शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
6
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
7
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
8
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
9
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

नियंत्रणासाठी जागृतीची गरज

By admin | Updated: July 13, 2015 01:29 IST

जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला भविष्यात चांगले शिक्षण, आरोग्याच्या सुविधा त्याचप्रमाणे इतर सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे.

गोपालदास अग्रवाल यांचे मत : जागतिक लोकसंख्या दिवस उत्साहात साजरा गोंदिया : जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला भविष्यात चांगले शिक्षण, आरोग्याच्या सुविधा त्याचप्रमाणे इतर सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे. वर्तमान लोकसंख्या लक्षात घेऊन शासन सर्व नियोजन करीत असते. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे नियोजन अयशस्वी ठरते. वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम लक्षात घेऊन लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्यास लोकसंख्या नियंत्रिण करणे शक्य आहे, असे मत आ. गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले. शनिवारी ११ जुलै रोजी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील सभागृहात जिल्हा आरोग्य प्रशासन, आयएमए अधिकारी महासंघ, अधिकारी-कर्मचारी समन्वय समिती, लायन्स क्लब व आकृती थिंक टुडे बहुउद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी डॉ. संजय जायस्वाल होते. प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, परिमंडळाचे सहायक संचालक डॉ. पुरूषोत्तम मडावी उपस्थित होते. आ. अग्रवाल पुढे म्हणाले, मुलगाच झाला पाहिजे ही मानसिकता आता पालकांनी बदलविणे गरजेचे आहे. मुलांच्या अपेक्षेने लोकसंख्या वाढत आहे. मुलगी दोन्ही कुटुंबांचा उध्दार करते, याकडे लक्ष दिले पाहिजे. वाढत्या लोकसंख्येमुळे व रोजगाराच्या शोधामुळे झपाट्याने शहरीकरण होत आहे. शहरी भागात शिक्षित वर्ग असल्यामुळे मर्यादित कुटुंबाला महत्त्व असताना ग्रामीण भागात कुटुंबाची सदस्य संख्या वाढत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आरोग्याची देवता धन्वतरीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गोंदिया पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. लिटल फ्लॉवर स्कूलच्या विद्यार्थिनींनी लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम यावर आधारित नाटिका सादर केली. संचालन पवन वासनिक यांनी तर आभार डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी मानले.कार्यक्रमाला अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दुधे, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राज वाघमारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वाघमारे, रेडीआॅलॉजिस्ट डॉ. चहांदे, बाल रोग तज्ज्ञ डॉ. लाटणे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. जायस्वाल, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे, शासकीय नर्सिंग विद्यालयाचे प्राचार्य रामटेके, आकृती थिंक टुडे संस्थेचे प्रमोद गुडधे, दिव्या भगत, शर्मिष्ठा सेंगर यांच्यासह शासकीय नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थिनी, गोंदिया पब्लिक स्कूल, लिटल फ्लॉवर स्कूलच्या विद्यार्थिनी तसेच केटीएस व बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) लोकसंख्या वाढीबाबत मान्यवरांची मतेप्रास्ताविकातून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. तसेच केटीएसमधून रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सोयी-सुविधांची माहिती दिली. डॉ. हरीश कळमकर म्हणाले, वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम लक्षात यावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. आरोग्याच्या सोयीसुविधांमध्ये वाढ झाल्यामुळे मृत्यूदर कमी झाले व आयुष्यमान वाढले आहे. प्रत्येकाने आता मर्यादित कुटुंबाचा विचार करून ‘हम दो हमारे दो’ याचे पालन करावे. वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रबोधनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षस्थानावरून डॉ. जयस्वाल म्हणाले, माता मृत्यूदर कमी होणे गरजेचे आहे. मुलामुलीमध्ये भेद करणे थांबले पाहिजे. मुलगा जन्माला आला पाहिजे, या अपेक्षेने लोकसंख्या वाढत आहे. मुलापेक्षा मुली जबाबदारीने वागत असून चांगल्या गुणाने उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलीचे प्रमाण मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने आपले आरोग्य उत्तम कसे राहील याकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.