शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

६६१ जण राहणार दृष्टीरूपाने जीवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 01:44 IST

अंधत्व दूर करण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम १९७८ पासून राबविण्यात येत आहे. यातूनच ‘दृष्टी २०२०’ हे विशेष

नेत्रदानासाठी पुढाकार : चार वर्षांत ७२ नेत्रांनी दिली प्रत्यक्षात दृष्टीदेवानंद शहारे गोंदियाअंधत्व दूर करण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम १९७८ पासून राबविण्यात येत आहे. यातूनच ‘दृष्टी २०२०’ हे विशेष अभियान राबवून अंधत्वाचे प्रमाण ०.३ टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नेत्रदानातून अंधांना दृष्टी देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. मात्र गोंदिया जिल्ह्यात पुरेशा जनजागृतीअभावी हे प्रमाण कमी आहे. मागील साडेचार वर्षांत जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या नेत्रदान विभागात ७२ नेत्र बुबुळे जमा झालेली आहेत.नेत्रदान करण्याचे प्रमाण कमी असले तरी सुशिक्षित, समंजस व विचारशील व्यक्ती नेत्रदानासाठी पुढे येत असल्याची माहिती आहे. नेत्रदानासाठी लोकांना जागृत व प्रवृत्त करण्यासाठी स्थानिक स्तरावर जनजागृतीचा अभाव आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या नेत्रपेढीत सन २०१२ मध्ये १० नेत्र बुबुळे, सन २०१३ मध्ये १४, सन २०१४ मध्ये ३०, सन २०१५ मध्ये १६ तर सन २०१६ च्या मे अखेरपर्यंत दोन नेत्र बुबुळे जमा झाल्याची नोंद आहे.सन २०१२ ते सन २०१५ पर्यंत एकूण ६६१ व्यक्तींनी नेत्रदानासाठी नोंदणी केल्याची नोंद केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा अंधत्व नियंत्रण सोसायटीकडून देण्यात आली. यात अनेक महिलांचासुद्धा समावेश आहे. यात सन २०१२ मध्ये १५ व्यक्ती, सन २०१३ मध्ये ५०, सन २०१४ मध्ये ७० व सन २०१५ मध्ये ५२६ व्यक्तींनी नेत्रदानासाठी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे मार्च २०१२ ते डिसेंबर २०१३ पर्यंत २१ महिन्यांच्या कालावधीत एकूण नऊ व्यक्तींनी प्रत्यक्षात नेत्रदान केले आहे. यात १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या वर्षभराच्या कालावधीत चार महिला व एक पुरूष अशा एकूण पाच जणांचे मृत्यूनंतर नेत्रदान झाले आहे. सदर कालावधीत नेत्रदानामध्ये महिला आघाडीवर असल्याचे दिसून येते. १ एप्रिल २०१३ ते डिसेंबरपर्यंत म्हणजे नऊ महिन्यांच्या कालावधीत चार व्यक्तींचे मरणोपरांत नेत्रदान झाले आहेत. यात मे महिन्यात दोन, सप्टेंबर महिन्यात एक व डिसेंबर महिन्यात एक अशा एकूण चार व्यक्तींचा नेत्रदात्यांमध्ये समावेश आहे. नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात प्रमोद अग्रवाल मेमोरियल बहुउद्देशिय संस्था ही एनजीओ कार्यरत आहे. हे सर्व नेत्रदान अशासकीय संस्था व केटीएस रुग्णालयातील अंधत्व नियंत्रण सोसायटी यांच्या संयुक्त सहकार्याने झाले आहे.एकाचे नेत्रदान; दोघांना दृष्टीडोळे हा निसर्गाने मानवाला दिलेला निसर्गदत्त अनमोल ठेवा आहे. मानवाला जन्मजात मिळालेली दुर्लभ गोष्ट म्हणजे दृष्टी. दृष्टिशिवाय जीवन जगण्याची कल्पनाच डोळस व्यक्ती करू शकत नाही. राज्यात २२५ नेत्रपेढ्या असून त्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. अपघाती किंवा इतर कारणाने मृत्यू झाल्यास जवळच्या नेत्रपेढीस दूरध्वनीने कळविल्यास तेथील प्रतिनिधी येतात. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळते व मृत्यूनंतरही मृत व्यक्तीकडून सत्कार्य घडते. नेत्रदानाबाबत असलेले गैरसमजजनतेत नेत्रदानाबाबत अनेक गैरसमज आहेत. नेत्रदानामुळे चेहऱ्यास विद्रुपता येते, हे धर्मविरोधी कृत्य आहे, अशा भ्रामक समजुती नागरिकांमध्ये पसरल्या आहेत. परंतु हे चुकीचे समज आहे. वास्तविक बुबुळाचा बापुद्रा फार काळजीपूर्वक काढला जातो. त्यानंतर पापण्या मिटविल्या जातात. त्यामुळे मृतकाचा चेहरा कुठेही विद्रुप होत नाही. शिवाय नेत्रदान धर्मविरोधी नसून नेत्रहिनाला दृष्टी देणे हे सत्कृत्य आहे. जिवंतपणी दोनपैकी एक डोळा दान करता येतो का, असा प्रश्न असतो. मात्र जिवंतपणी नेत्रदान करता येत नाही. केवळ मृत्यूनंतरच मृत्यूदान करता येते. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती नेत्रदान करू शकते हे विशेष.