शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे

By admin | Updated: April 21, 2016 02:12 IST

जिह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना विविध पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्च लक्षात घेता

पालकमंत्री राजकुमार बडोले : खरीप हंगामपूर्व आढावा बैठक गोंदिया : जिह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना विविध पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्च लक्षात घेता राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मागणीनुसार खरीप पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.सोमवारी १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा घेताना सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.सभेला आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, कृषी सहसंचालक घावडे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प. कृषी व पशुसंवर्धन समतीचे सभापती छाया दसरे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यात २ लाख ८६ हजार शेतकरी असताना बँकांनी सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात केवळ ४३ हजार ५६७ शेतकरी सभासदांना पीक कर्ज दिले आहे. याबाबत नाराजी व्यक्त करून ते म्हणाले, यंदाच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकरी सभासदांना बँकांनी पीक कर्ज द्यावे. बँकांचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांशी चांगले बोलत नसून शेतकऱ्यांचे बँक खाते उघडण्यात कुचराई करतात. त्यामुळे असे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही. सिंचन विभागाने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सिंचनासाठी व ग्रामस्थांना पिण्यासाठी योग्यप्रकारे पाणी द्यावे. जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढली पाहिजे, यासाठी लघु पाटबंधारे तलावांच्या दुरु स्तीचा कार्यक्र म हाती घ्यावा. कृषी केंद्रातून शेतकऱ्यांची लूट होणार नाही यासाठी भरारी पथके तयार करावी. शेतकऱ्यांच्या बांधावर जास्तीत जास्त प्रमाणात खते उपलब्ध करु न द्यावी. तूर पीक लागवडीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. भाजीपाला शेतीकडे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी वर्ग वळला पाहिजे यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना कृषी पंपाची जोडणी करून द्यावी असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, कृषी पंप जोडणेसाठी निश्चित आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पंतप्रधान पीक विम्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी या योजनेची माहिती कृषी विभागाने प्रत्येक गावात द्यावी. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तालुका पातळीवर शिबिरातून व ग्रामसभेतून ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना द्यावी, असेही पालकमंत्री बडोले म्हणाले. आमदार रहांगडाले म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करावा. श्री पद्धतीने धान लागवड करण्यास तसेच भाजीपाला पिके घेण्यास कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असेही ते या वेळी म्हणाले. या वेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चव्हाण यांनी प्रास्ताविकातून सन २०१५-१६ या वर्षात खरीप पेरणी १ लाख ९९ हजार ५०८ हेक्टर क्षेत्रात झाल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात महाबीजकडून ३० हजार ३०० क्विंटल आणि प्रमाणित खासगी कंपन्यांकडून १४ हजार ०५० क्विंटल अशी एकूण ४४ हजार ३५० क्विंटल भात बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. रासायनिक खताची मागणी ६० हजार मेट्रिक टन केली असता ६० हजार ७०० मेट्रिक टन खते मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हा उपनिबंधक अहेर यांनी पीक कर्ज वाटप, वीज वितरण कंपनीचे चव्हाण यांनी कृषी पंपाना वीज जोडणी, सिंचन प्रकल्पातील पाणी व्यवस्थापनाबाबत छप्परघरे यांनी माहिती दिली. सभेला जिल्हा अग्रणी व्यवस्थापक, सिंचन, पाटबंधारे व मध्यम प्रकल्पाचे अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित यंत्रणांचे अधिकारी, विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. संचालन देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे यांनी केले. आभार भोपळे यांनी मानले. (प्रतिनिधी)