शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे

By admin | Updated: April 21, 2016 02:12 IST

जिह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना विविध पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्च लक्षात घेता

पालकमंत्री राजकुमार बडोले : खरीप हंगामपूर्व आढावा बैठक गोंदिया : जिह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना विविध पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्च लक्षात घेता राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मागणीनुसार खरीप पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.सोमवारी १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा घेताना सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.सभेला आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, कृषी सहसंचालक घावडे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प. कृषी व पशुसंवर्धन समतीचे सभापती छाया दसरे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यात २ लाख ८६ हजार शेतकरी असताना बँकांनी सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात केवळ ४३ हजार ५६७ शेतकरी सभासदांना पीक कर्ज दिले आहे. याबाबत नाराजी व्यक्त करून ते म्हणाले, यंदाच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकरी सभासदांना बँकांनी पीक कर्ज द्यावे. बँकांचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांशी चांगले बोलत नसून शेतकऱ्यांचे बँक खाते उघडण्यात कुचराई करतात. त्यामुळे असे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही. सिंचन विभागाने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सिंचनासाठी व ग्रामस्थांना पिण्यासाठी योग्यप्रकारे पाणी द्यावे. जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढली पाहिजे, यासाठी लघु पाटबंधारे तलावांच्या दुरु स्तीचा कार्यक्र म हाती घ्यावा. कृषी केंद्रातून शेतकऱ्यांची लूट होणार नाही यासाठी भरारी पथके तयार करावी. शेतकऱ्यांच्या बांधावर जास्तीत जास्त प्रमाणात खते उपलब्ध करु न द्यावी. तूर पीक लागवडीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. भाजीपाला शेतीकडे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी वर्ग वळला पाहिजे यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना कृषी पंपाची जोडणी करून द्यावी असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, कृषी पंप जोडणेसाठी निश्चित आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पंतप्रधान पीक विम्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी या योजनेची माहिती कृषी विभागाने प्रत्येक गावात द्यावी. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तालुका पातळीवर शिबिरातून व ग्रामसभेतून ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना द्यावी, असेही पालकमंत्री बडोले म्हणाले. आमदार रहांगडाले म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करावा. श्री पद्धतीने धान लागवड करण्यास तसेच भाजीपाला पिके घेण्यास कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असेही ते या वेळी म्हणाले. या वेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चव्हाण यांनी प्रास्ताविकातून सन २०१५-१६ या वर्षात खरीप पेरणी १ लाख ९९ हजार ५०८ हेक्टर क्षेत्रात झाल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात महाबीजकडून ३० हजार ३०० क्विंटल आणि प्रमाणित खासगी कंपन्यांकडून १४ हजार ०५० क्विंटल अशी एकूण ४४ हजार ३५० क्विंटल भात बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. रासायनिक खताची मागणी ६० हजार मेट्रिक टन केली असता ६० हजार ७०० मेट्रिक टन खते मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हा उपनिबंधक अहेर यांनी पीक कर्ज वाटप, वीज वितरण कंपनीचे चव्हाण यांनी कृषी पंपाना वीज जोडणी, सिंचन प्रकल्पातील पाणी व्यवस्थापनाबाबत छप्परघरे यांनी माहिती दिली. सभेला जिल्हा अग्रणी व्यवस्थापक, सिंचन, पाटबंधारे व मध्यम प्रकल्पाचे अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित यंत्रणांचे अधिकारी, विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. संचालन देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे यांनी केले. आभार भोपळे यांनी मानले. (प्रतिनिधी)