शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:09 IST

गेल्या आठवडाभर कधी सुरु तर कधी बंद, अशा अवस्थेत असलेली बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा मंगळवारी दिवसभर ठप्प होती. त्यामुळे शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातील कामांचा खोळंबा झाला होता. आठवडाभरापासून या सेवेला ग्रहण लागले आहे.

ठळक मुद्देआठवडाभरापासून लागले ग्रहण : गोंदियातील कार्यालय वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या आठवडाभर कधी सुरु तर कधी बंद, अशा अवस्थेत असलेली बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा मंगळवारी दिवसभर ठप्प होती. त्यामुळे शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातील कामांचा खोळंबा झाला होता. आठवडाभरापासून या सेवेला ग्रहण लागले आहे. शिवाय जबाबदार अधिकारी-कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे उघड झाले आहे.तुमसर-तिरोडा तसेच गोंदिया शहराच्या काही भागात केबल तुटल्याचे कारण यापूर्वी बीएसएनएल कार्यालयाने दिले होते. हे काम तातडीने सुरु केले जाईल, असेही सांगितले होते. या गोष्टीला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला. तरीही बीएसएनएलची सेवा पाहिजे त्या प्रमाणात काम करीत नाही. गत आठवड्याभरापासून ही सेवा अधिकच त्रासदायक ठरु लागली आहे. कधी सुरु तर कधी मध्येच बंद, असा लपंडाव आहे. दोन-दोन तास इंटरनेट सेवा ठप्प पडत असल्याने अनेकांची कामे रेंगाळली आहेत. शासकीय, निमशासकीय असो वा खासगी कार्यालयातील बहुतांश कामे ही इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाईन केली जात आहेत. मात्र ही सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने कामानिमित्त येणाºया नागरिकांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे.परिणामी, अनेकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. मोबाईल सेवेच्या बाबतीतही हेच रडगाणे आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी बीएसएनएलच्या सीम फेकून खासगी कंपन्यांच्या सीम खरेदी करण्याला पसंती दिली आहे.उल्लेखनिय म्हणजे, गोंदिया येथील बीएसएनएलचे कार्यालय वाऱ्यावर आहे. कोणताही जबाबदार अधिकारी कार्यालयात हजर असताना दिसत नाही. एक दोन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर या कार्यालयाचा डोलारा उभा आहे.या कर्मचाऱ्यांना इंटरनेट सेवेच्या बाबतीत काहीही सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी या कार्यालयाच्या कामकाजावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.भंडाऱ्यातून हाकला जातोगोंदिया कार्यालयाचा कारभारभंडारा जिल्ह्याची फाळणी होऊन गोंदिया जिल्हा निर्मितीला दीर्घ कालावधी लोटला. अनेक शासकीय कार्यालये गोंदियात स्थापन झालीत. मात्र, महत्त्वाच्या कार्यालयापैकी एक असलेल्या बीएसएनएल कार्यालयाचा कारभार आजही भंडाऱ्यातून हाकला जातो. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांचे या कार्यालयाकडे सपेशल दुर्लक्ष झाले आहे.अतिवृष्टीचाही फटकागेल्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याने संपूर्ण सेवा विस्कळीत झाली आहे. अधिकारी आणि कर्मचारीच नसल्यामुळे ही सेवा दुरुस्त करता आली नाही. याचा फटकाही ग्राहकांना बसत आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची ग्राहकांची मागणी आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल