शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

६६१ जण राहणार दृष्टीरूपाने जीवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 01:44 IST

अंधत्व दूर करण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम १९७८ पासून राबविण्यात येत आहे. यातूनच ‘दृष्टी २०२०’ हे विशेष

नेत्रदानासाठी पुढाकार : चार वर्षांत ७२ नेत्रांनी दिली प्रत्यक्षात दृष्टीदेवानंद शहारे गोंदियाअंधत्व दूर करण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम १९७८ पासून राबविण्यात येत आहे. यातूनच ‘दृष्टी २०२०’ हे विशेष अभियान राबवून अंधत्वाचे प्रमाण ०.३ टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नेत्रदानातून अंधांना दृष्टी देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. मात्र गोंदिया जिल्ह्यात पुरेशा जनजागृतीअभावी हे प्रमाण कमी आहे. मागील साडेचार वर्षांत जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या नेत्रदान विभागात ७२ नेत्र बुबुळे जमा झालेली आहेत.नेत्रदान करण्याचे प्रमाण कमी असले तरी सुशिक्षित, समंजस व विचारशील व्यक्ती नेत्रदानासाठी पुढे येत असल्याची माहिती आहे. नेत्रदानासाठी लोकांना जागृत व प्रवृत्त करण्यासाठी स्थानिक स्तरावर जनजागृतीचा अभाव आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या नेत्रपेढीत सन २०१२ मध्ये १० नेत्र बुबुळे, सन २०१३ मध्ये १४, सन २०१४ मध्ये ३०, सन २०१५ मध्ये १६ तर सन २०१६ च्या मे अखेरपर्यंत दोन नेत्र बुबुळे जमा झाल्याची नोंद आहे.सन २०१२ ते सन २०१५ पर्यंत एकूण ६६१ व्यक्तींनी नेत्रदानासाठी नोंदणी केल्याची नोंद केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा अंधत्व नियंत्रण सोसायटीकडून देण्यात आली. यात अनेक महिलांचासुद्धा समावेश आहे. यात सन २०१२ मध्ये १५ व्यक्ती, सन २०१३ मध्ये ५०, सन २०१४ मध्ये ७० व सन २०१५ मध्ये ५२६ व्यक्तींनी नेत्रदानासाठी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे मार्च २०१२ ते डिसेंबर २०१३ पर्यंत २१ महिन्यांच्या कालावधीत एकूण नऊ व्यक्तींनी प्रत्यक्षात नेत्रदान केले आहे. यात १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या वर्षभराच्या कालावधीत चार महिला व एक पुरूष अशा एकूण पाच जणांचे मृत्यूनंतर नेत्रदान झाले आहे. सदर कालावधीत नेत्रदानामध्ये महिला आघाडीवर असल्याचे दिसून येते. १ एप्रिल २०१३ ते डिसेंबरपर्यंत म्हणजे नऊ महिन्यांच्या कालावधीत चार व्यक्तींचे मरणोपरांत नेत्रदान झाले आहेत. यात मे महिन्यात दोन, सप्टेंबर महिन्यात एक व डिसेंबर महिन्यात एक अशा एकूण चार व्यक्तींचा नेत्रदात्यांमध्ये समावेश आहे. नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात प्रमोद अग्रवाल मेमोरियल बहुउद्देशिय संस्था ही एनजीओ कार्यरत आहे. हे सर्व नेत्रदान अशासकीय संस्था व केटीएस रुग्णालयातील अंधत्व नियंत्रण सोसायटी यांच्या संयुक्त सहकार्याने झाले आहे.एकाचे नेत्रदान; दोघांना दृष्टीडोळे हा निसर्गाने मानवाला दिलेला निसर्गदत्त अनमोल ठेवा आहे. मानवाला जन्मजात मिळालेली दुर्लभ गोष्ट म्हणजे दृष्टी. दृष्टिशिवाय जीवन जगण्याची कल्पनाच डोळस व्यक्ती करू शकत नाही. राज्यात २२५ नेत्रपेढ्या असून त्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. अपघाती किंवा इतर कारणाने मृत्यू झाल्यास जवळच्या नेत्रपेढीस दूरध्वनीने कळविल्यास तेथील प्रतिनिधी येतात. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळते व मृत्यूनंतरही मृत व्यक्तीकडून सत्कार्य घडते. नेत्रदानाबाबत असलेले गैरसमजजनतेत नेत्रदानाबाबत अनेक गैरसमज आहेत. नेत्रदानामुळे चेहऱ्यास विद्रुपता येते, हे धर्मविरोधी कृत्य आहे, अशा भ्रामक समजुती नागरिकांमध्ये पसरल्या आहेत. परंतु हे चुकीचे समज आहे. वास्तविक बुबुळाचा बापुद्रा फार काळजीपूर्वक काढला जातो. त्यानंतर पापण्या मिटविल्या जातात. त्यामुळे मृतकाचा चेहरा कुठेही विद्रुप होत नाही. शिवाय नेत्रदान धर्मविरोधी नसून नेत्रहिनाला दृष्टी देणे हे सत्कृत्य आहे. जिवंतपणी दोनपैकी एक डोळा दान करता येतो का, असा प्रश्न असतो. मात्र जिवंतपणी नेत्रदान करता येत नाही. केवळ मृत्यूनंतरच मृत्यूदान करता येते. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती नेत्रदान करू शकते हे विशेष.