शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

दुर्गम भागातही ‘एसीबी’ची दहशत

By admin | Updated: June 13, 2015 00:52 IST

वाढत्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी जिल्हावासी जागरूक होऊन पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.

लाचखोरीला लगाम : पाच महिन्यांत १५ कारवाया, प्रथमच पोलीस अधिकारी अडकले कपिल केकत गोंदियावाढत्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी जिल्हावासी जागरूक होऊन पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत शहरी भागापुरत्या मर्यादित असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाया आता दरेकसा व केशोरीसारख्या दुर्गम भागांतही या वर्षात झाल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १५ कारवाया केल्या असून यात पोलीस अधिकारी पहिल्यांदाच एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत, हे विशेष. कोणतेही काम करून देण्याच्या मोबदल्यात चहापाणी किंवा मिठाईच्या नावावर लाच मागणे ही एक अघोषीत परंपराच बनली आहे. चपराश्यापासून ते वरिष्ठ अधिकारी सर्वच या परंपरेचे अनुकरण करीत आहेत. परिणामी सर्वसामान्य माणसाची कामे अडकून पडत आहेत व त्यांना कार्यालयाच्या हेलपाट्या माराव्या लागत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांची लाचखाऊ वृत्ती एवढी वाढली आहे की, आपल्या सहकाऱ्यालाही ते सोडत नाहीत. लाचखोरीच्या या सर्व प्रकारावर आळा बसावा यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. मात्र कोर्ट- कचेरीच्या पचड्यापासून दूर राहणेच बरे हा विचार करून सहजासहजी कुणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविण्यास पुढे येत नाही. मात्र तक्रारदाराची अडकलेली कामे करवून देऊन कोर्ट-कचेरीच्या कामांतही खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची हमी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दिली जात आहे. शिवाय लोकांत जागृतीचे काम विभागाकडून केले जात आहे. यामुळेच जिल्हावासीयांच्या मनात असलेली भिती आता दूर होत असल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांत वाढ होत असून ‘एसीबी’ जिल्ह्यातील दरेकसा व केशोरी सारख्या नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागांत पोहचली आहे. यातून या दुर्गम भागातही भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे दिसून येत असून तेथील नागरिकांत लाचखोरीच्या या घटनांबाबत आता जागृती झाल्याचे या कारवायांतून दिसून येते. गतवर्षीच्या तुलनेत वाढल्या कारवायासन २०१४ हे वर्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभागासाठी सुगीचे ठरले होते. कारण मागील वर्षी विभागाने २७ कारवाया केल्या होत्या. तर सन २०१६ सुद्धा चांगले दिसून येत असून या वर्षात आतापर्यंत विभागाने १७ कारवाया केल्या आहेत. यात जानेवारी महिन्यात- दोन, फेब्रुवारी- पाच, मार्च- दोन, एप्रिल- चार व मे महिन्यात दोन कारवाया करण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांची ही आकडेवारी असून उर्वरीत सहा महिन्यांत मागील वर्षाचा रिकॉर्ड तुटणार यात शंका दिसून येत नाही. जिल्हा परिषद व महसूल खाते आघाडीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या सहा महिन्यांत १५ कारवाया केल्या आहेत. यात जिल्हा परिषद व महसूल विभागाच्या प्रत्येकी चार कारवाया असून हे दोन्ही विभाग या वर्षातील कारवायांत आघाडीवर दिसून येत आहेत. तर त्यानंतर पोलीस, वन व पंचायत समितीतील प्रत्येकी दोन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील एक कारवाई आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एसीबीचे कार्यालय सुरू झाल्यापासून पोलीस अधिकाऱ्यांवर कधीच कारवाई झाली नव्हती. या वर्षी मात्र पोलीस विभागातील अधिकारीही सुटले नाही. टोल फ्री १०६४ क्रमांकाला प्रतिसाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी १०६४ टोल फ्री क्रमांकाची सुविधा सुरू केली आहे. या सोयीला नागरिकांकडून प्रतिसादही लाभत असल्याचे कळले. याशिवाय विभागाने ‘एसीबीमहाराष्ट्र.नेट’ हा मोबाईल अ‍ॅप तयार केला आहे. तसेच जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ‘एसीबीगोंदिया अ‍ॅट जीमेल.कॉम’ या ईमेल एड्रेस असून यावरूनही तक्रार करता येत असून नागरिकांनी या सोयींचाही लाभ घेण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. लाचखोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी निर्भिडपणे पुढे यावे. तक्रारदाराने घाबरण्याचे कारण नसून त्यांची प्रलंबीत कामे एसीबी करून देणार. तसेच विभागाकडून तक्रारदाराबद्दल पूर्ण गोपनियता बाळगली जात असून न्यायालयीन कारवाईतही विभाग त्यांच्या सोबत राहणार. - दिनकर ठोसरे उपअधीक्षक लाचलूचपत प्रतिबंधक विभाग