले आहे. शिवाय जबाबदार अधिकारी-कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे उघड झाले आहे.तुमसर-तिरोडा तसेच गोंदिया शहराच्या काही भागात केबल तुटल्याचे कारण यापूर्वी बीएसएनएल कार्यालयाने दिले होते. हे काम तातडीने सुरु केले जाईल, असेही सांगितले होते. या गोष्टीला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला. तरीही बीएसएनएलची सेवा पाहिजे त्या प्रमाणात काम करीत नाही. गत आठवड्याभरापासून ही सेवा अधिकच त्रासदायक ठरु लागली आहे. कधी सुरु तर कधी मध्येच बंद, असा लपंडाव आहे. दोन-दोन तास इंटरनेट सेवा ठप्प पडत असल्याने अनेकांची कामे रेंगाळली आहेत. शासकीय, निमशासकीय असो वा खासगी कार्यालयातील बहुतांश कामे ही इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाईन केली जात आहेत. मात्र ही सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने कामानिमित्त येणाºया नागरिकांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे.परिणामी, अनेकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. मोबाईल सेवेच्या बाबतीतही हेच रडगाणे आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी बीएसएनएलच्या सीम फेकून खासगी कंपन्यांच्या सीम खरेदी करण्याला पसंती दिली आहे.उल्लेखनिय म्हणजे, गोंदिया येथील बीएसएनएलचे कार्यालय वाऱ्यावर आहे. कोणताही जबाबदार अधिकारी कार्यालयात हजर असताना दिसत नाही. एक दोन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर या कार्यालयाचा डोलारा उभा आहे.या कर्मचाऱ्यांना इंटरनेट सेवेच्या बाबतीत काहीही सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी या कार्यालयाच्या कामकाजावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.भंडाऱ्यातून हाकला जातोगोंदिया कार्यालयाचा कारभारभंडारा जिल्ह्याची फाळणी होऊन गोंदिया जिल्हा निर्मितीला दीर्घ कालावधी लोटला. अनेक शासकीय कार्यालये गोंदियात स्थापन झालीत. मात्र, महत्त्वाच्या कार्यालयापैकी एक असलेल्या बीएसएनएल कार्यालयाचा कारभार आजही भंडाऱ्यातून हाकला जातो. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांचे या कार्यालयाकडे सपेशल दुर्लक्ष झाले आहे.अतिवृष्टीचाही फटकागेल्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याने संपूर्ण सेवा विस्कळीत झाली आहे. अधिकारी आणि कर्मचारीच नसल्यामुळे ही सेवा दुरुस्त करता आली नाही. याचा फटकाही ग्राहकांना बसत आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची ग्राहकांची मागणी आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल